शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात लाचखोरीची १९२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:14 IST

शिक्षेचे प्रमाण कमी : दोन वर्षांत एकाला शिक्षा; चौदा निर्दोष

ठळक मुद्दे जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरांची संख्या वाढत चाललीजिल्ह्यातील लाचखोरीची १९२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबितदोन वर्षांत १४ निकाल लागले असून, यात एकालाच शिक्षा लागली

अमित सोमवंशी  

सोलापूर : लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी शासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यातील लाचखोरीची १९२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून, सर्वाधिक प्रकरणे ही सोलापूरन्यायालयात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांत १४ निकाल लागले असून, यात एकालाच शिक्षा लागली तर अन्य चौदा जण निर्दोष सुटले.

प्रशासनातील भ्रष्टाचाराची कीड नष्ट करण्यासाठी लाचलुचपत विभागाने कठोर पावले उचलली आहेत. हा विभाग कार्यरत असला तरी लाचखोरीची प्रकरणे कमी होत नसल्याने विभागाने अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. लाचखोरीच्या खटल्यात शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. लाच घेणे आणि देणे हा गुन्हा असला तरी सरकारी कामाची गती पाहता लाच देण्याचे प्रमाण वाढत आहे. लाच घेण्याबरोबरच देणाºयावरही कारवाई झाली पाहिजे.

लाचखोरीचे प्रकार वाढत असून, त्याला आळा घालणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून लाचखोरांची संख्या वाढली आहे. एसीबीला प्रचंड गती दिल्याने संख्या दुपटीने वाढली. त्यासोबतच एसीबीच्या खटल्यामध्ये आरोपी निर्दोष सुटू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. पंच, साक्षीदार, फिर्यादी फितूर होणार नाही, तपासात काही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जाते. चालू वर्षात २५ लाचखोरांना पकडण्यात आले. यात महसूलचे ६, पोलीस ६, शिक्षण विभाग २, जिल्हा परिषद २, पाटबंधारे ४, समाजकल्याण १, एमएसईबी २, सहकार २ आणि खासगी इसम १ अशा एकूण २५ जणांना लाच घेताना पकडण्यात आले.

दोन वर्षे; एकाला शिक्षा

  • - २०१७ या वर्षात ९ केसेसचा निकाल लागला असून, त्यामध्ये ८ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, तर एकाला शिक्षा लागली. २०१८ या चालू वर्षात पाच केसेसचा निकाल लागला असून, यात सर्व जण निर्दोष सुटले हे विशेष.

रक्कम परत मिळते

  • - तक्रारदाराचा फोन आल्यास त्याची प्रतीक्षा न करता वेळप्रसंगी लाचलुचपत विभाग स्वत: त्याच्याकडे जाऊन तक्रारीची खातरजमा करीत असल्याचे सांगितले जाते. काही प्रकरणात तक्रारदाराप्रमाणे अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने लाचलुचपत विभागाला रिकाम्या हाताने परत यावे लागते. तसेच लाचेची रक्कम संबंधित तक्रारदाराला महिनाभरात देण्यात येते.

चार वर्षांत १४२ गुन्हे लाचलुचपत विभागाने मागील चार वर्षांत २०१५ मध्ये ४५, २०१६ या वर्षात ३७, २०१७ मध्ये ३५ तर चालू वर्षात २५ अशा एकूण १४२ जणांना लाच स्वीकारताना पकडले.

प्रलंबित केसेसन्यायालय        केसेस

  • सोलापूर         ११०
  • पंढरपूर        २४
  • बार्शी        २१
  • माळशिरस        १७
  • एकूण        १९२
टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCourtन्यायालयPoliceपोलिस