शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

थकबाकी वसुलीत ‘महावितरण’ची सौजन्यशीलता; पेपरलेस अन् डिजिटल कारभारावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:48 PM

कोरोना अन् अतिवृष्टीतून वीजमंडळ सावरतेय...

सोलापूर :अनलॉकनंतर वीज बिल वसुलीला परवानगी मिळाली असली तरी वीज बिल माफ होईल, या आशेने ग्राहक बिल भरण्यास तयार होईनात. अशातच महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.एरव्ही बिलाची थकबाकी राहिली तर ग्राहकांची जोडणी कापली जायची; पण कोरोना काळाने महावितरणच्या वसुली धोरणातही नरमता आली आहे. कंपनीचे कर्मचारी व अधिकारी ग्राहकांना सौजन्यशीलतेने बिल भरण्याची विनंती करताना दिसून येेत आहेत.

कोरोनाकाळात सर्वकाही बंद होते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह कारखानदारांची आर्थिक घडी विस्कटलेली होती. त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या वीज बिलांची वसुली करण्यास शासनाने स्थगिती दिली. त्यामुळे महावितरणचे प्रचंड नुकसान झाले. अशातच अतिवृष्टीमुळे घरगुती ग्राहकांसह शेतीपंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोरोनासारखी गंभीर परिस्थिती व अतिवृष्टीसारखं संकट असताना महावितरणने मोठ्या धैर्याने ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न केला अन् यशस्वी झाला. कोरोनाकाळात फोनव्दारे तक्रार घेऊन ग्राहकांच्या तक्रारीचे निराकारण केले, मोबाईलवरून रीडिंग पाठविणे, एसएमएसव्दारे बिल, ऑनलाइन वीज बिल भरणा, वीजपुरवठा खंडित झाल्यास स्काडाप्रणालीच्या माध्यमातून आवश्यक त्याठिकाणी दुरुस्तीची कामे केली.

कोरोना अन् अतिवृष्टीतून वीजमंडळ सावरतेय...

कोरोनाकाळात वीज बिल वसुली झाली नाही. आधीच नुकसानीत असलेल्या महावितरणचे अतिवृष्टीने १३ ते १५ कोटींचे नुकसान केले. वीज बिल वसुलीला शासनाने स्थगिती दिल्याने महावितरणच्या वसुलीच्या मोहिमा बंद करण्यात आलेल्या आहेत. शासनाने नुकसानीपोटी भरपाईची रक्कम दिली असली तरी थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान आता महावितरणसमोर आहे. मात्र कोरोना व अतिवृष्टीच्या काळातील नुकसानीतून महावितरण आता हळूहळू सावरू लागलेले आहे.

कोरोना अन् अतिवृष्टीने महावितरणचे मोठे नुकसान झाले. कोरोनाकाळातही जिवाची पर्वा न करता महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, जनमित्रांनी रात्रंदिवस काम करून सुरळीत वीजपुरवठा करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला. कोरोनानंतर महावितरणमध्ये डिजिटल व पेपरलेस कारभारावर अधिकचा भर दिला आहे.

- ज्ञानदेव पडळकर,

अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर मंडल

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणdigitalडिजिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या