शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

देवेंद्र फडणवीसांकडून नव्या राजकारणाची मांडणी; सोलापूरचा 'पालक' कोण होणार? 'ही' नावे चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 20:31 IST

भाजप नेतृत्व जिल्ह्यात नव्या राजकारणाची मांडणी करण्याच्या प्रयत्नात आहे. यातून जयकुमार गोरे यांना सोलापूरचे पालकमंत्रीपद दिले जाऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर : महायुती सरकारचे खाते वाटप लवकरच होणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष आहे. पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील किंवा जयकुमार गोरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्ता भरणे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला. या विस्तारात येथील भाजप आमदारांना ठेंगा मिळाला. महायुतीमध्ये भाजप, शिंदेसेना, अजितदादा गटाने राज्यात कुठे कोणत्या पक्षाचे पालकमंत्री असतील याची निश्चिती केली आहे. पालकमंत्रीपद भाजपकडे आहे. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यादृष्टीने पालकमंत्र्यांची निवड महत्त्वाची ठरणार आहे. कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील यांचा गेल्या ३० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणाशी संबंध आहे. शहर आणि ग्रामीण भागातील राजकीय गटांची त्यांना माहिती आहे. गेल्या दीड वर्षांत पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्याचा कारभार हाताळला होता. त्यामुळे तेच पुन्हा पालकमंत्री होण्यासाठी भाजपचा एक गट प्रयत्नशील आहे.

गोरेंच्या निवडीमागचे राजकारण 

कॅबिनेटमंत्री जयकुमार गोरे शेजारच्या सातारा जिल्ह्यातील माणचे आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघाचा माढा लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. माढ्याच्या निवडणुकीमुळे त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणाशी कनेक्ट आहे. माढा लोकसभा निवडणुकीत पराभवाची सल भाजप नेतृत्वाच्या मनात आहे. या पराभवाचे उट्टे काढण्याच्या प्रयत्न सुरू आहेत. त्यातून भाजप नेतृत्व जिल्ह्यात नव्या राजकारणाची मांडणी करण्याच्या प्रयत्नात आहे. यातून जयकुमार गोरे यांना सोलापूरचे पालकमंत्रीपद दिले जाऊ शकते.

आमदारांना गटबाजीचे राजकारण नडले 

भाजप नेत्यांनी मंत्रिपदासाठी जिल्ह्यातील आमदारांचा विचार केला नाही. २०१४ ते २०१९ या कालावधीत जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली. या काळात मंत्र्यांमधील गटबाजी चर्चेत राहिली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जिल्ह्यातील दोन जागा गमाविल्या. भाजपच्या नेतृत्वाला केवळ आपल्या मतदारसंघात रमणारा आमदार नको आहे. सोलापूर जिल्ह्यात आपल्यासोबत किमान दोन-तीन आमदार निवडून आणणारा नेता हवा आहे. एकाला मंत्रिपद दिले; तर दुसरा आमदार नाराज होईल. त्यातून वाद वाढत राहतील, अशा काही मुख्य कारणांमुळे मंत्रिपद न मिळाल्याचे भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्यााने 'लोकमत'ला सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४