शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तंतुमय पदार्थांचे सेवन केल्यास मूळव्याध दूर ठेवणे शक्य : स्मिता वैद्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 14:15 IST

खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज असते. आहारात भरपूर तंतूमय पदार्थाचा समावेश असायला हवा.

ठळक मुद्देखाण्यापिण्याची विचित्र सवय आणि गतिमान जीवनपद्धती हे मूळव्याध व इतर रोग होण्याचे मुख्य कारण - डॉ. स्मिता वैद्ययोग्य प्रमाणात पाणी पिणे, पालेभाज्या खाणे अशा चांगल्या सवयी लावायला हव्यात - डॉ. स्मिता वैद्यआपल्याला आजार झाल्यास त्यावर त्वरित उपचार घ्यावेत. उशीर केल्यास आजारातील गुंता वाढतो - डॉ. स्मिता वैद्य

सोलापूर :  बदलत्या जीवनशैलीमुळे मूळव्याध आजार बळावतो. सध्याच्या या बदलत्या काळात फास्टफूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. फास्टफूड टाळून तंतूमय पदार्थांचे सेवन केल्यास मूळव्याधाला रोखणे शक्य होते, असे आंतरराष्टÑीय ख्यातीच्या  गुद्रोग शल्य चिकित्सक डॉ. स्मिता वैद्य यांनी सांगितले. मूळव्याध दिनानिमित्त त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला.

डॉ. वैद्य या गुद्रोगावर डॉक्टरांना उपचार करण्यासाठी प्रवृत्त करतात. त्या म्हणाल्या की, शौचास साफ होणे हे आहारावर अवलंबून आहे. जो आहार अन्नरुपाने पोटात जातो तो मल रूपाने गुदमार्गाने बाहेर पडतो.  त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज असते. आहारात भरपूर तंतूमय पदार्थाचा समावेश असायला हवा.

गव्हाच्या पिठाची चाळणी न करता केलेली चपाती, भरपूर काकडी, गाजर, कांदा, मुळा, टोमॅटो, पॉलिश न केलेल्या तांदळाचा भात, सर्व प्रकारच्या फळांच्या सालीसह सेवन, हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या आहारात असाव्यात. त्याशिवाय तीन ते पाच लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. चहा-कॉफी, दारू, सिगारेट, विडी, तेलकट, मसालेदार पदार्थ आणि मांस खाल्ल्याने गुदरोग बळावतात. सर्दी, खोकला, दमा, रक्तवाढीच्या औषधांच्या सेवनाने मल घट्ट होते. त्याशिवाय मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानेही शौचास त्रास होतो. यात ब्रेड, बिस्किटे, पाव, पिझ्झा, बर्गर आदी फास्टफूड यांचा समावेश होतो.

ही काळजी घ्या...

  • - शौच करतेवेळी कुंथणे टाळावे
  • - पुरेसा चोथायुक्त आहार घ्यावा 
  • - दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे 
  • - लठ्ठ असाल तर वजन कमी करा च्नियमित व्यायाम आवश्यक च्
  • - शौचाला लागण्याची उर्मी दाबू नका 
  • - शौचालयात जास्त वेळ बसू नका 
  • - मद्यपान, सिगारेट पिऊ नका 
  • - अति चहा, कॉफी पिणे टाळा 

खाण्यापिण्याची विचित्र सवय आणि गतिमान जीवनपद्धती हे मूळव्याध व इतर रोग होण्याचे मुख्य कारण आहे. ते टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणे, पालेभाज्या खाणे अशा चांगल्या सवयी लावायला हव्यात. आपल्याला आजार झाल्यास त्यावर त्वरित उपचार घ्यावेत. उशीर केल्यास आजारातील गुंता वाढतो.- डॉ. स्मिता वैद्य, एमबीबीएस, एम.एस., सर्जन, प्रोक्टोलॉजिस्ट

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय