शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

सोलापूरला पुन्हा मागे नेऊ नका; कडक संचारबंदीला सोलापूरकरांचा कडाडून विरोध

By appasaheb.patil | Updated: June 25, 2020 11:57 IST

‘लोकमत’समोर मांडल्या शहरवासियांनी भावना; शिस्त पाळू, नियमांचे पालन करण्याची नागरिकांनी दिली हमी

ठळक मुद्देसोलापूरकरांनो शहाणे व्हा : अख्ख्या महाराष्ट्रात फक्त इथंच संचारबंदीची वेळ का येतेय ?एकीकडे देश अनलॉक होत असताना सोलापुरात मात्र पुन्हा थोडी नव्हे तर चक्क १५ दिवस संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सरकारकडे पाठविला सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमधली वाढ हे प्रशासन यंत्रणेच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत असल्यामुळे ‘पुनश्च स्टे होम’चा संदेश प्रशासनाच्या वतीने दिला

सोलापूर : अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता कुठे सोलापूर शहर पूर्वपदावर येत आहे़ त्यात पुन्हा कडक संचारबंदीची अंमलबजावणी करून सोलापूरकरांना वेठीस धरू नका़ कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा खीळ बसवू नका, सोलापूरला मागे नेऊ नका असे मत मांडतानाच शिस्त पाळू, नियमांचे पालन करू अशीही हमी सोलापुरातील नागरिकांनी लोकमत समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली. तीन महिन्यांनंतर सुरू झालेले उद्योग-व्यापार रुळावर येत असताना पुन्हा संचारबंदी लागू करण्याच्या निर्णय म्हणजे पुनश्च हरिओम.

शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता आणखी पंधरा दिवस कडक संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव आहे. दोन दिवस निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली होती, सोलापुरात १ जूनपासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करीत विविध दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच सोलापूर शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग मात्र वाढत चालला आहे. त्यात नागरिक शिस्त व नियमांचे पालन करीत नसल्याचे सांगत प्रशासनाने संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे़ त्याबाबत गुरूवारी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे, त्यानंतर संचारबंदीबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

सोलापूर शहरात पुन्हा कडक संचारबंदी करणे योग्य आहे का याबाबत उद्योजक राम रेड्डी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, सोलापुरात पुन्हा कर्फ्यू लावला तर भूकमारी होईल. प्रशासनाला संचारबंदी लागू करायची असेल तर उद्योगधंदे सोडून करा, आता कुठे उद्योगधंदे पूर्वपदावर येत आहेत, पुन्हा बंद केल्यास सोलापूर मागे जाईल. विनाकारण फिरणारे, नियमांचा भंग करणाºयांवर कारवाई करा, कंटेन्मेंट झोनवर प्रशासनाने अधिक लक्ष दिल्यास कोरोनाची रुग्णसंख्या नक्कीच थांबेल असेही त्यांनी सांगितले.

 प्रसिध्द वकील अ‍ॅड. धनंजय माने म्हणाले की, मुंबई, पुण्याच्या धर्तीवर सोलापुरातही केवळ प्रतिबंधित क्षेत्र किंवा ज्या ठिकाणी कोरोनाचा जास्त प्रभाव आहे अशा ठिकाणी संचारबंदी लागू करावी. संपूर्ण शहरात संचारबंदी लागू केल्यास सोलापूरची अर्थव्यवस्था पुन्हा कोसळणार आहे.

उद्योजक केतन शहा म्हणाले की, वास्तविक पाहता सोलापुरात पुन्हा संचारबंदीची गरज नाही. प्रशासन आपल्या चुका लपविण्यासाठी जनतेवर कर्फ्यू लादत आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या घडीला रुग्ण कमी आहेत. तुरळक ठिकाणे वगळता सर्वच ठिकाणी शासकीय नियमांचे पालन होतेय, पुन्हा बंद केल्यास सोलापूरची अवस्था दयनीय होईल, अर्थव्यवस्था पूर्ण ढासळेल.

शिक्षणतज्ञ प्रा़ शशिकांत कलबुर्गी म्हणाले सोलापूरला पुन्हा संचारबंदी लागू करण्याची गरज नाही. लोक नियम पाळतात की नाही, याबाबत शासनाने लक्ष द्यायला हवे. पुन्हा संचारबंदी लावल्यास सर्वसामान्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल. प्रशासनाने बंद न करता शासकीय नियमांची लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. लोकांनीही मास्क, फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळायला हवेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका