शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

सावधान; मोबाईल वापरल्यास दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 15:22 IST

सायबर सेलच्या माध्यमातून असे चोरीला गेलेले मोबाईल शोधण्याचे काम सुरू 

ठळक मुद्देबहुतांश गुन्ह्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेतघरातून, बाजारातून खिशातून किंवा पर्समधून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत आहेमोबाईल महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यांत, देशभर कोठेही गेला तरी तो शोधून काढता येतो

सोलापूर : शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये १६८ गुन्हे दाखल झाले आहेत. मोबाईल सापडल्यास तो तत्काळ पोलीस ठाण्यात जमा करावा, अन्यथा संबंधितांवर चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असेल तर तो जेव्हा चालू होईल तेव्हा ट्रेसिंगद्वारे पोलिसांना सापडतो. सायबर सेलच्या माध्यमातून असे चोरीला गेलेले मोबाईल शोधण्याचे काम सुरू आहे. 

शहरातील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजार पेठा, वर्दळीच्या ठिकाणी मोबाईल हरवणे किंवा चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. कमीत कमी ५ आण्1िा जास्तीत जास्त ३० ते ४० हजार रुपये किमतीचे मोबाईल हरवल्याच्या किंवा चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. तक्रारींची शहानिशा होऊन पोलीस उपायुक्तांच्या सहीने मोबाईलचा शोध घेण्याचे पत्र तयार केले जाते.

तक्रारीवरून संबंधित मोबाईलचा ईएमआय नंबर बीएसएनएल, आयडिया, एअरटेल, जीओ आदी कंपन्यांना दिला जातो. कंपन्या संबंधित मोबाईलच्या ईएमआय नंबरवर ट्रेसिंग लावतात. हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलमध्ये दुसरे सीम कार्ड घालून वापर केला तरी तो ईएमआय नंबरवरून कोठे आहे हे समजते. मोबाईल कोणत्या भागात आहे, त्याच्यामध्ये कोणते सीम कार्ड घालण्यात आले आहे, तो नंबर कोणता आहे. हे कंपनीला समजते, त्यानुसार सायबर सेलला माहिती दिली जाते. सायबर सेल संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देऊन मोबाईलचा शोध घेतला जातो. 

बहुतांश गुन्ह्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भादंवि कलम ३१९ प्रमाणे मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संबंधित चोरट्याला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. सध्या घरातून, बाजारातून खिशातून किंवा पर्समधून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत आहे. हा मोबाईल महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यांत, देशभर कोठेही गेला तरी तो शोधून काढता येतो. यासाठी फक्त मोबाईल चालू होणे आवश्यक आहे. पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलच्या माध्यमातून नुकतेच १३ मोबाईल ट्रेस झाले असून ते हस्तगत झाले आहेत. मोबाईल पुन्हा संबंधित व्यक्तींना देण्यात आले आहेत. 

सावधान राहा, मोबाईलची काळजी घ्या : अरुण फुगे- आज मोबाईल ही काळाची गरज होऊन बसली आहे. प्रत्येक क्षेत्रात मोबाईलवरून काम करणे शक्य झाले आहे. कामाचा भाग व स्वत:ची सोय म्हणून आपण महागडे मोबाईल खरेदी करतो. मात्र त्याची काळजीही तितकीच घेतली पाहिजे. लोकांनी सापडलेला मोबाईल जवळ ठेवू नये, टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. मोबाईल कधीही सापडू शकतो, गुन्हा दाखल होऊन शिक्षा होऊ शकते. सेकंड हँड मोबाईल घेताना त्याची सत्यता पडताळून पाहिले पाहिजे. शक्यतो सर्वांनी आपल्या स्वत:च्या नावाचा मोबाईल वापरणे योग्य राहील, असे आवाहन सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी