शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नेटिझन्सकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर; 'नायक' अनिल कपूर यांचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 11:59 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : सोशल मीडियावर देखील मुख्यमंत्रिपदाचीच चर्चा रंगली आहे. नेटिझन्सनी यावर एक भन्नाट पर्याय सुचवला आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आक्रमक आहे. तसेच, सत्तेत समान वाटा मिळावा, यासाठी भाजपावर दबाव आणण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच सोशल मीडियावर देखील मुख्यमंत्रिपदाचीच चर्चा रंगली आहे. नेटिझन्सनी यावर एक भन्नाट पर्याय सुचवला आहे. 

'नायक' या लोकप्रिय हिंदी चित्रपटात अनिल कपूर हे एक दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते. दोन पक्ष मुख्यमंत्रिपदाबाबत जोपर्यंत निर्णय घेत आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून अभिनेता अनिल कपूरची नियुक्ती करा असं नेटिझन्सनी म्हटलं आहे. 'महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी कोणता मार्ग निघत नाही तोपर्यंत अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करा. पडद्यावर त्यांचा एक दिवसाचा कार्यकाळ पूर्ण देशाने पाहिला आणि कौतुकही केलं. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काय विचार आहे तुमचा?' असं ट्वीट एका युजरने केलं आहे. तसेच युजर्सने आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील ते टॅग केलं आहे. 

युजर्सचं हे मुख्यमंत्रिपदाबाबतचं ट्विट अनेकांनी रिट्विट केलं आहे. तर काहींनी हा पर्याय आवडल्याचं देखील सांगितलं आहे. नेटिझन्सच्या या मागणीला अभिनेते अनिल कपूर यांनी देखील भन्नाट उत्तर दिलं आहे. 'मैं nayak ही ठिक हूँ' असं अनिल कपूर यांनी म्हटलं आहे. अनिल कपूर यांनी दिलेल्या या उत्तराचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नायक या चित्रपटात अनिल कपूर यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. समाजात बदल घडवणारी अनेक कामं ते एका दिवसात करतात. आजही हा चित्रपट अनेकांना पाहायला आवडतो. 

सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण असल्याने अनिल कपूर यांना काही दिवसांपूर्वी बॉलिवूडसोबतच राजकारणाविषयी देखील विचारण्यात आले. अनिल कपूर यांनी नायक या चित्रपटात एका मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती. एक दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळल्यानंतर केवळ एका दिवसात राज्यात किती बदल घडतात हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळाले होते. याच चित्रपटाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा नायक कोण असे अनिल कपूर यांना विचारण्यात आले होते. अनिल यांनी क्षणाचाही विलंब न करता आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे नायक असल्याचे कबूल केले. 'बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनच माझे ठाकरे कुटुंबियांसोबत खूप चांगले संबंध आहेत. तसेच माझे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील खूपच चांगले नाते आहे. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे दोघेही तडफदार आणि अभ्यासू असून ते दोघे महाराष्ट्रासाठी खूप चांगले काम करतील याचा मला विश्वास आहे' असं अनिल कपूर यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Anil Kapoorअनिल कपूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडियाShiv Senaशिवसेना