शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

उजनीच्या पाण्यावरून सेना-भाजप मंत्र्यांत मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 10:29 IST

जिल्हा नियोजन बैठकीत वाद; सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्यात मतभेद

ठळक मुद्देउजनीच्या पाण्यावर चर्चा सुरू झाल्यावर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आमदार बबनदादा शिंदे यांना लक्ष्य केलेउजनीचे पाणी सर्वांना समान मिळावे म्हणून कालव्याच्या शेवटच्या शेतकºयांना पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येणार सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आधी तलाव भरून घेतले जाणार आहेत, असे सांगितले

सोलापूर : उजनीच्या पाणी वाटपावरून सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्यात मतभेद असल्याचे  दिसून आले. जिल्हा नियोजनच्या बैठकीत उजनीच्या पाणी वाटपावर बोलताना सावंत म्हणाले की, पाण्याचे समान वाटप झाले पाहिजे तर देशमुख म्हणाले आधी तलाव भरून घ्यायचे ठरले आहे.महापालिकेच्या शाळा वर्ग करण्याच्या निर्णयाबाबतही या दोन्ही मंत्र्यांनी वेगवेगळे मत मांडले.  

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला सहपालकमंत्री तथा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर, झेडपी अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त दीपक तावरे, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते. बैठकीत झेडपी शाळेतील रिक्त शिक्षकांच्या जागा भरणे, सन २०१८ मध्ये मंगळवेढा व माळशिरस तालुक्यांत दगावलेल्या जनावरांची भरपाई देण्याच्या प्रस्तावावर वादळी चर्चा झाली. सभा लांबल्यामुळे आमदार भारत भालके यांनी इतर कामांसाठी जायचे असल्याने शेतकºयांचे प्रश्न मांडण्याची अनुमती मागितली. जिल्ह्यात पाऊस नसल्याने खरिपाची चिंताजनक स्थिती आहे. असे असताना महसूल आणि महावेधच्या नोंदीत फरक येत आहे, असा मुद्दा मांडला. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमाप्रमाणेच नोंदी ग्राह्य धरल्या जातात, याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी पावसाच्या नोंदीबाबत अधिकारी दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी दुष्काळ निधी वाटपात गोंधळ असल्याचे निदर्शनाला आणले.

उजनीच्या पाण्यावर चर्चा सुरू झाल्यावर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आमदार बबनदादा शिंदे यांना लक्ष्य केले. बबनदादांनी माढ्यातील रेल्वे रुळाच्या वरील भाग सुजलाम् सुफलाम् करून घेतला आहे. आता खालच्याही लोकांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे आता उजनीचे पाणी सर्वांना समान मिळावे म्हणून कालव्याच्या शेवटच्या शेतकºयांना पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांना मध्येच अडवत सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आधी तलाव भरून घेतले जाणार आहेत, असे सांगितले. दोन्ही मंत्र्यांची वेगवेगळी उत्तरे पाहून सदस्य आवक झाले. झेडपीच्या शाळांबाबत प्रस्ताव देऊ असे जिल्हाधिकारी म्हणाले.

झेडपीच्या शाळा इमारतीसह वर्ग करा- जलसंधारण तथा सहपालकमंत्री तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत नियोजन सभा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रत्येक आक्षेपाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सावरत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तरे दिली. महापालिकेच्या हद्दीतील झेडपीच्या ३७ शाळांची  इमारतीची अवस्था वाईट असून शाळा महापालिकेस  वर्ग करा अशी सूचना सहकारमंत्री देशमुख यांनी केली. त्यावर सहपालकमंत्री सावंत म्हणले, धोकादायक शाळांचा प्रश्न गंभीर असून, डीपीसीचा निधी रस्ते, दिव्यांना न देता शाळांना देऊ अशी भूमिका घेतली. त्यावर देशमुख यांनी धोकादायक शाळा शासन बांधणार असल्याचे सांगितल्यावर असा निर्णय झाला नसल्याचे सावंत म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSubhash Deshmukhसुभाष देशमुख