शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Waterday; डब्लूएचओच्या नियमाप्रमाणे ११ टप्प्यात व्हावे उजनीच्या पाण्याचे शुद्धीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:00 IST

पाणी जितके प्रदूषणमुक्त असायला हवे तितके होत नाही; पाण्यातील टीडीएसमुळे आरोग्याचा प्रश्न

ठळक मुद्देउजनी धरणातील पाण्याचा टीडीएस ८५० ते ९०० आहेकोयना धरणाचा टीडीएस १५० ते २०० दरम्यान आहेपिंपरी येथील प्रदूषित पाणी उजनी धरणात येत असल्याने या पाण्याची अशी अवस्था

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान समजले जाते. या पाण्यामुळे शहर तसेच इतर भागातील नागरिकांची तहान भागविली जाते. ही तहान भागविली जात असताना पाणी जितके प्रदूषणमुक्त असायला हवे तितके होत नाही. 

पाणी प्रदूषित करणारे घटक जावे यासाठी ११ ते १२ टप्प्यामध्ये शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने हा नियम सांगितला आहे. आपल्याकडे सात टप्प्यामध्ये शुद्धीकरण होते. त्यामुळे पाण्यातील प्रदूषित घटक काही प्रमाणात तसेच राहतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील पळसदेव, अगोली आदी गावांत मात्र अशी परिस्थिती नाही. या गावामध्ये उत्कृष्ट दर्जाचे जलशुद्धीकरण प्रकल्प उभे करण्यात आले आहे. या पद्धतीचे जल शुध्दीकरण प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील उभे करणे गरजेचे आहे.कुरकुंभ एमआयडीसी येथून मोठ्या प्रमाणात रसायने उजनी धरणातील पाण्यात मिसळतात. याचा परिणाम या पाण्यावर होतो. उजनी धरण परिसरातील गावातील जनावरे थेट पाणी पित असल्याने त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाले आहेत. तसेच या पाण्याचा परिणाम शेतीवरही झाला आहे.

जलाशयातील वनस्पती तसेच इतर जलचरांवरही परिणाम होत आहे. मच्छीमारीसाठी पाण्यात उतरल्यानंतर पायाला खाज सुटत आहे. या प्रकारच्या ़अनेक तक्रारी मच्छीमारांनी केल्या.

पाण्याची शुद्धता मापण्यासाठी टीडीएसचा स्तर

  • - शहरात होणाºया पाणीपुरवठ्यावरही याचा परिणाम आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये किडनी स्टोनसारखे आजार वाढण्याची शक्यता आहे. तसेच पोटाचे विकारही वाढतात. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी त्यांच्या आरोग्यावर अधिक  दूरगामी परिणाम होऊ शकतो.
  • - पिण्याच्या पाण्याची शुद्धता मापून पाहण्याकरिता टीडीएस (टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स ), पीएच स्तर आणि पाण्याचा खारेपणा पाहिला जातो. 

पाण्यामध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी रासायनिक घटक मिसळू नयेत याची प्रथम काळजी घ्यायला हवी. प्रशासनाने पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर गावागावांमध्ये शुद्धीकरण प्रकल्प उभे करावे. याद्वारेच डब्लूएचओच्या मापदंडानुसार आपण पाणीपुरवठा करु शकतो.- डॉ. जी. एस. कांबळे, संचालक, सामाजिक शास्त्रे संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूऱ

उजनी धरणातील पाण्याचा टीडीएस ८५० ते ९०० आहे. कोयना धरणाचा टीडीएस १५० ते २०० दरम्यान आहे. पुणे, दौंड, पिंपरी येथील प्रदूषित पाणी उजनी धरणात येत असल्याने या पाण्याची अशी अवस्था आहे. त्या ठिकाणावरील पाण्यावर प्रक्रिया करुन पुढे सोडणे हा चांगला उपाय आहे.- विलास लोकरे, अध्यक्ष, सीना-भीमा संघर्ष समिती

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीwater pollutionजल प्रदूषण