शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

कृषी वार्ता; यंदाच्या खरीप पेरणीला सर्जाराजाऐवजी ट्रॅक्टरलाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 8:17 AM

चपळगाव मंडलात मोठ्या प्रमाणावर होणार खरीपाची पेरणी!

चपळगाव -  शंभूलिंग अकतनाळ

भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. याच देशात बैलजोड्यांच्या साहाय्याने शेती करणारा शेतकरी वर्ग मोठा आहे. बैलांच्या साहाय्याने शेतातील अनेक कामे पार पडतात.मात्र आधूनिक युगात क्रांतीकारक बदल झाल्याने याच बैलजोड्यांना फाटा देत ट्रॅक्टरने पेरणी करण्याची पध्दत रूढ झाली आहे. यंदाच्या वर्षी चपळगाव मंडलातील बहुतांश शेतकऱ्यांनी सर्जाराजाच्या जोडीला फाटा देऊन ट्रॅक्टरच्या माध्यमातुन खरीपाची पेरणी करत असल्याचे  दिसत आहे.

चपळगाव मंडलातील दहिटणे, चपळगाव, चपळगाववाडी, दहिटणेवाडी, हन्नुर, डोंबरजवळगे, बोरेगाव, बावकरवाडी, चुंगी, दर्शनाळ, सिंदखेड, मोट्याळ, नन्हेगाव, बऱ्हाणपूर आदी गावातील शेतकरी प्रामुख्याने तुर, उडीद, मुग, सोयाबीन, सुर्यफूल, भुईमुग, मका आदी खरीप पिके घेतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर नियोजनाची गरज भासते.मात्र सद्यस्थितीत प्रत्येक गावात बैलांची संख्या बोटावर मोजण्याइतपच शिल्लक असल्याने खरीपाची पेरणी वेळेवर कशी करता येईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते.मृग नक्षत्रातील पावसाच्या हजेरीनंतर खरीपाची पेरणी करण्यासाठी शेतकरी लगबग करतात.म्हणून यंदाच्या वर्षी बैलजोड्यांना फाटा देत ट्रॅक्टरच्या माध्यमातुन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

चपळगाव मंडलातील जवळपास २१००० हेक्टर क्षेत्रापैकी  जवळपास ७५ टक्के क्षेत्रावर शेतकरी खरीप पिकांची पेरणी करण्याचा अंदाज आहे. यामध्ये उडीद पिकाला बहुतांश शेतकर्‍यांनी पसंती दिली असली तरी मुग,तुर,सूर्यफूल, भुईमूग,सोयाबीन,साळी, पिकांचीदेखील पेरणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

बैलजोड्यांऐवजी ट्रॅक्टरलाच का पसंती?

खरीप हंगामावर शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षाचे अर्थकारण अवलंबून असते.यासाठी खरीपातील प्रत्येक पाऊस आणि प्रत्येक दिवस लाखमोलाचा ठरतो.ही बाब लक्षात घेता प्रत्येक शेतकरी खरीप हंगामाची पेरणी वेळेवर करतात.सद्यस्थितीत एका बैलजोडीला प्रतिदिवस १५०० रूपये भाडे मोजावे लागतात.तसेच खते,बियाणेंचा व मजुरांचा खर्च जोडता पेरणीसाठी प्रतिदिन शेतकरी जवळपास ५००० रूपये मोजतो.यामध्ये जवळपास तीन ते चार एकरवर पेरणी होते.याउलट सद्यस्थितीत ट्रॅक्टरला प्रतिएकर ८०० ते ९०० रूपये भाडे द्यावे लागते.ट्रॅक्टरवर एका दिवसात किमान दहा एकरावर पेरणी करणे शक्य होते.ट्रॅक्टरच्या माध्यमातुन बियाणे,खत एकाच वेळी सोडता येते.तसेच बारीक उठलेले तणदेखील मोडले जाते.बैलजोड्यांवर पेरणीसाठी, रासणीसाठी,खत सोडण्यासाठी मजुरांची गरज भासते.या बाबी लक्षात घेता मजुरीचा खर्च,वेळेची बचत,कमी कालावधीत जास्तीचे काम करण्यासाठी ट्रॅक्टर उपयूक्त ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

बैलजोड्यांवर तीन दिवसांपर्यंत  होणारे काम ट्रॅक्टरने एक-दीड दिवसात पूर्ण होते.शिवाय मजुरीचा खर्च,वेळेची होणारी बचत या बाबी शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी हिताच्या ठरतात.यासाठी मी ट्रॅक्टरने पेरणी केली आहे.

- चिदानंद माळगे(सरपंच,डोंबरजवळगे)

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी