शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

सोलापूर जिल्ह्यातील १०१ शाळांमध्ये ‘आरटीई’ प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:50 PM

सोलापूर जिल्ह्यात ३२९ शाळा : माळशिरसमध्ये सर्वात जास्त २६ शाळेत प्रवेश नाही

ठळक मुद्देयंदाच्या शैक्षणिक वर्षात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ३२९ शाळांमधून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली.३२ शाळा अशा आहेत त्यात प्रवेशासाठी एकाही पालकाने अर्ज केला नाही तर ६९ शाळा अशा आहेतज्यामध्ये प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित पाल्याचा नंबर त्या शाळेत लागला नाही किंवा त्या शाळेत प्रवेश घेतलेला नाही

सोलापूर : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा रिक्त ठेवण्यात येतात. सोलापूर जिल्ह्यातून ३२९ शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केलेली होती, यापैकी १०१ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्यांने आरटीई अंतर्गत प्रवेश घेतला नाही यामुळे ज्या शाळांमध्ये प्रवेश झालेले नाहीत त्याचे कारण शोधून त्या शाळांमध्ये सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी पालकांकडून होत आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ३२९ शाळांमधून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. यातील ३२ शाळा अशा आहेत त्यात प्रवेशासाठी एकाही पालकाने अर्ज केला नाही तर ६९ शाळा अशा आहेत की ज्यामध्ये प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित पाल्याचा नंबर त्या शाळेत लागला नाही किंवा त्या शाळेत प्रवेश घेतलेला नाही़ यामुळे अशा शाळांमध्ये प्रवेश का होत नाहीत याची माहिती घेऊन पुढील उपाययोजना करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे़ फेब्रुवारीपासून आरटीई अंतर्गत सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया नुकतीच संपली असून सोलापूर जिल्ह्यातून जवळपास ८५ टक्के म्हणजेच २३६२ जागांपैकी २००५ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. म्हणजेच ३५७ जागा मात्र शेवटच्या दिवसांपर्यंत रिक्त राहिल्या आहेत.

------------

प्रवेश न झालेल्या शाळांची यादी तालुक्यानुसार

तालुका प्रवेश न झालेल्या शाळांची संख्या

  • अक्कलकोट ३
  • बार्शी ३
  • करमाळा ४
  • माढा १२
  • माळशिरस २६
  • मंगळवेढा १२
  • पंढरपूर २२
  • सांगोला १३
  • उत्तर सोलापूर ३
  • दक्षिण सोलापूर ३

जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश झालेले नाहीत त्यांचे कारण शोधण्यात येईल़ याबाबत पालकांकडूनही प्रतिक्रिया आम्ही घेऊन पुढील काळात सर्व्हे करू. पुढील वर्षी आरटीई अंतर्गत जास्तीतजास्त प्रवेश होतील याकडे आम्ही लक्ष देऊ.

- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी  

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा