शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

सुशिक्षितांना शहाणपण यावं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:33 AM

जग दिसामासांनी झपाट्याने बदलत आहे. सर्वच स्तरातील स्थित्यंतरे ही नित्याचीच झाली आहेत़ अनेक सोयी-सुविधा सुलभतेने उपलब्ध होत आहेत. तसंच ...

ठळक मुद्देया फलकावरच्या वाक्यातील संवेदनाही वरीलप्रमाणे बोथट व सवयीच्या का...?एकंदर परिणाम साक्षरता बºयाच अंशी सहजसुलभ झाली. ही शिक्षणातली क्रांती आम्हास सुशिक्षिततेची पदवी देऊन गेलीसर्वच स्तरातील स्थित्यंतरे ही नित्याचीच झाली आहेत़ अनेक सोयी-सुविधा सुलभतेने उपलब्ध होत आहेत

जग दिसामासांनी झपाट्याने बदलत आहे. सर्वच स्तरातील स्थित्यंतरे ही नित्याचीच झाली आहेत़ अनेक सोयी-सुविधा सुलभतेने उपलब्ध होत आहेत. तसंच शिक्षणाचं आहे. आज गावे, वाड्या, तांडे, साखरशाळा, पालावरच्या शाळांपासून उच्च महाविद्यालये, विद्यापीठ इतकंच काय तर नानाविध देशातील उच्च पदव्याही मिळविण्याची कला शिकलो. एकंदर परिणाम साक्षरता बºयाच अंशी सहजसुलभ झाली. ही शिक्षणातली क्रांती आम्हास सुशिक्षिततेची पदवी देऊन गेली. अक्षरं कळली, ती रेखाटता आली, त्यांचा अर्थ समजला. कळले पण ते अंगी वळले नाहीत म्हणून त्यातील संवेदनशीलता बोथट झाली म्हणूनच आमच्यावर कोणत्याही सावधानतेच्या सूचनांचा, वागण्याविषयीच्या नियमांचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही.

परवा एका कचराकुंडीजवळ एक फलक पाहिला मी़ एक मूर्ख आणि बरंच काही लिहिलं होतं. धूम्रपान करू नये, नो पार्किंग, विविध सिम्बॉल्स, येथे लघवी करू नये, युज मी..लिहिलेले डस्टबीन आरोग्यविषयक नियम, वृक्षारोपण, संवर्धन, बालहक्क विषयक नियम, १४ वर्षांखालील मुलांना काम नको, नो हॉर्न..वगैरे वगैरे हे आणि असेच सारे नियम पालकांचा खरंच एक सुशिक्षित म्हणून आमच्यावर या बाबीचा कितपत परिणाम होतो याचा स्वत:शी प्रामाणिक राहून प्रत्येक सुशिक्षित माणसांनी क्षणभर विचार केला तर लेखशीर्षक खरंच आता सुशिक्षितांना शहाणपण यावं..ही प्रार्थनाच म्हणा हवं तर करणं आज खरंच दुनियादारी करण्याची गरज आहे.

कामावर वेळेवर जावे, आपले नियमित काम वेळेवर पूर्ण करावे, आपल्या अंगी असणारी धमक कुणाशी हेवेदावे करण्यात घालविण्यापेक्षा प्रत्येकाला हेवा वाटावा असं करण्याचा प्रयत्न करावा. आपला व्यवसाय, पेशा, कामातील मूलभूत तत्वनिष्ठा, विचार, कौशल्ये, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये साध्य करण्यासाठी खरंच काहीच करता येऊ शकत नाही का? मी माझ्या पगारावर समाधानी आहे. तुम्ही माझ्या कामावर समाधानी आहात का? या फलकावरच्या वाक्यातील संवेदनाही वरीलप्रमाणे बोथट व सवयीच्या का...?

 निरंतर शिक्षण योजना राबविली गेली, त्याची ही चित्तरकथा़ निशाणी डावा अंगठा यासारख्या चित्रपटाद्वारे कशी झाली ते पहातोच पण आता त्याच्याही पलीकडे जाऊन ठोस काही उपाययोजना करता येऊ शकतील का? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. गतिमान जीवनात सावधानता बाळगणं, बाळगण्यासाठीची स्थितरता प्राप्त करणं, तेवढा संयम हवा़ आम्ही कीर्तन, भजन, ओव्या, भारुडे, कथा, सत्संग, प्रवचन, वाचन, ग्रंथवाचन, लेखन, व्याख्यान, श्रवण असे अनेक प्रकार नैमित्तिक करत राहतो. पण आम्ही पुन्हा या साºया गोष्टी समजून उमजून पुन्हा पुन्हा चुकीच्या का करतो? समस्या काय आहेत आम्हाला? का जाणिवा संपत आहेत? का जीवनात देखलेपण, झगमगाटाचं प्रदर्शन, एकट्यातला बटबटीतपणा वाढत आहे. आमच्या नेमप्लेट खालील डिग्रीतली फिलॉसॉफी जीवनात दिसत नाही किंवा धुसर दिसते. ती सुस्पष्ट व्हावी यसाठी काही करता येऊ शकेल का? सुशिक्षितांना छोट्या छोट्या गोष्टीतला शहाणपणा यावा यासाठी आणखी एखादं विद्यापीठ सुरु करावे लागेल का? सुखी माणसं अस्वस्थतेचा सदरा का वापरताना दिसतात़ दिवसेंदिवस सुखाची साधनं वाढत आहेत पण माणसं आतून अशांत तंद्रीत वागताना दिसतात़.

साध्या साध्या गोष्टीत चुका करणं विसरणं, हरवणं एखादी गोष्ट केलीच आहे, याची खात्री नसणं वुई आरऐवजी आय येम लाभणं म्हणजे सुशिक्षितपणा का? जसं आहोत तसं दिसणं, राहणं म्हणजे शहाणपणा असताना आम्ही अस्वाभाविक जगण्याचा वेडेपणा का करत आहोत आम्ही? म्हणूनच म्हणावंसं वाटतं सुशिक्षितांना ...भक्ती, मुक्तीचं कारण ही परहिताय, स्वधर्म रक्षण हेच असावं. माझ्या आनंदाचं कारणच इतरांना आनंदी ठेवणं असायला हवं, पण आज माणसं स्वत:च्या दु:खाने कमी, पण इतरांच्या सुखाने जास्त त्रस्त आहेत आणि हा आजार व्हायरल इन्फेक्शनसारखं झपाट्याने वाढतो आहे म्हणून आम्हाला आता जे शिकलो ते वाचतो, ऐकतो आहोत त्यात जीव-जाणिवा व चैतन्य निर्माण करावं लागेल, तरच सारे नियम आम्हाला कळून ते वर्तनात उतरतील. या लेखाच्या वाचनाने एकातरी सुशिक्षिताचा एक तरी नियम जाणिवेचे पालन किमान एकदा तरी  केल्यास हा लेखन प्रपंच सार्थकी ठरला, असं मला वाटेल. -रवींद्र देशमुख ( लेखक हे निवृत्त शिक्षक व अभ्यासक आहेत )

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा