शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

सोलापुरातील भिमाईची वस्ती ; लोकवर्गणीतून साकारला बौद्धांचा दानमय बौद्धविहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 13:25 IST

न्यू बुधवार पेठ : आंबेडकरी चळवळीबरोबर रुजवला बौद्ध धम्म

ठळक मुद्दे९00 विद्यार्थ्यांनी रिपब्लिकन युवक ऐक्य आंदोलन समितीची स्थापना १९७८-७९ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणात काढण्यात आली, ती आजतागायत कायम

संताजी शिंदे सोलापूर : एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ करीत असताना दुसरीकडे त्याच बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करून तो रुजवण्याचा प्रयत्न न्यू बुधवार पेठ येथे करण्यात आला. समाजातील लोकांकडून वर्गणीच्या माध्यमातून पैसा गोळा करून बौद्धांचा दानमय बुद्धविहार रमापती चौकात उभारण्यात आला. 

पूर्वी बागले वस्तीनंतर आंबेडकर नगर नावाने ओळखला जाणारा भाग आज न्यू बुधवार पेठ म्हणून परिचित आहे. न्यू बुधवार पेठमध्ये एकूण १४ चौक आहेत, प्रत्येक चौकात एक बुद्ध विहार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये शिक्षण आणि धम्म या दोन गोष्टींवर जास्त भर दिला होता. बाबासाहेबांचा हा विचार अंगीकारून न्यू बुधवार पेठ येथे शिक्षणाबरोबर धम्म चळवळ मोठ्या जोमाने सुरू झाली होती. जनार्दन शिंदे, एस.आर. गायकवाड, बाळासाहेब बनसोडे, राजा कदम, अंबादास घोडकुंबे, चंद्रकांत कोळेकर, मुकुंद कांबळे, बाबू बनसोडे आदींनी चळवळीत स्वत:ला झोकून दिले होते. दरम्यान, कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि बी.सी. कांबळे या दोन गटांमध्ये चळवळ विभागली गेली होती. 

दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेणाºया ९00 विद्यार्थ्यांनी रिपब्लिकन युवक ऐक्य आंदोलन समितीची स्थापना केली होती. सोलापुरात त्याकाळी दादासाहेब गायकवाड गट व बी.सी. कांबळे गटाच्या दोन मिरवणुका निघत होत्या. ऐक्य आंदोलन समितीमधील बाबू सितासावंत, महादेव लोंढे, कामगार नेते अशोक जानराव, भालचंद्र गवळी, वसंत भालशंकर, जनार्दन शिंदे, प्रकाश शिवशरण आदींनी सक्रिय सहभाग घेऊन त्याकाळी निघणाºया दोन मिरवणुका एकत्र आणल्या. १९७८-७९ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणात काढण्यात आली, ती आजतागायत कायम आहे.

समाजासाठी बुद्धविहार असावा असा विचार पुढे आला. बुद्ध शासन सभा आणि भारतीय बौद्ध महासभा अशा दोन संघटनांच्या माध्यमातून काम चालत होते. बुद्ध विहारासाठी न्यू बुधवार पेठ येथील पक्ष, गट आणि संघटना बाजूला ठेवून सर्व समाज एकत्र आला. १९७४ साली विहाराच्या कामाला सुरुवात झाली, १९७३ साली समिती स्थापन झाली. पहिले अध्यक्ष बी.नी. माने होते. विहार उभारण्यात एस.व्ही. शिवशरण, हिराबाई विटेकर, विठाबाई शिवशरण, प्रल्हाद चंदनशिवे, बाबू चौधरी, देविदास चंद्रमोरे गुरुजी, पी.एच. भालेदार, शि.गु. सोनकांबळे, विठ्ठल कांबळे, बसप्पा कांबळे, ए.टी. दावणे, हिराप्पा इंगळे, मच्छिंद्र सोनवणे, नवनाथ वाघमारे, प्रल्हाद कांबळे, लोकाप्पा दोड्यानूर आदींचा समावेश होता. महास्थवीर यू नंदिया यांनी ब्रह्मदेशातून पंचधातूची मूर्ती मागवली होती. महास्थवीर यू नंदिया व भन्ते शिलरत्न यांच्यामुळे प्रत्येक घरात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. 

भव्य डॉ. आंबेडकर उद्यान उभे राहिले...

  • - १९९२-९७ मध्ये तत्कालीन नगरसेवक  अशोक जानराव होते, त्यांनी चंडक पॉलिटेक्निक शेजारी असलेल्या जागेत डॉ. आंबेडकर उद्यानाची संकल्पना मांडली व त्यासाठी प्रयत्न केले. उद्यानासाठी ४२ दिवसांचे आंदोलन केले आणि २000 मध्ये दोन एकरात भव्य उद्यान उभे राहिले. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असलेल्या उद्यानामुळे या भागातील सौंदर्यात भर पडली आहे. 

न्यू बुधवार पेठेतील १४ चौक...

  • - न्यू बुधवार पेठ येथे सुभेदार रामजी चौक, राहुल चौक, आनंद चौक, दोस्ताना चौक, संत गल्ली, भीमरत्न चौक, सम्राट अशोक चौक, रमापती चौक, महात्मा फुले चौक, भीम-विजय चौक, वीर फकिरा चौक, मुकुंद चौक, बजरंग चौक, कर्मवीर दादासाहेब गायकवाड चौक असे १४ चौक आहेत. 
टॅग्स :SolapurसोलापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती