शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

सोलापूर जिल्ह्यात लाचखोरीची १९२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:14 IST

शिक्षेचे प्रमाण कमी : दोन वर्षांत एकाला शिक्षा; चौदा निर्दोष

ठळक मुद्दे जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरांची संख्या वाढत चाललीजिल्ह्यातील लाचखोरीची १९२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबितदोन वर्षांत १४ निकाल लागले असून, यात एकालाच शिक्षा लागली

अमित सोमवंशी  

सोलापूर : लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी शासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यातील लाचखोरीची १९२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून, सर्वाधिक प्रकरणे ही सोलापूरन्यायालयात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांत १४ निकाल लागले असून, यात एकालाच शिक्षा लागली तर अन्य चौदा जण निर्दोष सुटले.

प्रशासनातील भ्रष्टाचाराची कीड नष्ट करण्यासाठी लाचलुचपत विभागाने कठोर पावले उचलली आहेत. हा विभाग कार्यरत असला तरी लाचखोरीची प्रकरणे कमी होत नसल्याने विभागाने अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. लाचखोरीच्या खटल्यात शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. लाच घेणे आणि देणे हा गुन्हा असला तरी सरकारी कामाची गती पाहता लाच देण्याचे प्रमाण वाढत आहे. लाच घेण्याबरोबरच देणाºयावरही कारवाई झाली पाहिजे.

लाचखोरीचे प्रकार वाढत असून, त्याला आळा घालणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून लाचखोरांची संख्या वाढली आहे. एसीबीला प्रचंड गती दिल्याने संख्या दुपटीने वाढली. त्यासोबतच एसीबीच्या खटल्यामध्ये आरोपी निर्दोष सुटू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. पंच, साक्षीदार, फिर्यादी फितूर होणार नाही, तपासात काही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जाते. चालू वर्षात २५ लाचखोरांना पकडण्यात आले. यात महसूलचे ६, पोलीस ६, शिक्षण विभाग २, जिल्हा परिषद २, पाटबंधारे ४, समाजकल्याण १, एमएसईबी २, सहकार २ आणि खासगी इसम १ अशा एकूण २५ जणांना लाच घेताना पकडण्यात आले.

दोन वर्षे; एकाला शिक्षा

  • - २०१७ या वर्षात ९ केसेसचा निकाल लागला असून, त्यामध्ये ८ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, तर एकाला शिक्षा लागली. २०१८ या चालू वर्षात पाच केसेसचा निकाल लागला असून, यात सर्व जण निर्दोष सुटले हे विशेष.

रक्कम परत मिळते

  • - तक्रारदाराचा फोन आल्यास त्याची प्रतीक्षा न करता वेळप्रसंगी लाचलुचपत विभाग स्वत: त्याच्याकडे जाऊन तक्रारीची खातरजमा करीत असल्याचे सांगितले जाते. काही प्रकरणात तक्रारदाराप्रमाणे अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने लाचलुचपत विभागाला रिकाम्या हाताने परत यावे लागते. तसेच लाचेची रक्कम संबंधित तक्रारदाराला महिनाभरात देण्यात येते.

चार वर्षांत १४२ गुन्हे लाचलुचपत विभागाने मागील चार वर्षांत २०१५ मध्ये ४५, २०१६ या वर्षात ३७, २०१७ मध्ये ३५ तर चालू वर्षात २५ अशा एकूण १४२ जणांना लाच स्वीकारताना पकडले.

प्रलंबित केसेसन्यायालय        केसेस

  • सोलापूर         ११०
  • पंढरपूर        २४
  • बार्शी        २१
  • माळशिरस        १७
  • एकूण        १९२
टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCourtन्यायालयPoliceपोलिस