शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

तंतुमय पदार्थांचे सेवन केल्यास मूळव्याध दूर ठेवणे शक्य : स्मिता वैद्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 14:15 IST

खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज असते. आहारात भरपूर तंतूमय पदार्थाचा समावेश असायला हवा.

ठळक मुद्देखाण्यापिण्याची विचित्र सवय आणि गतिमान जीवनपद्धती हे मूळव्याध व इतर रोग होण्याचे मुख्य कारण - डॉ. स्मिता वैद्ययोग्य प्रमाणात पाणी पिणे, पालेभाज्या खाणे अशा चांगल्या सवयी लावायला हव्यात - डॉ. स्मिता वैद्यआपल्याला आजार झाल्यास त्यावर त्वरित उपचार घ्यावेत. उशीर केल्यास आजारातील गुंता वाढतो - डॉ. स्मिता वैद्य

सोलापूर :  बदलत्या जीवनशैलीमुळे मूळव्याध आजार बळावतो. सध्याच्या या बदलत्या काळात फास्टफूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. फास्टफूड टाळून तंतूमय पदार्थांचे सेवन केल्यास मूळव्याधाला रोखणे शक्य होते, असे आंतरराष्टÑीय ख्यातीच्या  गुद्रोग शल्य चिकित्सक डॉ. स्मिता वैद्य यांनी सांगितले. मूळव्याध दिनानिमित्त त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला.

डॉ. वैद्य या गुद्रोगावर डॉक्टरांना उपचार करण्यासाठी प्रवृत्त करतात. त्या म्हणाल्या की, शौचास साफ होणे हे आहारावर अवलंबून आहे. जो आहार अन्नरुपाने पोटात जातो तो मल रूपाने गुदमार्गाने बाहेर पडतो.  त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज असते. आहारात भरपूर तंतूमय पदार्थाचा समावेश असायला हवा.

गव्हाच्या पिठाची चाळणी न करता केलेली चपाती, भरपूर काकडी, गाजर, कांदा, मुळा, टोमॅटो, पॉलिश न केलेल्या तांदळाचा भात, सर्व प्रकारच्या फळांच्या सालीसह सेवन, हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या आहारात असाव्यात. त्याशिवाय तीन ते पाच लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. चहा-कॉफी, दारू, सिगारेट, विडी, तेलकट, मसालेदार पदार्थ आणि मांस खाल्ल्याने गुदरोग बळावतात. सर्दी, खोकला, दमा, रक्तवाढीच्या औषधांच्या सेवनाने मल घट्ट होते. त्याशिवाय मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानेही शौचास त्रास होतो. यात ब्रेड, बिस्किटे, पाव, पिझ्झा, बर्गर आदी फास्टफूड यांचा समावेश होतो.

ही काळजी घ्या...

  • - शौच करतेवेळी कुंथणे टाळावे
  • - पुरेसा चोथायुक्त आहार घ्यावा 
  • - दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे 
  • - लठ्ठ असाल तर वजन कमी करा च्नियमित व्यायाम आवश्यक च्
  • - शौचाला लागण्याची उर्मी दाबू नका 
  • - शौचालयात जास्त वेळ बसू नका 
  • - मद्यपान, सिगारेट पिऊ नका 
  • - अति चहा, कॉफी पिणे टाळा 

खाण्यापिण्याची विचित्र सवय आणि गतिमान जीवनपद्धती हे मूळव्याध व इतर रोग होण्याचे मुख्य कारण आहे. ते टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणे, पालेभाज्या खाणे अशा चांगल्या सवयी लावायला हव्यात. आपल्याला आजार झाल्यास त्यावर त्वरित उपचार घ्यावेत. उशीर केल्यास आजारातील गुंता वाढतो.- डॉ. स्मिता वैद्य, एमबीबीएस, एम.एस., सर्जन, प्रोक्टोलॉजिस्ट

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय