शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचा परिणाम; ट्रकची चाकं थांबली... रेल्वेची चाकं फिरु लागली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:33 IST

एक वाहतूक सुरु तर दुसरी बंदच : मका, गव्हाची आयात तर चादरींची रेल्वेने होतेय निर्यात

ठळक मुद्देभुसार बाजारातून दररोज ५० ट्रक मालवाहतूक व्हायची जवळपास दररोजची ३० लाखांची उलाढाल ठप्प बाजारावर अवलंबून असणारे हजार हमाल, ५०० तोलार आणि ५०० चालक-वाहक अडचणीत सापडले सोलापुरातून जवळपास ७० लाखांच्या चादरी-टॉवेलची दररोज मालट्रकच्या माध्यमातून वाहतूक होत होती. आता ती रेल्वेच्या माध्यमातून सुरू झाली

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : लॉकडाऊनला काही घटकांनी व्यवसायाची संधी मानली तर काही उद्योग घटकांना घरघर ठरली आहे़ ट्रान्स्पोर्टने येणाºया मका आणि गव्हाची आयात तर चादरींची निर्यात ही चक्क १६ जुलैनंतर रेल्वेने सुरू झाली आहे़ सोलापुरात जवळपास ३५ हजार मालवाहतूक ट्रक-टेम्पो जागेवर थांबून असल्याने चालक, क्लीनरसह त्यावर अवलंबित असलेल्या अनेक घटकांची उपासमार सुरू आहे़ या व्यवसायाला चालना देणाºया सवलती शासनाने देण्याची मागणी मोटार मालक संघातून होत आहे.

सोलापुरात लॉकडाऊन काळात दुसºयांदा संचारबंदी अनुभवतोय़ जीवनावश्यक वस्तू वगळता इतर वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले़ परिणामत: सोलापूरच्या ट्रान्स्पोर्ट व्यवसायाचे मोठे नुकसान होत असून, असंख्य कुटुंबांची उपासमार होतेय, ती थांबवण्यासाठी संचारबंदी उठताच रेल्वे आणि एसटी महामंडळाच्या धर्तीवर ट्रान्स्पोर्टलाही ऊर्जितावस्था देणाºया योजना आखून त्या तत्काळ राबवण्याची मागणी मोटार मालक संघाच्या सदस्यांनी केली आहे.

सोलापुरी चादरींची रेल्वेने निर्यात सोलापुरातून दररोज ७० ट्रक चादर-टॉवेलची निर्यात सुरू होती़ लॉकडाऊन काळात याची निर्यात रेल्वे वॅगनने सुरू झाली़ पूर्व भागातून जवळपास ५३ ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून चादरी जात होत्या़ कोरोनामुळे पश्चिम बंगाल, मद्रास, बेंगलोर आणि उत्तर भारतातून सोलापुरी चादरीला मागणी वाढली आहे़ याशिवाय येथून काही औषधेही परराज्यात जात आहेत़ 

सोलापुरातून जवळपास ७० लाखांच्या चादरी-टॉवेलची दररोज मालट्रकच्या माध्यमातून वाहतूक होत होती. आता ती रेल्वेच्या माध्यमातून सुरू झाली आहे़ याचा खूप मोठा फटका मालवाहतूकधारकांना बसला आहे़ याला ऊर्जितावस्था देण्यासाठी हमाल, गोडावून कीपरला नव्याने पासेस वितरित करावेत़ - यशवंत साळुंखे संचालक, सोलापूर जिल्हा मोटार मालक संघ 

भुसार बाजारातून दररोज ५० ट्रक मालवाहतूक व्हायची़ जवळपास दररोजची ३० लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे़ या बाजारावर अवलंबून असणारे हजार हमाल, ५०० तोलार आणि ५०० चालक-वाहक अडचणीत सापडले आहेत़ या व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी मालवाहतुकीवरील इन्शुरन्स दर कमी करावा़- गोपाळ पोला,संचालक, सोलापूर जिल्हा मोटार मालक संघ 

केळी, डाळिंब वाहतुकीला खूप मोठा फटका बसला आहे़ संचारबंदीनंतर गोडावून भाडे, टायरच्या किमती आणि आरटीओच्या विविध महसुलात सवलत द्यावी़ इंधनाचा वापर नसताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी असताना पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याऐवजी वाढवून ट्रान्स्पोर्टधारकांना अडचणीत आणले आहे़ - वसीमभाई इनामदार सदस्य, मोटार मालक संघ, मार्केट यार्ड 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसायTransferबदली