Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:54 IST2025-06-25T14:52:46+5:302025-06-25T14:54:07+5:30
linkedin Viral Post: एका कर्मचाऱ्याने काहीही न सांगता नोकरी सोडल्याने नाराज झालेल्या कंपनीच्या एचआरने लिंक्डइनवर भलीमोठी पोस्ट लिहून खंत व्यक्त केली.

Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
एका कर्मचाऱ्याने काहीही न सांगता नोकरी सोडल्याने नाराज झालेल्या कंपनीच्या एचआरने लिंक्डइनवर भलीमोठी पोस्ट लिहून खंत व्यक्त केली. संबंधित कर्मचाऱ्याने कोणताही फोन अथवा स्पष्टीकरण न देता नोकरी सोडल्याचेही एचआरने आपल्या पोस्टमध्ये सांगितले. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.
एचआरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "एका कर्मचाऱ्याने पहिल्याच दिवशी काहीही न सांगता नोकरी सोडली, हा तरुण सेल्स विभागात जॉईन होणार होता. सेल्सची नोकरी अधिक आव्हानात्मक आणि कठीण आहे, असे त्याला मुलाखतीदरम्यान सांगण्यात आले होते. मात्र, तरीही कर्मचाऱ्याने पहिल्याच दिवशी नोकरी सोडली. तुम्ही कुठेही नोकरी करा, तुम्हाला एका दिवसात सर्व काही शिकता किंवा परफेक्ट काम करता येत नाही. शिवाय, कोणतीही कंपनी २४ तासांत सर्वकाही सिद्ध करू शकत नाही. त्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. वेळ दिल्याशिवाय यश मिळवता येत नाही."
एचआरचा कर्मचाऱ्यांना मोलाचा सल्ला
नवीन ठिकाणी नोकरी करायला सुरुवात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एचआरने मोलाचा सल्ला दिला. एचआर म्हणाली की, "मुलाखतीवेळी उमेदवाराने आपल्या मनातल्या शंका विचारल्या पाहिजेत. ऑफर स्वीकारण्याआधी विचार करावा. घाई करू नये. मनातील सर्व प्रश्न स्पष्ट विचारायला हवे. कंपनीने ऑफर दिलीही पण तुम्हाला खात्री नसेल तर घाईने होकार देऊ नका. एकदा नोकरी स्वीकारली, तर त्याला योग्य न्याय द्या. अशा कृत्यांमुळे तुमचे नुकसान होऊ शकते."
नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
संबंधित एचआरने केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, ही पोस्ट शेअर करण्यापेक्षा त्या कर्मचाऱ्याला काम का आवडले नाही, याचा शोध घ्यायला हवा. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, "एचआर मुलाखतीदरम्यान उमेदवाराच्या वेळेचा आदर करत नाही. त्यांच्या क्षमतांना महत्त्व देत नाही, या गोष्टी एचआरसाठी सामन्य आहे. पण जेव्हा एखादा कर्मचारी अशा पद्धतीने वागतो, तेव्हा त्याला चुकीचे ठरवले जाते."