शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

शेतकरी संकटात ; दुष्काळात जनावरांच्या मुखात जाणारा चारा लष्करी अळीनेच गिळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:25 IST

प्रभू पुजारी पंढरपूर : सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे़ काय करावे ...

ठळक मुद्देशेतकरी संकटात; लष्करी अळीवर उपाययोजना करण्याची मागणीजनावरांचा चारा व हमखास उत्पन्नाचे पीक म्हणून मका लागवड शासनाने उसाप्रमाणे मक्याची पाहणी व बाधित क्षेत्राचा पंचनामा करावा व नुकसानभरपाई द्यावी

प्रभू पुजारी

पंढरपूर : सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे़ काय करावे शेतकºयांना सुचेनासे झाले़ त्यात उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून मकेची लागवड केली. परंतु आता त्या मकेवरच लष्करी अळीने अटॅक केला आहे़ ‘दुष्काळात जनावरांच्या मुखात घालण्यासाठी चार केला, पण तो लष्करी अळीनेच गिळला’ अशी व्यथा शेतकरी व्यक्त करू लागले आहेत़ त्यावर कृषी विभागाने किंवा प्रशासनाने काही तरी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकºयांमधून होऊ लागली आहे.

यंदा दुष्काळी परिस्थिती, उन्हाळ्यात जनावरांच्या चाºयासाठी काय करावे, या चिंतेत शेतकरी आहे़ दुष्काळ जाहीर होऊनही दोन-तीन महिन्यांचा कालावधी उलटला़ अद्यापपर्यंत शासनाने जनावरांसाठी काहीही उपाययोजना केल्या नाहीत़ त्यात हुमनी उसाचे फडच्या फड खराब करून टाकले़ त्या पाठोपाठ आता मकेच्या पिकावर लष्करी अळीने अटॅक केला आहे़ त्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे़ ही लष्करी अळी हिरवीगार पाने कुरतडते़ शिवाय पोग्यातील कणसावरचे दाणे नष्ट करते़ त्यामुळे मक्याची वाढ थांबून चाराही नाही आणि मकाही हाती पडत नसल्याचे दिसून येते़ परिणामी उन्हाळ्यात हिरव्या चाºयासाठी काय करावे, सुचेनासे झाल्याचे सचिन गुंड यांनी सांगितले.

काही महिन्यांपासून उसाला लागलेल्या हुमनीचा बोलबाला झाला. यावरून आमदार, खासदार, मंत्री व अधिकारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप, निवेदने, पंचनामे असे रणकंदन सुरू असतानाच तालुक्यात बहुउपयोगी म्हणून प्रचलित असलेल्या मक्याचे एकमेव पीक शेतकºयांना आधार होते, मात्र तेही सध्या लष्करी अळीच्या रडारवर आल्याने शेकडो एकर मका शेती धोक्यात आली आहे. मक्याचे धाट उगवून दोन-तीन पानावर असताना ही लष्करी अळी पानेच कुरतडते़ शिवाय मका पोग्यात असेल तर ती अळी दाणे खाऊन टाकते़ त्यामुळे याचा उत्पादनावर व चाºयावर परिणाम होऊ लागला आहे. तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. खरीप व रब्बी हंगाम वाया गेला, मात्र काही सिंचित क्षेत्रावर शेतकºयांनी मक्याची लागवड केली़ वेगवेगळ्या हवामानात तग धरणारे पीक म्हणून मक्याकडे बघितले जाते. शिवाय मकेचा ओला व सुका चारा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो़ त्यामुळे वर्षभर मकेची लागवड केली जाते. 

काही केल्या अळीचा प्रादुर्भाव थांबेना- यंदा शासनाने मकेसाठी हमीभाव जाहीर केला आहे. शिवाय चारा पिकासाठी कृषी विभागाकडून बियाणांचे वाटपही केले आहे़ त्यामुळे कॅनॉल व नदीकाठच्या सिंचित क्षेत्रावर मकेची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, मात्र या पिकावर पाने कुरतडणारी व पिकाच्या पोग्यात अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यामुळे पोग्याभोवती भुश्याप्रमाणे थर साचलेला दिसू लागले आहेत़ यासाठी अनेक प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत. दुष्काळाच्या दाढेतून काढलेले मक्याचे पीक लष्करी अळीच्या अटॅकने आता वाया जाऊ लागले आहे.

यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने दुष्काळात जनावरांचा चारा व हमखास उत्पन्नाचे पीक म्हणून मका लागवड केली. मात्र मक्यावरील अळी आवाक्याच्या बाहेर गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने उसाप्रमाणे मक्याची पाहणी व बाधित क्षेत्राचा पंचनामा करावा व नुकसानभरपाई द्यावी़-बिळ्याणसिद्ध पुजारी,शेतकरी, तामदर्डी, ता़ मंगळवेढा 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ