शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

 'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.'

By appasaheb.patil | Updated: April 16, 2019 16:35 IST

नितीन गडकरी यांनी सोलापुरातील पार्क मैदानावर आयोजित भाजप संकल्प मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवर जोरदार टिका केली

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी आज सोलापुरातील पार्क मैदानावर भाजपचा संकल्प मेळावा देशात पुढील काळात १५ एक्सप्रेस हायवे बांधण्यात येणार - नितीन गडकरी देशात मुंबई ते दिल्ली या मार्गावर १२ लेनचा रस्ता बांधण्यात येणार - नितीन गडकरी

सोलापूर : 'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.' अशा शब्दात नितीन गडकरी यांनी सुशीलकुमार शिंदे आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर खोचक टीका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी आज सोलापुरातील पार्क मैदानावर आयोजित भाजप संकल्प मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ़ प्रशांत परिचारक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शिवाजीराव सावंत, महापौर शोभा बनशेट्टी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी आमदार नरसिंग मेंगजी, इंदिरा कुडक्याल, प्रविण डोंगरे, प्रा़ मोहिनी पत्की, शिवशरण आण्णा पाटील, माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे आदी शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या सभेमध्ये त्यांनी सुशील कुमार शिंदे यांच्यावर आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'म्हातार वयात लोकसभा निवडणुकीसाठी सुशीलकुमार शिंदे कशाला उभे राहिले माहिती नाही' अशा शब्दात नितीन गडकरींनी शिंदेंवर घणाघात केला. याचवेळी मोदी सरकारने चार वर्षात केलेल्या कामगिरीवर भाष्य केले. देशात मुंबई ते दिल्ली या मार्गावर १२ लेनचा रस्ता बांधण्यात येणार आहे. हा जगातील मोठा रस्ता असणार आहे. याशिवाय देशात पुढील काळात १५ एक्सप्रेस हायवे बांधण्यात येणार असल्याचीही माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही घणाघात केला. 'मुसलमान, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूरांची गरिबी हटली का? काँग्रेस पक्षाने गरिबी हटवली, ती कार्यकर्ते, नेते, चेले चपाट्यांची गरिबी हटवली.' असंही नितीन गडकरी म्हणाले.राजकारण हा आमचा धंदा नाही. राष्ट्रनिमार्णाचे प्रभावी उपकरण आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था 'दिल के टुकडे हुए हजार एक यहा गिरा, एक वहा गिरा.' अशी झाली आहे. ७० वषार्चा इतिहास हा बेईमानी आणि गद्दारीचा इतिहास आहे."  अशी टीकाही नितीन गडकरी यांनी केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखPrashant Paricharakप्रशांत परिचारक