शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

शेतीचं सोडा, आम्हाला प्यायलाबी पाणी नाय; केंद्रीय दुष्काळ पथकासमोर शेतकºयांनी मांडली व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 3:53 PM

मंगळवेढा : सततच्या दुष्काळाने येथील शेतकरी पूर्णपणे खचला आहे, खरीप-रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, चाºयाअभावी जनावरे कत्तलखान्याला जात ...

ठळक मुद्दे खरिपाची पिके पूर्णपणे संपुष्टात आली आहेत़ पाण्याअभावी फळबागा, दुग्धव्यवसाय अडचणीतजनावरांना चारा व पिण्याचे पाणी देण्याबाबत शेतकºयांची मागणी रोजगार हमी योजना, शेततळी, जलयुक्त शिवार योजना याबाबतही माहिती नोंदवली

मंगळवेढा : सततच्या दुष्काळाने येथील शेतकरी पूर्णपणे खचला आहे, खरीप-रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, चाºयाअभावी जनावरे कत्तलखान्याला जात आहेत़ लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बागा पाण्याअभावी जळून जात आहेत, शेती व्यवसाय धोक्यात आला आहे़ साहेब़़़ शेतीचे सोडा, प्यायलाबी पाणी मिळेनासे झाले आहे, अशी व्यथा शेतकºयांनी केंद्रीय समितीच्या पथकासमोर मांडली.

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीचे पथक आंधळगाव येथे पोहोचले. दुष्काळी समिती पथकाच्या अहवालानुसार सरकारी मदत मिळणार म्हणून अनेक शेतकरी सकाळी ७ वाजल्यापासून रस्त्याकडे टक लावून बसले होते़पथकाने आंधळगाव येथे सीताराम वेळापुरे यांच्या खरिपातील जळालेल्या भुईमूग, ज्वारी या पिकांची पाहणी केली़ खरीप जळून गेले, रब्बी पेरणी झाली नाही़ शेतीला जोडधंदा असणारा दुग्धव्यवसाय चारा व पाण्याअभावी कोलमडला आहे़ पुढील पावसाळा येईपर्यंत पशुधन जगणे मुश्कील आहे, अशी व्यथा शेतकरी वेळापुरे यांनी पथक प्रमुखाकडे मांडली.

 केंद्रीय दुष्काळी पथकाचे प्रमुख सुभाषचंद्र मीना, सदस्य एम. जी. टेंभुर्णे, विजय ठाकरे यांनी सर्व शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड, कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रवींद्र माने, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, पं स. सभापती प्रदीप खांडेकर, प्रा़ शिवाजीराव काळुंगे, प्रा़ येताळा भगत, झेडपी सदस्या शैला गोडसे, तालुका कृषी अधिकारी नामदेवराव गायकवाड, शिवाजीराव नागणे, पांडुरंग भाकरे आदी उपस्थित होते़

पथकप्रमुखांनी प्रश्नोत्तरासह घेतली नोंद- पथकप्रमुख मीना यांनी आंधळगाव येथे पाहणी करताना प्रश्नोत्तरासह मुद्दे नोंदविले़ खरिपाची पिके पूर्णपणे संपुष्टात आली आहेत़ पाण्याअभावी फळबागा, दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे जनावरांना चारा व पिण्याचे पाणी देण्याबाबत शेतकºयांची मागणी आहे. रोजगार हमी योजना, शेततळी, जलयुक्त शिवार योजना याबाबतही माहिती नोंदवली आहे. दरम्यान, शेतकºयांनी मांडलेल्या व्यथा अत्यंत भीषण आहेत़ शासनस्तरावर ही माहिती पोहोचवू शेतकºयांप्रति आपण अत्यंत संवेदनशील आहोत, असे केंद्रीय पथकातील सदस्यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयdroughtदुष्काळCentral Governmentकेंद्र सरकार