शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धक्कादायक; जीवघेण्या सोलापुरी ताडीमध्ये क्लोरल हायड्रेट, गांजाचे मिश्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 14:21 IST

पन्नास ठिकाणी विक्री; अधिकृत केंद्रे बंद असताना रहिवासी परिसरात केला जातोय धंदा

ठळक मुद्देदोनशे ते तीनशे ग्रॅम वजनाचे एक प्लास्टिक पाकीट घरगुती ताडी विक्री करणाºयांच्या हातात सुपूर्द केले जातेक्लोरल हायड्रेट (साधारण १०० ग्रॅम), तुरटी (साधारण १०० ते १५० ग्रॅम ) तसेच पिवळसर गांजा असतो

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : क्लोरल हायड्रेट मिश्रित जीवघेण्या ताडीची विक्री सोलापुरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरात पन्नासहून अधिक ठिकाणी घरगुती परिसरात अशी केमिकल मिश्रित ताडीची विक्री जोरात सुरू आहे. यामध्ये गांजाही मिसळला जात असल्याचे माहितगाराने सांगितले. खाकीवर्दीचा आश्रय मिळाल्याने अशा जीवघेण्या ताडीचा काळा धंदा जोरात सुरू आहे. 

क्लोरल हायड्रेट हे एक नशेली पदार्थ आहे. नशा निर्माण करणारी पांढरी पावडर म्हणूनही याची ओळख आहे. यास गुंगीचे औषध म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. क्लोरल हायड्रेटचे वारंवार सेवन केल्यास त्याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम जाणवतात. सोलापुरात अधिकृत ताडी विक्री केंद्रे बंद आहेत. नैसर्गिक ताडीची सवय असलेल्यांना आता केमिकल मिश्रित ताडीची गोडी लागली आहे.

पूर्वभागातील तेलुगू भाषिकांमध्ये तडीची नशा करणारे अनेकजण आहेत. याच परिसरात घरगुती ताडी विक्री केंद्रे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. रविवार आणि बुधवारी ताडीला चांगली मागणी असते. १५ ते २५ रुपये असे प्रति बाटलीचे (६५० मिलिलिटर) दर आहेत. आंध्र आणि कर्नाटक परिसरातून क्लोरल हायड्रेट पावडर आणली जात असल्याची माहिती आहे.

क्लोरल हायड्रेट हे केमिकल जीवघेणे आहे. त्याचे वारंवार सेवन केल्यास शरीरातील शारीरिक क्षमता कमकुवत बनते. निद्रानाश उद्­भवतो. चिडचिडपणा वाढतो. नसा ढिल्या पडतात. पिणाºयांची सारखी गोंधळलेली अवस्था असते. सवय झाल्यानंतर नियमित वेळेला ताडी न घेतल्यास उलटी होणे, अचानक चक्कर येऊन पडणे, भूक न लागणे, चिडचिडपणा वाढणे असे अनेक आजार उद्भवतात.

कशी बनते केमिकल ताडी ?

दोनशे ते तीनशे ग्रॅम वजनाचे एक प्लास्टिक पाकीट घरगुती ताडी विक्री करणाºयांच्या हातात सुपूर्द केले जाते. त्याची किंमत जवळपास दोन ते अडीच हजार रुपये इतकी असते. यात क्लोरल हायड्रेट (साधारण १०० ग्रॅम), तुरटी (साधारण १०० ते १५० ग्रॅम ) तसेच पिवळसर गांजा असतो. या नशेली पदार्थांचे मिश्रण केले जाते. एका तांब्यात एक लिटर पाणी टाकून याचे ते मिश्रण बनवतात आणि २४ ते ४८ तास भिजत ठेवतात. त्यानंतर त्या एक लिटर केमिकल मिश्रित पाण्याचे ( अत्यंत कडक आणि कडवट ) ताडीत रूपांतर होते. जवळपास तीस ते चाळीस लिटर पाण्यात प्युअर ताडी टाकून चाळीस बाटल्यांची गाडी बनवली जाते. कडवटपणा कमी करण्यासाठी यात दोन ते तीन किलो साखर मिक्स करतात.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी