शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

धीरजला प्रसंगानुसार विज्ञान आठवले; अन् त्याने जयश्रीकाकूंना विजेच्या धक्क्यातून वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:51 IST

सोलापूर शहरात असलेल्या वारद चाळीतील घटना;  त्या मुलाच्या युक्तीचे सर्वत्र कौतुके

ठळक मुद्देशहरात सर्वत्र चार ते पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी आठ-आठ दिवस पाणी येत नाही. काही भागात पाणी येते मात्र अत्यंत कमी दाबाने, आठ दिवस पुरेल इतके पाणी भरून ठेवण्यासाठी विद्युतपंपाचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाणी भरताना अंग, कपडे ओले होतात़ पायात चप्पल नसल्याने विजेच्या धक्क्याने दगावणाºयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे

यशवंत सादूल 

सोलापूर : सकाळच्या सातची वेऴ़़ पाण्याचा दिवस... वारद चाळीत पाणी भरण्यासाठी एकच लगबग... जयश्री अनिल मेडीदार या ४२ वर्षांच्या गृहिणी घरासमोरील पिण्याच्या पाण्याच्या नळातून विद्युत मोटारीच्या साहाय्याने पाणी भरण्याचा प्रयत्न करत होत्या... त्यासाठी वायरची जोडणी करताना विजेचा धक्का (शॉक) लागल्याने जयश्री या बेशुद्ध होऊन खाली पडल्या़ अंगात विद्युतसंचार चालूच होता़ हा प्रसंग समोरच खेळणाºया सिद्धेश्वर प्रशालेतील इयत्ता दहावीत शिकत असलेल्या धीरज घोंगडे याने हा बाका प्रसंग पाहिला़ पाहताच नववी शिकत असताना विज्ञान विषयातील विद्युतवाहक आणि रोधक वस्तूची आठवण झाली आणि जवळच अडगळीत पडलेल्या लाकडाचा वापर करून चपखलपणे विद्युतप्रवाह खंडित केला अन् जयश्रीकाकूंचा जीव वाचविला.

 भैय्या चौक ते नवीवेस रस्त्यावरील नरसिंग गिरजी मिलसमोरील वारद चाळ (त्रिकोण चाळ) येथे ३५ ते ४० कुटुंबे राहत आहेत. या चाळीत जयश्री मेडीदार या मागील पंचवीस वर्षांपासून येथे राहतात. त्यांच्या पतीचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. सोमवारी सकाळी सात वाजता पाणी आल्याने त्या पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार लावत असताना अचानक हातातील प्लगमधून बाहेर पडलेल्या वायरातील तारांशी स्पर्श होऊन त्यांना विद्युत धक्का बसला़ काही कळायच्या आत त्या जोराचा आवाज करून जागेवरच कोसळल्या. पायात चपला नाहीत, ओलसर हात आणि कपडे यामुळे धक्का लागला होता. समोरच मोकळ्या जागेत खेळणाºया दहावीत शिकत असलेल्या धीरज महेश धोंगडे याने हा प्रसंग पाहून घाबरून न जाता जवळच अडगळीत पडलेले लाकूड ओढून काढले. धैर्याने जयश्री आणि विद्युतप्रवाह चालू असलेल्या वायर यांच्यामध्ये धरून प्रवाह खंडित केला.

काकू बेशुद्ध पडल्याचे सर्वांना ओरडून सांगितले. सर्व चाळकरी गोळा झाले आणि शांताबाई जमखंडी, सुजाता उमराणी, महानंदा मसळी, मीनाक्षी बिराजदार आदी महिलांनी त्यांचे हातपाय चोळून त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न केला़ त्यांच्या डाव्या हातावर वायर धरलेल्या ठिकाणी जळून खोलवर जखम झाल्याचे आढळून आले. शुद्धीवर आल्यावर जवळील डॉक्टरांना दाखविण्यात आले. तपासणीनंतर जुजबी उपचार करून औषधे दिली. धोका टळल्याचे सांगून विश्रांतीचा सल्ला दिला. सिद्धेश्वर तरुण मंडळ व नगरसेवक चेतन नरोटे, कलप्पा मेडीदार, लिंगप्पा मसळी, सिद्धू बिराजदार, प्रभाकर जक्का आदींनी धीरजच्या धाडसाचे कौतुक करून सत्कार केला़ यावेळी चाळीतील लोक उपस्थित होते़

शहरात सर्रास विद्युत मोटारीने पाणी उपसा...- शहरात सर्वत्र चार ते पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी आठ-आठ दिवस पाणी येत नाही. काही भागात पाणी येते मात्र अत्यंत कमी दाबाने, आठ दिवस पुरेल इतके पाणी भरून ठेवण्यासाठी विद्युतपंपाचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते़ पाणी भरताना अंग, कपडे ओले होतात़ पायात चप्पल नसल्याने विजेच्या धक्क्याने दगावणाºयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

सिद्धेश्वर प्रशालेत दहावी इयत्तेत शिकत असलेल्या धीरजला समोरील बाका प्रसंग पाहताच नववी इयत्तेत शिकत असताना विज्ञान विषयातील विद्युतवाहक व विद्युतरोधक वस्तूंची आठवण झाली आणि जवळच अडगळीत पडलेल्या लाकडाचा वापर केला आणि विद्युतप्रवाह खंडित करीत त्याने जीव वाचविला़ - धीरज घोंगडे,विद्यार्थी, सिद्धेश्वर प्रशाला

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकmahavitaranमहावितरणHealthआरोग्यEducationशिक्षणSchoolशाळाscienceविज्ञान