शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

एमपीएससीने घेतला निर्णय; फौजदारपदासाठी मैदानी गुण फक्त पात्रतेसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 16:20 IST

बौद्धिक गुणवत्तेला जास्त भर आणि शारीरिक दृष्टिकोनाला कमी महत्त्व दिले जात आहे

सोलापूर : एमपीएससीने नुकतेच नवीन परिपत्रक काढले आहे. त्यात पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी मैदानी चाचणीत ६० गुण प्राप्त करणारा उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असणार आहे, तसेच हे मैदानी चाचणीचे गुण निकालात ग्राह्य धरले जाणार नाहीत. हा निर्णय म्हणजे, बौद्धिक गुणवत्तेला जास्त भर आणि शारीरिक दृष्टिकोनाला कमी महत्त्व दिले जात आहे, असा आरोप उमेदवारांकडून केला जात आहे. यामुळे मैदानी चाचणीला वेळ देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होणार आहे, असे मतही व्यक्त करीत आहेत.

मैदानी परीक्षेमध्ये जास्त गुण मिळविण्यासाठी उमेदवार वर्षानुवर्षे घाम गाळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बराच वेळ शारीरिक चाचणीचा सराव करण्यात खर्च करीत आहेत; पण एमपीएससीच्या नवीन नियमानुसार मैदानी चाचणीसाठी क्वालिफाय गुणपुरतेच महत्त्वाचे मानले जाणार आहे आणि मैदानी गुण हे मुख्य निकालात न धरता फक्त मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचे गुण ग्राह्य धरले जाणार असून, त्यावर अंतिम निकाल यादी जाहीर केली जाणार आहे. हा निर्णय २०२० च्या भरती पासून लागू करावेत, असे सांगण्यात आले आहे.

यामुळे मैदानाचा कसून सराव करणाऱ्या उमेदवारांचा या निर्णयामुळे भ्रमनिरास झालेला आहे. या पदाची तयारी करणारे उमेदवार राहुल दिघे म्हणाले, पोलीस उपनिरीक्षक हे पद शारीरिक दृष्टीने सुदृढ असणारे पद आहे. आयोगाने त्याचीच किंमत शून्य केली आहे. कारण पोलीस उपनिरीक्षक हा १२ तासांपेक्षा जास्त काम करतो. उद्या आरोपींचा पिच्छा करणारा पोलीस सुदृढ नसला तर काय होईल? दरम्यान, पण या निर्णयाचा एसटीआय / एएसओ या राज्यसेवा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे.

उमेदवारांचे विरोधाचे कारण

पोलीस उपनिरीक्षक पदाची तयारी करत असताना ज्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेची तयारी कमी झालेली असते ते आपली कसर मैदानी चाचणीमधून भरून काढतात, तसेच पूर्वी १०० गुणांच्या मैदानी चाचणीचा फायदा ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना होत असे; परंतु नवीन नियमांचा फटका ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना बसणार आहे. त्यामुळे एमपीएससीने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, असे मत मैदानी प्रशिक्षक मिथुन पवार यांनी व्यक्त केले.

हा निर्णय घेतल्यामुळे पीएसआय या पदास योग्य शारीरिक क्षमता असणारे अधिकारी आयोगाला कसे मिळतील? निर्णय परीक्षा दोन महिन्यांवर असताना आताच का घेतला गेली ? मैदानी चाचणीचे गुण ग्राह्य न धरल्याने आता मुलांनी शारीरिक चाचणीसाठी जी २ ते ३ वर्षे मेहनत घेतली त्याचे काय? या प्रश्नांची उत्तरे आयोगाने द्यावीत.

मोहम्मद जागीरदार, उमेदवार

 

पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य, मैदानी चाचणी आणि मुलाखत या तीन टप्प्यांत चुरस असते. या तीनपैकी एकही टप्पा क्वालिफाय न करता गुणवत्तेनुसारच मेरिट लावले पाहिजे. मुख्य परीक्षेत मेरिट प्राप्तीनंतर फिजिकल गुणवत्तेनुसारच हवे. त्यामुळे गुणवत्तेला न्याय मिळेल. गुणवत्ता ही लेखीसाठी महत्त्वाची आहे तशीच शारीरिक चाचणीसाठी महत्त्वाची आहे. मुख्य, मैदानी चाचणी आणि मुलाखत या तिन्ही परीक्षा गुणवत्तेच्या आधारेच असाव्यात जेणेकरून मेरिटला महत्त्व राहील.

-दीपंकर जगताप, उमेदवार

 

एमपीएससीने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यासाठी वर्षाचा कालावधी लागतो. २०१८ च्या पीएसआय अंतिम निकालात बहुतांश विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीत ८० च्या वर गुण होते, तर ६० गुणांच्या पात्रतेचा काय उपयोग, यामुळे मैदानी चाचणी १०० गुणांचीच असावी किंवा एसटीआय / एएसओप्रमाणे मुख्य परीक्षेनंतर अंतिम निकाल लावावेत.

अमित कोळी, उमेदवार

टॅग्स :SolapurसोलापूरMPSC examएमपीएससी परीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस