शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या चार नक्षत्रांनी सोलापूर जिल्ह्याला दिली हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 14:39 IST

पाऊस पडेल या अपेक्षेवर बहुतांश शेतकºयांनी पेरण्या केल्या;सरासरीच्या अवघा ४३ टक्के पाऊस पडल्याची नोंद

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ९२ पैकी ६० मंडलांत ७० मि. मी. पेक्षा कमी पाऊस पडला५० दिवसांत ७० मि.मी. पर्यंत पडलेला पाऊस हा कधी-कधी पडलेला पाऊसअळींचा प्रादुर्भाव असल्याने जनावरांसाठी चारा असलेले मका पीकही अळ्याच फस्त करण्याची भीती

सोलापूर : एकामागून एक पावसाळ्यातील चार नक्षत्रांचा पाऊस म्हणावा तसा पडला नसल्याने यावर्षीचाही खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. पाऊस पडेल या अपेक्षेवर बहुतांश शेतकºयांनी पेरण्या केल्या असल्या तरी पिके मात्र येण्याची शक्यता मावळली आहे. सरासरीच्या अवघा ४३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी ३९ टक्के इतकाच पाऊस पडला होता. त्यामुळे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिके आली नाहीत. शेतकºयांनी पेरणीवर केलेला खर्चही वाया गेला होता. याशिवाय पाऊस पडला नसल्याने द्राक्ष, केळी, ऊस, डाळिंब व अन्य फळपिकांनाही फटका बसला आहे. उजनी धरण क्षेत्र, भीमा नदीकाठ तसेच अन्य जिल्ह्यातील धरणातील पाणी मिळालेला अल्पसा भाग वगळता अन्य ठिकाणी बागायती क्षेत्र पाहावयासही शिल्लक राहिले नाही. यावर्षी तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकºयांची होती. मात्र रोहिणी, मृग, आर्द्रा व पुनर्वसु ही चारही नक्षत्रे काही गावांचा अपवाद सोडला तर कोरडीच गेली आहेत. काही मंडलांत पाऊस बºयापैकी पडल्याची नोंद पर्जन्यमापकांच्या आधारे झाली असली तरी ती एका गावासाठीच मर्यादित असल्याचे सांगितले जाते. मंडलातील एक-दोन गावांतच पाऊस पडतो व त्याची नोंद होते, असे शेतकरी सांगतात. 

सोलापूर जिल्ह्यातील ९२ पैकी ६० मंडलांत ७० मि. मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे. काही मंडलांत तर ६ मि.मी. इतकाच पाऊस पडला आहे. ५० दिवसांत ७० मि.मी. पर्यंत पडलेला पाऊस हा कधी-कधी पडलेला पाऊस आहे. त्यामुळे जनावरांसाठी गवत येण्यासारखाही पाऊस पडलेला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बºयाच शेतकºयांनी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. काही शेतकºयांनी जनावरांसाठी मका पेरणी केली आहे. मात्र पाऊस नसल्याने उगवणही होणे कठीण आहे. उगवण झाली तर अळींचा प्रादुर्भाव असल्याने जनावरांसाठी चारा असलेले मका पीकही अळ्याच फस्त करण्याची भीती आहे. काही मंडलांत चांगला पाऊस पडला असला तरी सरासरी ४३ टक्के पाऊस पडल्याची नोंद मात्र झाली आहे. 

या मंडलांत पडला ७० मि.मी.पेक्षा कमी पाऊस 
- शेळगी, तिºहे, वळसंग, मुस्ती, विंचूर, खांडवी,वैराग, उपळे दुमाला, बानगाव, नारी, जेऊर, तडवळ, करजगी, किणी, वाघोली, कामती बु., शेटफळ, सावळेश्वर, नरखेड, पेनूर, टाकळी सिकंदर, मोडनिंब, लऊळ, सीना दारफळ, रोपळे क., टेंभुर्णी, म्हैसगाव, करमाळा, कोर्टी, केत्तूर, केम, जेऊर, उमरड, सालसे, अर्जुननगर, पंढरपूर, कासेगाव, तुंगत, पुळूज, चळे, करकंब, सांगोला, हातीद,नाझरा, संगेवाडी, शिवणे, माळशिरस, लवंग, सदाशिवनगर, इस्लामपूर, नातेपुते, अकलूज, दहिगाव,बोराळे, मरवडे, हुलजंती,भोसे, आंधळगाव,मारापूर आदी.

पडलेल्या पावसाच्या आधारे खरीप पेरणी झाली आहे. पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकरी पेरणी करु लागले आहेत. मात्र पिकांना पोषक पाऊस पडत नाही. त्यामुळे खरीप पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे. मात्र यापुढे चांगला पाऊस पडला तर तूर व मका ही पिके येऊ शकतात.
- बसवराज बिराजदार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेती