शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार ८७८ कृषीपंप ग्राहकांना मिळणार प्रत्येकी स्वतंत्र ट्रान्स्फार्मर

By appasaheb.patil | Updated: November 29, 2018 12:39 IST

अप्पासाहेब पाटील।  सोलापूर : सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेने त्रस्त झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्यातील कृषीपंपांना आता यापुढे उच्चदाब ...

ठळक मुद्देउच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (एच़व्ही़डी़एस.) वीज देण्याचा निर्णययासाठी २७६ कोटी रूपयांचे टेंडर मंजूर झाल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिलीआतापर्यंत राज्यात २़६ लाख कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे़

अप्पासाहेब पाटील। 

सोलापूर : सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेने त्रस्त झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्यातील कृषीपंपांना आता यापुढे उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (एच़व्ही़डी़एस.) वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ याच मोहिमेतून प्रत्येक नवीन कृषीपंप जोडणी घेणाºया सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार ८७८ ग्राहकांना एक ट्रान्स्फार्मऱ़़ एक शेतकरी या धर्तीवर वीजजोडणी देण्यात येणार आहे़ यासाठी २७६ कोटी रूपयांचे टेंडर मंजूर झाल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे.

सातत्याने होणारा वीजपुरवठ्यातील खंड, विजेची होणारी चोरी, नियमित होणारे अपघात, एका ट्रान्स्फार्मरवरून १५ ते २० जोडण्या देण्यात आल्या आहेत़ ट्रान्स्फार्मरची क्षमता कमी अन् जोडण्या जास्त अशी अवस्था झाली आहे़ यामुळे ट्रान्स्फार्मरवरील दाब वाढून तो बंद पडण्याच्या घटना घडण्याबरोबर अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे़ वारंवार खंडित वीजपुरवठा यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती समोर आली.

या वारंवार घडणाºया घटनांवर आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने मे २०१८ मध्ये उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी देण्याची योजना आखली़ त्यानुसार आतापर्यंत राज्यात २़६ लाख कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे़ याचाच भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार ८७८ ग्राहकांना वीजजोडणी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ यात १० केव्ही, १६ केव्ही व २५ केव्ही या क्षमतेचे ट्रान्स्फार्मर बसविण्यात येणार आहेत़ यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली़ सोलापूर जिल्ह्यात २०१४ पासून कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात आली नाही़ २०१४ पासून आजतागायत ११ हजार ८७८ कृषीपंप ग्राहकांनी महावितरणकडे रितसर अर्ज करून कोटेशन भरले आहे़ अशा वीजजोडणी प्रलंबित ग्राहकांना प्राधान्याने एक ट्रान्स्फार्मऱ़़़एक शेतकरी या धर्तीवर वीजजोडणी देण्यात येणार आहे.

विभाग निहाय जोडणी- सोलापूर ग्रामीण - ११७७- पंढरपूर - २२३२- बार्शी - ५६९२- अकलूज - ११७७

शेतीपंपाची २५ हजार कोटी थकले...- राज्यात २ कोटी १० लाख ग्राहक आहेत़ राज्यात सातत्याने पडणाºया दुष्काळामुळे शेतकºयांची उत्पादन क्षमता कमी झाली आहे़ याशिवाय उत्पादकता कमी झाल्याने अर्थकारण बिघडले आहे़ त्यामुळे राज्यात शेतीपंपांच्या थकबाकीचा आकडा २५ हजार कोटींवर पोहोचला आहे़ अशात यावर्षी शासनाने राज्यातील बहुतांश भागात दुष्काळ जाहीर केला आहे़ यामुळे शेतीपंपाच्या वीज बिल वसुलीला स्थगिती दिली आहे़ तरीही शेतीपंपाला सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याचे सांगितले़ 

विजेची हानी टाळण्यासाठी राज्यातील कृषीपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे जोडण्या देण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील ११ हजार ८७८ कृषीपंप ग्राहकांचा त्यात समावेश आहे़ यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, मोहोळ व टेंभुर्णी येथे सुरुवातीचे दोन कनेक्शन देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील ग्राहकांना या प्रणालीद्वारे वीजजोडणी देण्यात येणार आहे़- ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीagricultureशेती