शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

देवेंद्र फडणवीसांकडून नव्या राजकारणाची मांडणी; सोलापूरचा 'पालक' कोण होणार? 'ही' नावे चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 20:31 IST

भाजप नेतृत्व जिल्ह्यात नव्या राजकारणाची मांडणी करण्याच्या प्रयत्नात आहे. यातून जयकुमार गोरे यांना सोलापूरचे पालकमंत्रीपद दिले जाऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर : महायुती सरकारचे खाते वाटप लवकरच होणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष आहे. पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील किंवा जयकुमार गोरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्ता भरणे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला. या विस्तारात येथील भाजप आमदारांना ठेंगा मिळाला. महायुतीमध्ये भाजप, शिंदेसेना, अजितदादा गटाने राज्यात कुठे कोणत्या पक्षाचे पालकमंत्री असतील याची निश्चिती केली आहे. पालकमंत्रीपद भाजपकडे आहे. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यादृष्टीने पालकमंत्र्यांची निवड महत्त्वाची ठरणार आहे. कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील यांचा गेल्या ३० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणाशी संबंध आहे. शहर आणि ग्रामीण भागातील राजकीय गटांची त्यांना माहिती आहे. गेल्या दीड वर्षांत पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्याचा कारभार हाताळला होता. त्यामुळे तेच पुन्हा पालकमंत्री होण्यासाठी भाजपचा एक गट प्रयत्नशील आहे.

गोरेंच्या निवडीमागचे राजकारण 

कॅबिनेटमंत्री जयकुमार गोरे शेजारच्या सातारा जिल्ह्यातील माणचे आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघाचा माढा लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. माढ्याच्या निवडणुकीमुळे त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणाशी कनेक्ट आहे. माढा लोकसभा निवडणुकीत पराभवाची सल भाजप नेतृत्वाच्या मनात आहे. या पराभवाचे उट्टे काढण्याच्या प्रयत्न सुरू आहेत. त्यातून भाजप नेतृत्व जिल्ह्यात नव्या राजकारणाची मांडणी करण्याच्या प्रयत्नात आहे. यातून जयकुमार गोरे यांना सोलापूरचे पालकमंत्रीपद दिले जाऊ शकते.

आमदारांना गटबाजीचे राजकारण नडले 

भाजप नेत्यांनी मंत्रिपदासाठी जिल्ह्यातील आमदारांचा विचार केला नाही. २०१४ ते २०१९ या कालावधीत जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली. या काळात मंत्र्यांमधील गटबाजी चर्चेत राहिली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जिल्ह्यातील दोन जागा गमाविल्या. भाजपच्या नेतृत्वाला केवळ आपल्या मतदारसंघात रमणारा आमदार नको आहे. सोलापूर जिल्ह्यात आपल्यासोबत किमान दोन-तीन आमदार निवडून आणणारा नेता हवा आहे. एकाला मंत्रिपद दिले; तर दुसरा आमदार नाराज होईल. त्यातून वाद वाढत राहतील, अशा काही मुख्य कारणांमुळे मंत्रिपद न मिळाल्याचे भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्यााने 'लोकमत'ला सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४