शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

शिक्षणामध्ये बदल आवश्यक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 12:27 IST

आपल्या देशामध्ये अलीकडच्या काळात पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. त्यानंतर भारत सरकारने त्यांना सडेतोड उत्तर दिले. अशा प्रकारच्या कारवाया आपल्या ...

ठळक मुद्देआपल्या देशात येणारा दहशतवादी या विद्यार्थ्यांनी नजरेतून ओळखला पाहिजेया देशातील शिक्षणातील सर्वात मोठी गंमत म्हणजे नोकरीसाठी शिक्षण अशी पालकांची धारणा झालेली

आपल्या देशामध्ये अलीकडच्या काळात पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. त्यानंतर भारत सरकारने त्यांना सडेतोड उत्तर दिले. अशा प्रकारच्या कारवाया आपल्या शेजारच्या देशांकडून सतत घडत असतात. आपण स्वत:हून कधीही कोणावरही हल्ला केला नाही आणि भविष्यातही करणार नाही,परंतु आपल्या देशावर अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया जर होत असतील तर त्याला तोंड देण्यासाठी  आपण फक्त सैनिकांवरच अवलंबून राहणार का?

सैनिक आमच्या देशाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यानिमित्तानं भारत सरकारला सांगावंसं वाटतं की या देशाचा प्रत्येक नागरिक हा सैनिक झाला पाहिजे. देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तयार असला पाहिजे. 

यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे.आपल्या भारत देशातील प्रत्येक शाळेमध्ये प्राथमिक स्तरापासून सैनिकी शिक्षणाची व्यवस्था असली पाहिजे. भविष्यात तुम्ही कोणत्याही विषयांमध्ये प्रगती करा. सैनिकी शिक्षण हे अनिवार्य असलेच पाहिजे. आज आपल्या देशात काही मोजक्याच सैनिकी शाळा आहेत. त्यामध्ये प्रवेश मिळणं ही सुद्धा अत्यंत अवघड गोष्ट आहे.आपल्या भारतातील प्रत्येक शाळा ही सैनिकी शाळा बनली पाहिजे.

आमच्या देशातल्या प्रत्येक शाळेमध्ये सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांना शिक्षक म्हणून नेमणूक दिली पाहिजे. या विद्यार्थ्यांना या माजी सैनिकांनी सैनिकी शिक्षण दिले पाहिजे. भविष्यामध्ये अशा प्रकारचा हल्ला आपल्या देशावर करण्याचे धाडस कुणीही करू नये. यासाठी हे शिक्षण अत्यावश्यक आहे. हे दहशतवादी कधी, कुठे, कसा हल्ला करतील सांगता येत नाही. त्या वेळेला आमचा नागरिक पळून जाता कामा नये. अशा प्रसंगांमध्ये त्या नागरिकाने त्या ठिकाणी उभे राहून ठामपणे या हल्ल्याचा प्रतिकार केला पाहिजे.यासाठी प्राथमिक स्तरापासून त्याला प्रशिक्षणाची गरज आहे. 

यानिमित्ताने भारत सरकारने हा विचार लक्षात घेतला पाहिजे. या सेवानिवृत्त सैनिकांना सुद्धा शाळांमध्ये काम करायला निश्चित आवडेल. त्यांच्या माध्यमातून आमचा प्रत्येक विद्यार्थी सैनिक झाला पाहिजे. शालेय शिक्षण घेत असतानाच त्याला सैनिकी प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. सैनिकी शिक्षण घेतलं याचा अर्थ त्यांना भविष्यात सैनिकाची नोकरी केलीच पाहिजे असं नाही. भविष्यात तो कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असेल पण युद्धाच्या प्रसंगी, दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा प्रसंगी तो सर्वार्थाने समर्थ राहील. आपल्या देशात येणारा दहशतवादी या विद्यार्थ्यांनी नजरेतून ओळखला पाहिजे. 

जगातल्या प्रत्येक देशाला आमच्या भारतातला प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे हे लक्षात येईल. जगातला कोणताही देश आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही.जर त्यांनी अशा प्रकारचा भ्याड हल्ला केला तर आमचा प्रत्येक नागरिक त्या त्या परिसरातून आपल्या सैनिकांना मदत करण्यासाठी तत्पर राहील. सैनिकांच्या मनामध्ये सुद्धा मी एकटा नाही, या देशातला प्रत्येक नागरिक माझ्यासोबत आहे हे मानसिक बळ त्याला मिळेल.

प्रत्यक्ष अशा घटना घडल्यानंतर त्या भागातला प्रत्येक नागरिक आमच्या सैनिकांच्या मदतीला धावून जाईल. तो दहशतवादी हल्ला त्वरित परतवून लावेल. जगातल्या प्रत्येक दहशतवाद्याला आपल्या देशाची भीती वाटली पाहिजे.भारताच्या नादाला लागून काही उपयोग नाही. आम्ही भारताच्या विरुद्ध वक्रदृष्टी केली तर भारत आम्हाला सोडणार  नाही. अशा प्रकारची भीती जगातल्या प्रत्येक देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. यासाठी हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. याची अंमलबजावणी झाली पाहिजे.   

या देशातील शिक्षणातील सर्वात मोठी गंमत म्हणजे नोकरीसाठी शिक्षण अशी पालकांची धारणा झालेली आहे. हा विचार बदलला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर आपला देश या जगामध्ये सर्वार्थाने संपन्न आणि समृद्ध राहील.- डॉ. अनिल सर्जे(लेखक संगीत तज्ज्ञ आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाexamपरीक्षा