शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संकटात ; दुष्काळात जनावरांच्या मुखात जाणारा चारा लष्करी अळीनेच गिळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:25 IST

प्रभू पुजारी पंढरपूर : सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे़ काय करावे ...

ठळक मुद्देशेतकरी संकटात; लष्करी अळीवर उपाययोजना करण्याची मागणीजनावरांचा चारा व हमखास उत्पन्नाचे पीक म्हणून मका लागवड शासनाने उसाप्रमाणे मक्याची पाहणी व बाधित क्षेत्राचा पंचनामा करावा व नुकसानभरपाई द्यावी

प्रभू पुजारी

पंढरपूर : सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे़ काय करावे शेतकºयांना सुचेनासे झाले़ त्यात उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून मकेची लागवड केली. परंतु आता त्या मकेवरच लष्करी अळीने अटॅक केला आहे़ ‘दुष्काळात जनावरांच्या मुखात घालण्यासाठी चार केला, पण तो लष्करी अळीनेच गिळला’ अशी व्यथा शेतकरी व्यक्त करू लागले आहेत़ त्यावर कृषी विभागाने किंवा प्रशासनाने काही तरी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकºयांमधून होऊ लागली आहे.

यंदा दुष्काळी परिस्थिती, उन्हाळ्यात जनावरांच्या चाºयासाठी काय करावे, या चिंतेत शेतकरी आहे़ दुष्काळ जाहीर होऊनही दोन-तीन महिन्यांचा कालावधी उलटला़ अद्यापपर्यंत शासनाने जनावरांसाठी काहीही उपाययोजना केल्या नाहीत़ त्यात हुमनी उसाचे फडच्या फड खराब करून टाकले़ त्या पाठोपाठ आता मकेच्या पिकावर लष्करी अळीने अटॅक केला आहे़ त्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे़ ही लष्करी अळी हिरवीगार पाने कुरतडते़ शिवाय पोग्यातील कणसावरचे दाणे नष्ट करते़ त्यामुळे मक्याची वाढ थांबून चाराही नाही आणि मकाही हाती पडत नसल्याचे दिसून येते़ परिणामी उन्हाळ्यात हिरव्या चाºयासाठी काय करावे, सुचेनासे झाल्याचे सचिन गुंड यांनी सांगितले.

काही महिन्यांपासून उसाला लागलेल्या हुमनीचा बोलबाला झाला. यावरून आमदार, खासदार, मंत्री व अधिकारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप, निवेदने, पंचनामे असे रणकंदन सुरू असतानाच तालुक्यात बहुउपयोगी म्हणून प्रचलित असलेल्या मक्याचे एकमेव पीक शेतकºयांना आधार होते, मात्र तेही सध्या लष्करी अळीच्या रडारवर आल्याने शेकडो एकर मका शेती धोक्यात आली आहे. मक्याचे धाट उगवून दोन-तीन पानावर असताना ही लष्करी अळी पानेच कुरतडते़ शिवाय मका पोग्यात असेल तर ती अळी दाणे खाऊन टाकते़ त्यामुळे याचा उत्पादनावर व चाºयावर परिणाम होऊ लागला आहे. तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. खरीप व रब्बी हंगाम वाया गेला, मात्र काही सिंचित क्षेत्रावर शेतकºयांनी मक्याची लागवड केली़ वेगवेगळ्या हवामानात तग धरणारे पीक म्हणून मक्याकडे बघितले जाते. शिवाय मकेचा ओला व सुका चारा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो़ त्यामुळे वर्षभर मकेची लागवड केली जाते. 

काही केल्या अळीचा प्रादुर्भाव थांबेना- यंदा शासनाने मकेसाठी हमीभाव जाहीर केला आहे. शिवाय चारा पिकासाठी कृषी विभागाकडून बियाणांचे वाटपही केले आहे़ त्यामुळे कॅनॉल व नदीकाठच्या सिंचित क्षेत्रावर मकेची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, मात्र या पिकावर पाने कुरतडणारी व पिकाच्या पोग्यात अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यामुळे पोग्याभोवती भुश्याप्रमाणे थर साचलेला दिसू लागले आहेत़ यासाठी अनेक प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत. दुष्काळाच्या दाढेतून काढलेले मक्याचे पीक लष्करी अळीच्या अटॅकने आता वाया जाऊ लागले आहे.

यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने दुष्काळात जनावरांचा चारा व हमखास उत्पन्नाचे पीक म्हणून मका लागवड केली. मात्र मक्यावरील अळी आवाक्याच्या बाहेर गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने उसाप्रमाणे मक्याची पाहणी व बाधित क्षेत्राचा पंचनामा करावा व नुकसानभरपाई द्यावी़-बिळ्याणसिद्ध पुजारी,शेतकरी, तामदर्डी, ता़ मंगळवेढा 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ