शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

..तर गाव सोडावं लागणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 14:51 IST

महाराष्ट्रात जिथे पाऊस पडतो तो भूभाग तीव्र उताराचा आहे. त्यामुळे बारा महिने पाणी वाहून नेणारे व पाणी उपलब्ध असणारे पाण्याचे ...

ठळक मुद्देमहाराष्ट्रात जिथे पाऊस पडतो तो भूभाग तीव्र उताराचा आहेमोसमी पाऊस तोही बिनभरवशाचा खंडित व मर्यादित कालावधीतप्रत्येक गावासाठी स्वतंत्र योजना करणे अव्यवहार्य आहे

महाराष्ट्रात जिथे पाऊस पडतो तो भूभाग तीव्र उताराचा आहे. त्यामुळे बारा महिने पाणी वाहून नेणारे व पाणी उपलब्ध असणारे पाण्याचे नैसर्गिक स्रोत (नद्या, नाले, ओढे, सरोवरे) नाहीत. शिवाय मोसमी पाऊस तोही बिनभरवशाचा खंडित व मर्यादित कालावधीत (चार महिने) पडतो. हे सर्व माहीत असूनही दोन वर्षे पाणी पुरेल या पद्धतीने पाण्याचा उपयोग करण्याचे नियोजन आपल्याकडे केले जात नाही. 

आपल्याकडे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना आहेत, त्याची देखभाल केली जात नाही. अशाच योजना करून जास्तीत जास्त गावे अशा योजनेखाली आणण्याचा व नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात नाही. सांगोला तालुक्यासाठी  ८२ गावांची पाणीपुरवठा योजना योग्य पद्धतीने चालू आहेत. अशा अनेक योजना केल्या आहेत त्याच्या देखभालीसाठी जाणीवपूर्वक लक्ष            दिले पाहिजे. 

प्रत्येक गावासाठी स्वतंत्र योजना करणे अव्यवहार्य आहे तरीही तसेच केले जात आहे तेव्हा सोलापूर नगरासाठी  नळ पाणीपुरवठा करतेवेळी धरणातून पाणी घेऊन येणारी मोठी जलवाहिनी ज्या गावातून येते त्या गावांना पाणीपुरवठा करण्याचा विचार केला नाही. या खर्चाची वसुली लाभार्थी व्यक्तीकडून वाजवी दराने केली जात नाही. त्यामुळे अन्य वंचित गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आर्थिक अडचणी येतात. थोडक्यात दुष्काळावर ठोस उपाययोजना असूनही त्यांना प्रत्यक्षात योजनेस अपयश आले ही स्वयंसिद्ध बाब आहे. भारतात बेभरवशाचा मोसमी पाऊस पडतो तोही विखरुन पडतो. ठराविक कालावधीत पडतो. यामुळे बारा महिने पाणी वाहणाºया नद्या व स्रोत नाहीत हे वर नमूद केले आहेच. 

याबरोबरच पाणी खात्रीने उपलब्ध होत नसल्यामुळे पाणीटंचाई निर्माण होते म्हणजे दर दोन-तीन वर्षांनी कोरडा दुष्काळ अन्न व पाणी टंचाई निर्माण होते. सर्व यंत्रणा व साधने यासाठी गुंतून जाते हे अनुभवयाला मिळत आहे. हा टंचाई काळ आॅक्टोबरमध्येच समजून येतो. तरीही मार्चपासून याचा त्रास जाणवल्याशिवाय कोणतीही यंत्रणा हलत नाही. ऊस पीक जळून किती पाणी वाया जाते व तिहेरी नुकसान करते याचा आढावा घेणे आवश्यक आहे. तरीही याची माहिती घेतली जात नाही आणि उपाययोजना केली जात नाही हे अनुभवयाला मिळते आहे. तेव्हा यावर मात करण्यासाठी पावसाद्वारे पडणारे पाणी साठवणे व उपलब्ध करणे, वितरण करणे यासाठी किमान दोन वर्षांची गरज समोर ठेवून नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे. माणसासाठी धान्य उत्पादन आणि साठवण करतो त्याप्रमाणे पाणीमात्रासाठी चारा उत्पादन साठवणूक व उपलब्धता याचेही नियोजन गावोगावी व्हायला पाहिजे. 

असे केले तर कोरड्या दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होईल. यासाठी दरवर्षी पाण्याअभावी ऊस किती जळतो याची माहिती गोळा केली पाहिजे. गावातील गरजेप्रमाणे धान्य व चारा गावातच उत्पादित झाला पाहिजे. तिथेच साठवला पाहिजे. गावातील गरजेप्रमाणे धान्य व चारा गावातच उत्पादित झाला पाहिजे व उपलब्ध करून दिला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गरजवंताला वितरित करणे शक्य होईल. ही सर्व जबाबदारी स्थानिक स्वराज संस्थांकडे दिली पाहिजे. यासाठी आंतरजाल ई वाहिनी संगणकाचा उपयोग करावा लागेल. नमुना १२ भरून घेतला पाहिजे. मालमत्ता प्रपत्र नमुना सुधारित करुन कुटुंबप्रमुख व सदस्यांची माहितीपण गोळा केली पाहिजे. म्हणजे टंचाईकाळात पाणी, अन्न व चारा उपलब्ध करून देणे व वितरित करणे सहज शक्य होईल. असे केल्याने कोणालाही गाव लागणार नाही. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी जागृती केली पाहिजे. जाणकारांनी पुढाकार घेतला पाहिजे. यावर चिंतन व्हावे एवढेच.- दिलीप सहस्रबुद्धे(लेखक माजी शिक्षण उपसंचालक आहेत)  

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळWaterपाणी