शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

मंगळवेढा तालुक्यातील ४० हजार ८ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा तडाखा; ८१ गावे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:34 AM

३१ हजार ५०३ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे ३४ कोटी ७६ लाखाचे नुकसान; पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर

मल्लिकार्जुन देशमुखे

मंंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात अतिवृष्टी व  महापुराने झालेल्या   नुकसानीचे पंचनामे अखेर पूर्ण करण्यात आले आहेत. तालुक्यातील ८१ गावातील ४० हजार ८१९  बाधित  शेतकऱ्यांच्या  ३१ हजार ५०३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यासाठी ३४  कोटी  ७६ लाख रुपयांची आवश्यकता असल्याची मागणी  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे अशी माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी  'लोकमत' शी बोलताना दिली.

मंगळवेढा तालुक्यात सप्टेंबर महिन्यापासून संतताधर पाऊस सुरु होता. ऑक्टोबर महिन्यात सलग दहा दिवस दुष्काळी पट्ट्यातील गावासह अन्य भागात अतिवृष्टी झाली. भीमा व माण नदीकाठी महापुराने हाहाकार माजविला.त्यामुळे सर्वच नद्या, ओढे तुडुंब भरून वाहत होते. खरीप पिकांची काढणी सुरु असतानाच अतिवृष्टी झाल्याने सर्वच पिके पाण्यात बुडाली. आजही शेतात पाणी आहे.तर नुकतीच पेरणी केलेली रब्बी पिकानाही मोठा फटका बसला, ज्वारी, बाजरी, कडधान्य, भुईमूग, पिके शेतातच कुजली आहेत. उसासह फळपिकांनाही मोठा तडाखा बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळाले नाही.दरम्यान तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील  तलाठी, ग्रामसेवक व कृषिसहायक असे १०१ कर्मचाऱ्याच्या मदतीने तातडीने पंचनामे पूर्ण करण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते, मंत्री, खासदार आणि आमदारांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे का होईना, पंचनाम्याचे गांभीर्य वाढले आणि ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात आले.  सप्टेंबर तसेच ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणवर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. यंत्रणेने केलेल्या पंचनाम्यांचा अहवाल जिल्हा  प्रशासनाला पाठवण्यात आला  असून, त्यानुसार  ४० हजार ८१९  बाधित शेतकऱ्यांच्य ३१ हजार ५०३ हेक्टर क्षेत्राला अतिरिक्त पावसाचा फटका बसला आहे. तर नुकसान ३४ कोटी ७६ लाख रुपयांचे झाले आहे . यामध्ये २० हजार ४८४ हेक्टर हे कोरडवाहू असुन १५ हजार ४५५ बाधित शेतकऱ्यांचे  १० कोटी ५१ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे  तर १० हजार २८३  हेक्टर बागायत पिकाखालील नुकसान क्षेत्र असून  बाधित शेतकऱ्यांची संख्या १२ हजार ५८४ इतकी आहे त्याचे  नुकसान १३ कोटी ८८ लाख  रुपये , तर  ५ हजार ७६३ हेक्टर  फळपिकांचे  १० कोटी ३७ लाखाचे नुकसान झाले असून ७ हजार ७५१  बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे   अशी माहिती महसूल विभागाचे महावीर माळी यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून, घोषणेनुसार कोरडवाहू व बागायत क्षेत्रासाठी सरसकट १० हजार रुपये हेक्टर (२ हेक्टर मर्यादा) तर फळपिकांसाठी २५ हजार रुपये हेक्टरी (२ हेक्टर मर्यादा) मदत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांच्या पदरात दिवाळीपूर्वीच ही मदत देण्यात येणार असून, येत्या काही दिवसांतच  शेतकऱ्यांना अनुदान वाटपास सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना १३ मे २०१५ च्या निकषानुसार अनुदान वाटप न करता सरसकट १० हजार प्रतिहेक्टर व फळपिकांसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टरचा निर्णय घेण्यात आल्यामुळे याचा फायदा दुष्काळी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

____________________अतिवृष्टी व महापुराने झालेल्या  नुकसानीचे पंचनामे अखेर पूर्ण करण्यात आले आहेत. तालुक्यातील   ४० हजार  ८१९ बाधित शेतकऱ्यांच्या ३१ हजार ५०३ हेक्टरवरील पिकाची हानी झाली आहे  ३४ कोटी ७६ लाख  रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती   जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.-स्वप्निल रावडे, तहसीलदार, मंगळवेढा 

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरagricultureशेतीFarmerशेतकरी