शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धीरजला प्रसंगानुसार विज्ञान आठवले; अन् त्याने जयश्रीकाकूंना विजेच्या धक्क्यातून वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:51 IST

सोलापूर शहरात असलेल्या वारद चाळीतील घटना;  त्या मुलाच्या युक्तीचे सर्वत्र कौतुके

ठळक मुद्देशहरात सर्वत्र चार ते पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी आठ-आठ दिवस पाणी येत नाही. काही भागात पाणी येते मात्र अत्यंत कमी दाबाने, आठ दिवस पुरेल इतके पाणी भरून ठेवण्यासाठी विद्युतपंपाचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाणी भरताना अंग, कपडे ओले होतात़ पायात चप्पल नसल्याने विजेच्या धक्क्याने दगावणाºयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे

यशवंत सादूल 

सोलापूर : सकाळच्या सातची वेऴ़़ पाण्याचा दिवस... वारद चाळीत पाणी भरण्यासाठी एकच लगबग... जयश्री अनिल मेडीदार या ४२ वर्षांच्या गृहिणी घरासमोरील पिण्याच्या पाण्याच्या नळातून विद्युत मोटारीच्या साहाय्याने पाणी भरण्याचा प्रयत्न करत होत्या... त्यासाठी वायरची जोडणी करताना विजेचा धक्का (शॉक) लागल्याने जयश्री या बेशुद्ध होऊन खाली पडल्या़ अंगात विद्युतसंचार चालूच होता़ हा प्रसंग समोरच खेळणाºया सिद्धेश्वर प्रशालेतील इयत्ता दहावीत शिकत असलेल्या धीरज घोंगडे याने हा बाका प्रसंग पाहिला़ पाहताच नववी शिकत असताना विज्ञान विषयातील विद्युतवाहक आणि रोधक वस्तूची आठवण झाली आणि जवळच अडगळीत पडलेल्या लाकडाचा वापर करून चपखलपणे विद्युतप्रवाह खंडित केला अन् जयश्रीकाकूंचा जीव वाचविला.

 भैय्या चौक ते नवीवेस रस्त्यावरील नरसिंग गिरजी मिलसमोरील वारद चाळ (त्रिकोण चाळ) येथे ३५ ते ४० कुटुंबे राहत आहेत. या चाळीत जयश्री मेडीदार या मागील पंचवीस वर्षांपासून येथे राहतात. त्यांच्या पतीचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. सोमवारी सकाळी सात वाजता पाणी आल्याने त्या पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार लावत असताना अचानक हातातील प्लगमधून बाहेर पडलेल्या वायरातील तारांशी स्पर्श होऊन त्यांना विद्युत धक्का बसला़ काही कळायच्या आत त्या जोराचा आवाज करून जागेवरच कोसळल्या. पायात चपला नाहीत, ओलसर हात आणि कपडे यामुळे धक्का लागला होता. समोरच मोकळ्या जागेत खेळणाºया दहावीत शिकत असलेल्या धीरज महेश धोंगडे याने हा प्रसंग पाहून घाबरून न जाता जवळच अडगळीत पडलेले लाकूड ओढून काढले. धैर्याने जयश्री आणि विद्युतप्रवाह चालू असलेल्या वायर यांच्यामध्ये धरून प्रवाह खंडित केला.

काकू बेशुद्ध पडल्याचे सर्वांना ओरडून सांगितले. सर्व चाळकरी गोळा झाले आणि शांताबाई जमखंडी, सुजाता उमराणी, महानंदा मसळी, मीनाक्षी बिराजदार आदी महिलांनी त्यांचे हातपाय चोळून त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न केला़ त्यांच्या डाव्या हातावर वायर धरलेल्या ठिकाणी जळून खोलवर जखम झाल्याचे आढळून आले. शुद्धीवर आल्यावर जवळील डॉक्टरांना दाखविण्यात आले. तपासणीनंतर जुजबी उपचार करून औषधे दिली. धोका टळल्याचे सांगून विश्रांतीचा सल्ला दिला. सिद्धेश्वर तरुण मंडळ व नगरसेवक चेतन नरोटे, कलप्पा मेडीदार, लिंगप्पा मसळी, सिद्धू बिराजदार, प्रभाकर जक्का आदींनी धीरजच्या धाडसाचे कौतुक करून सत्कार केला़ यावेळी चाळीतील लोक उपस्थित होते़

शहरात सर्रास विद्युत मोटारीने पाणी उपसा...- शहरात सर्वत्र चार ते पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी आठ-आठ दिवस पाणी येत नाही. काही भागात पाणी येते मात्र अत्यंत कमी दाबाने, आठ दिवस पुरेल इतके पाणी भरून ठेवण्यासाठी विद्युतपंपाचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते़ पाणी भरताना अंग, कपडे ओले होतात़ पायात चप्पल नसल्याने विजेच्या धक्क्याने दगावणाºयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

सिद्धेश्वर प्रशालेत दहावी इयत्तेत शिकत असलेल्या धीरजला समोरील बाका प्रसंग पाहताच नववी इयत्तेत शिकत असताना विज्ञान विषयातील विद्युतवाहक व विद्युतरोधक वस्तूंची आठवण झाली आणि जवळच अडगळीत पडलेल्या लाकडाचा वापर केला आणि विद्युतप्रवाह खंडित करीत त्याने जीव वाचविला़ - धीरज घोंगडे,विद्यार्थी, सिद्धेश्वर प्रशाला

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकmahavitaranमहावितरणHealthआरोग्यEducationशिक्षणSchoolशाळाscienceविज्ञान