शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

‘एसबीआय’ची ग्राहक सेवा केंद्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 4:06 AM

स्टेट बँक आॅफ इंडियाची (एसबीआय) ग्राहक सेवा केंद्रे १ एप्रिल २०१८ पासून बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती करस्पॉन्डट वेल्फेअर असोसिएशनने दिली आहे.

- संताजी शिंदे सोलापूर : स्टेट बँक आॅफ इंडियाची (एसबीआय) ग्राहक सेवा केंद्रे १ एप्रिल २०१८ पासून बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती करस्पॉन्डट वेल्फेअर असोसिएशनने दिली आहे. त्यामुळे देशात ४,४५४ वैयक्तिक व्यवसाय प्रतिनिधींवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.ग्रामीण भागातील लोकांची नाळ राष्ट्रीयीकृत बँकेशी जोडण्यासाठी २0१0 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात अर्थसंकल्पात बँकिंग सेवा देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार राष्ट्रीयकृत बँकांनी २ हजार लोकसंख्येच्या गावात ग्राहक सेवा केंद्र सुरू केले. खाते उघडण्यासाठी वैयक्तिक व्यवसाय प्रतिनिधींची निवड केली होती. प्रतिनिधींना बँकेत खाते उघडणे व अन्य ट्रान्झॅक्शनवर कमिशनच्या स्वरूपात मानधन दिले जात होते.अटल पेन्शन, जीवनज्योती, सुकन्या योजना, व्यक्तिगत अपघात विमा, शिष्यवृत्ती, सामाजिक अर्थसहाय्य आदी योजनांची माहिती ग्राहकांना मिळत असताना वर्षभरापासून ही सेवा बंद करण्याचा घाट घातला जात होता. त्याविरोधात वैयक्तिक व्यवसाय प्रतिनिधींनी १९ सप्टेंबर व २१ मार्चला मुंबईत आझाद मैदानावर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले होते. मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही.>३१ मार्चला मुंबईत स्टेट बँक एलएचओ कार्यालयात व्यवसाय प्रतिनिधींच्या करस्पॉडंट वेल्फेअर असोसिएशन सोबत बैठक झाली. त्यात तुमचा करार संपल्याचे सांगण्यात आले. १ एप्रिल २0१८ पासून राज्यातील ४४५ प्रतिनिधींसह देशभरातील सुमारे ४,४५४ हजार तरूणांवर बेरोजगाराची कुºहाड कोसळली, असे करस्पॉन्डट वेल्फेअर असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष राजाराम आवळे यांनी सांगितले.

टॅग्स :SBIएसबीआय