शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

मोठी बातमी; राज्यातील १३६ साखर कारखान्यांचे गाळप; सर्वाधिक कारखाने सोलापुरातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 2:40 PM

१३६ कारखान्यांचे गाळप सुरू: साखर हंगामाला अद्याप गती नाही

सोलापूर: राज्यातील साखर हंगामाला अद्यापही गती मिळाली नाही. एकूण १३६ कारखान्यांचे ९७ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडे कोल्हापूर विभागात ३१ कारखाने सुरू असल्याचे दिसत असले तरी सर्वाधिक २३ कारखाने सोलापूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत.

राज्यातील २०० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम परवान्यासाठी अर्ज केले आहेत. यापैकी १७६ कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे. सुरू झालेल्या १३६ कारखान्यांमध्ये कोल्हापूर विभागातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३१ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. त्यानंतर सोलापूर(सोलापूर व उस्मानाबाद) व पुणे( पुणे व सातारा) विभागातील प्रत्येकी २४, अहमदनगर( अहमदनगर व नाशिक) विभागातील २३, औरंगाबाद (औरंगाबाद, धुळे, नंदूरबार, जळगाव, जालना, बीड) १९, नांदेड ( नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर) १३ तर अमरावती( बुलढाणा, अमरावती, यवतमाळ) विभागातील दोन साखर कारखाने सुरू झाले आहेत.

बुधवारपर्यंत राज्यातील १३६ कारखान्यांचे ९७ लाख मेट्रिक टन गाळप झाले असून ७८ लाख मेट्रिक टन साखर तयार झाली आहे. ८.०७ टक्के इतका उतारा पडला आहे. साखर आयुक्तांच्या अहवालानुसार कोल्हापूर विभागात सर्वाधिक ३१ तर सोलापूर विभागात २४ कारखाने सुरू आहेत. मात्र, प्रत्यक्षात एकट्या सोलापूर जिल्ह्यात २३ कारखाने सुरू झाले आहेत.

सोलापूर जिल्हा आघाडीवर..

एफआरपी थकविणाऱ्या, शासकीय देणी न देणाऱ्या इतर देणी थकविणाऱ्या २४ साखर कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्तांनी पेंडींग ठेवले आहेत. यामध्ये सोलापूर विभागातील १० तर सोलापूर जिल्ह्यातील ९ व उस्मानाबाद जिल्ह्यातील एका कारखान्याचा समावेश आहे.

साखर आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील २० व सोलापूर जिल्ह्यातील १६ कारखाने सुरू झाले आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक २३ साखर कारखाने सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील २३, कोल्हापूर २०, अहमदनगर १९, पुणे १५ तसेच सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी ११ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने