शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

खोलीत बसून नियोजन नको, गावात जाऊन माहिती घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:38 PM

दक्षिण सोलापूर तालुका टंचाई आढावा बैठकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आदेश

ठळक मुद्देदक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांच्या उपस्थितीत टंचाई आराखडा नियोजन बैठकमंद्रुप, आहेरवाडी, रामपूर येथे पाणी टंचाई असून नव्याने टँकर देण्याची तसेच खेपा वाढवण्याची मागणी करण्यात आली पावसाळा येईपर्यंत ग्रामसेवक आणि तलाठ्यांना मुख्यालयात मुक्काम करणे सक्तीचे

सोलापूर :  ग्रामीण भागातील जनता पाणीटंचाई, जनावरांचा चारा आणि रोहयोच्या कामासाठी आक्रोश करीत असताना अधिकाºयांनी बंद खोलीत बसून दुष्काळाचे नियोजन करणे अयोग्य आहे.  गावात जा, जागेवर जाऊन माहिती घ्या, ग्रामस्थांशी बोला मग नियोजन करा, असे सक्त आदेश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी अधिकाºयांना दिले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांच्या उपस्थितीत टंचाई आराखडा नियोजन बैठकीत सहकारमंत्री बोलत होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,  सभापती सोनाली कडते,  उपसभापती संदीप टेळे, बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर, रामप्पा चिवडशेट्टी, श्रीमंत बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंद्रुप, आहेरवाडी, रामपूर येथे पाणी टंचाई असून नव्याने टँकर देण्याची तसेच खेपा वाढवण्याची मागणी करण्यात आली. टँकर मागणीच्या प्रस्तावाला प्रशासन प्रतिसाद देत नाही. काही गावांना अर्धा टँकर पाणीपुरवठा होतो तोही एखादीच खेप. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. तलाठी गावात येत नाहीत अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी करताच सहकारमंत्री काहीसे संतप्त झाले. त्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले.

आठ दिवसात अहवाल सादर करा, असे आदेश त्यांनी दिले. चारा छावण्या सुरु करण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन सहकारमंत्र्यांनी केले. तालुक्यात एकही संस्था पुढे येत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कंदलगावचे शरीफ शेख यांनी चारा छावण्या सुरू होत नसतील तर जनावरांची गणती करून शेतकºयांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची मागणी केली. चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला तरच प्रस्तावांना दोन दिवसात मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिले.

बैठकीला डॉ.सी.जी. हविनाळे, हणमंत कुलकर्णी, एम.डी. कमळे, शशिकांत दुपारगुडे, भारत बिराजदार, नागण्णा बनसोडे यांच्यासह तालुक्यातील सरपंच-ग्रामसेवक, शासकीय कर्मचारी उपस्थित होते.

अनुपस्थित तलाठ्याच्या निलंबनाचे आदेश- आहेरवाडीचे तलाठी गावात येत नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. बैठकीलाही ते उपस्थित नव्हते त्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश सहकारमंत्र्यांनी दिले.- पावसाळा येईपर्यंत ग्रामसेवक आणि तलाठ्यांना मुख्यालयात मुक्काम करणे सक्तीचे आहे. त्यात हयगय झाल्यास कठोर कारवाई करू, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिल्या.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखdroughtदुष्काळwater transportजलवाहतूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय