शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

सोलापूर जिल्ह्यात लाचखोरीची १९२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:14 IST

शिक्षेचे प्रमाण कमी : दोन वर्षांत एकाला शिक्षा; चौदा निर्दोष

ठळक मुद्दे जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरांची संख्या वाढत चाललीजिल्ह्यातील लाचखोरीची १९२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबितदोन वर्षांत १४ निकाल लागले असून, यात एकालाच शिक्षा लागली

अमित सोमवंशी  

सोलापूर : लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी शासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यातील लाचखोरीची १९२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून, सर्वाधिक प्रकरणे ही सोलापूरन्यायालयात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांत १४ निकाल लागले असून, यात एकालाच शिक्षा लागली तर अन्य चौदा जण निर्दोष सुटले.

प्रशासनातील भ्रष्टाचाराची कीड नष्ट करण्यासाठी लाचलुचपत विभागाने कठोर पावले उचलली आहेत. हा विभाग कार्यरत असला तरी लाचखोरीची प्रकरणे कमी होत नसल्याने विभागाने अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. लाचखोरीच्या खटल्यात शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. लाच घेणे आणि देणे हा गुन्हा असला तरी सरकारी कामाची गती पाहता लाच देण्याचे प्रमाण वाढत आहे. लाच घेण्याबरोबरच देणाºयावरही कारवाई झाली पाहिजे.

लाचखोरीचे प्रकार वाढत असून, त्याला आळा घालणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून लाचखोरांची संख्या वाढली आहे. एसीबीला प्रचंड गती दिल्याने संख्या दुपटीने वाढली. त्यासोबतच एसीबीच्या खटल्यामध्ये आरोपी निर्दोष सुटू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. पंच, साक्षीदार, फिर्यादी फितूर होणार नाही, तपासात काही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जाते. चालू वर्षात २५ लाचखोरांना पकडण्यात आले. यात महसूलचे ६, पोलीस ६, शिक्षण विभाग २, जिल्हा परिषद २, पाटबंधारे ४, समाजकल्याण १, एमएसईबी २, सहकार २ आणि खासगी इसम १ अशा एकूण २५ जणांना लाच घेताना पकडण्यात आले.

दोन वर्षे; एकाला शिक्षा

  • - २०१७ या वर्षात ९ केसेसचा निकाल लागला असून, त्यामध्ये ८ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, तर एकाला शिक्षा लागली. २०१८ या चालू वर्षात पाच केसेसचा निकाल लागला असून, यात सर्व जण निर्दोष सुटले हे विशेष.

रक्कम परत मिळते

  • - तक्रारदाराचा फोन आल्यास त्याची प्रतीक्षा न करता वेळप्रसंगी लाचलुचपत विभाग स्वत: त्याच्याकडे जाऊन तक्रारीची खातरजमा करीत असल्याचे सांगितले जाते. काही प्रकरणात तक्रारदाराप्रमाणे अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने लाचलुचपत विभागाला रिकाम्या हाताने परत यावे लागते. तसेच लाचेची रक्कम संबंधित तक्रारदाराला महिनाभरात देण्यात येते.

चार वर्षांत १४२ गुन्हे लाचलुचपत विभागाने मागील चार वर्षांत २०१५ मध्ये ४५, २०१६ या वर्षात ३७, २०१७ मध्ये ३५ तर चालू वर्षात २५ अशा एकूण १४२ जणांना लाच स्वीकारताना पकडले.

प्रलंबित केसेसन्यायालय        केसेस

  • सोलापूर         ११०
  • पंढरपूर        २४
  • बार्शी        २१
  • माळशिरस        १७
  • एकूण        १९२
टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCourtन्यायालयPoliceपोलिस