शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दुष्काळाची दाहकता; पाणवठ्यात दगड टाकून पाण्याचा केला फुगवटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 12:32 IST

नान्नज येथील माळढोक अभयारण्यातील वनपर्यवेक्षक वन्यप्राण्यांची भागवत आहेत तहान

ठळक मुद्देउत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे दुर्मिळ अशा माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. या अभयारण्यात विविध प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी गुण्यागोविंदाने राहतातकमी पर्जन्यमानामुळे माळढोक अभयारण्य परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई

वडाळा : सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची दाहकता दिसून येत आहे़ पाण्यासाठी रानोमाळ फिरणाºया ग्रामस्थांना पिण्याचे पाणी हे सुद्धा अमृत वाटू लागले आहे़ दुष्काळात पशुपक्ष्यांसह प्राण्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नान्नज (ता़ उ़ सोलापूर) येथील अभयारण्यातील वनपर्यवेक्षकांनी माळढोक क्षेत्रात ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करून प्राण्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे दुर्मिळ अशा माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. या अभयारण्यात विविध प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी गुण्यागोविंदाने राहतात; मात्र मागील काही वर्षापासून या भागात पडणाºया कमी पर्जन्यमानामुळे माळढोक अभयारण्य परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे.

पशुपक्ष्यांसह प्राण्यांची पाण्यावाचून होणारी तडफड व घशाला पडलेली कोरड, तहान भागविण्यासाठी वनपर्यवेक्षकांनी माळढोक परिसरात ठिकठिकाणी पाणवठे निर्माण केले आहेत़ या पाणवठ्यात कुठे टँकरव्दारे तर कुठे हातपंपातील पाण्याने पाणीपुरवठा करून पाणवठे भरून घेतले जातात.

 उत्तर सोलापूर तालुक्यात कोणत्याही प्रकारचे पाण्याचे स्रोत नसल्यामुळे व पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याची पातळी खूपच खोल गेली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील वृक्षांची ही पूर्णत: पानगळ झाली व जंगलातील असलेले गवतही पूर्ण वाळून गेले़ त्यामुळे वन्य प्राणीचाºयासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी इकडे-तिकडे सैराट फिरू लागले आहेत.

माळढोकच्या वनपर्यवेक्षकांनी वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोलापूर बार्शीरोड लगत असलेल्या अभयारण्यातील  नागनाथ मंदिराजवळील  पाणवठ्यांमध्ये हात पंपाने पाणी सोडले, परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पंपाला पाणी कमी येऊ लागले़ त्यामुळे वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाणवठ्यांमध्ये जेवढे हात पंपाने सोडता येईल तेवढे पाणी खेचून त्यामध्ये सोडले परंतु पाणवठा पूर्ण न भरता त्यामध्ये निम्म्याभागात दगड अंथरून पाण्याचा फुगवटा करुन वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई