शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

सावधान; मोबाईल वापरल्यास दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 3:20 PM

सायबर सेलच्या माध्यमातून असे चोरीला गेलेले मोबाईल शोधण्याचे काम सुरू 

ठळक मुद्देबहुतांश गुन्ह्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेतघरातून, बाजारातून खिशातून किंवा पर्समधून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत आहेमोबाईल महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यांत, देशभर कोठेही गेला तरी तो शोधून काढता येतो

सोलापूर : शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये १६८ गुन्हे दाखल झाले आहेत. मोबाईल सापडल्यास तो तत्काळ पोलीस ठाण्यात जमा करावा, अन्यथा संबंधितांवर चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असेल तर तो जेव्हा चालू होईल तेव्हा ट्रेसिंगद्वारे पोलिसांना सापडतो. सायबर सेलच्या माध्यमातून असे चोरीला गेलेले मोबाईल शोधण्याचे काम सुरू आहे. 

शहरातील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजार पेठा, वर्दळीच्या ठिकाणी मोबाईल हरवणे किंवा चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. कमीत कमी ५ आण्1िा जास्तीत जास्त ३० ते ४० हजार रुपये किमतीचे मोबाईल हरवल्याच्या किंवा चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. तक्रारींची शहानिशा होऊन पोलीस उपायुक्तांच्या सहीने मोबाईलचा शोध घेण्याचे पत्र तयार केले जाते.

तक्रारीवरून संबंधित मोबाईलचा ईएमआय नंबर बीएसएनएल, आयडिया, एअरटेल, जीओ आदी कंपन्यांना दिला जातो. कंपन्या संबंधित मोबाईलच्या ईएमआय नंबरवर ट्रेसिंग लावतात. हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलमध्ये दुसरे सीम कार्ड घालून वापर केला तरी तो ईएमआय नंबरवरून कोठे आहे हे समजते. मोबाईल कोणत्या भागात आहे, त्याच्यामध्ये कोणते सीम कार्ड घालण्यात आले आहे, तो नंबर कोणता आहे. हे कंपनीला समजते, त्यानुसार सायबर सेलला माहिती दिली जाते. सायबर सेल संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देऊन मोबाईलचा शोध घेतला जातो. 

बहुतांश गुन्ह्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भादंवि कलम ३१९ प्रमाणे मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संबंधित चोरट्याला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. सध्या घरातून, बाजारातून खिशातून किंवा पर्समधून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत आहे. हा मोबाईल महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यांत, देशभर कोठेही गेला तरी तो शोधून काढता येतो. यासाठी फक्त मोबाईल चालू होणे आवश्यक आहे. पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलच्या माध्यमातून नुकतेच १३ मोबाईल ट्रेस झाले असून ते हस्तगत झाले आहेत. मोबाईल पुन्हा संबंधित व्यक्तींना देण्यात आले आहेत. 

सावधान राहा, मोबाईलची काळजी घ्या : अरुण फुगे- आज मोबाईल ही काळाची गरज होऊन बसली आहे. प्रत्येक क्षेत्रात मोबाईलवरून काम करणे शक्य झाले आहे. कामाचा भाग व स्वत:ची सोय म्हणून आपण महागडे मोबाईल खरेदी करतो. मात्र त्याची काळजीही तितकीच घेतली पाहिजे. लोकांनी सापडलेला मोबाईल जवळ ठेवू नये, टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. मोबाईल कधीही सापडू शकतो, गुन्हा दाखल होऊन शिक्षा होऊ शकते. सेकंड हँड मोबाईल घेताना त्याची सत्यता पडताळून पाहिले पाहिजे. शक्यतो सर्वांनी आपल्या स्वत:च्या नावाचा मोबाईल वापरणे योग्य राहील, असे आवाहन सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी