शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

नेटिझन्सकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर; 'नायक' अनिल कपूर यांचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 11:59 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : सोशल मीडियावर देखील मुख्यमंत्रिपदाचीच चर्चा रंगली आहे. नेटिझन्सनी यावर एक भन्नाट पर्याय सुचवला आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आक्रमक आहे. तसेच, सत्तेत समान वाटा मिळावा, यासाठी भाजपावर दबाव आणण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच सोशल मीडियावर देखील मुख्यमंत्रिपदाचीच चर्चा रंगली आहे. नेटिझन्सनी यावर एक भन्नाट पर्याय सुचवला आहे. 

'नायक' या लोकप्रिय हिंदी चित्रपटात अनिल कपूर हे एक दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते. दोन पक्ष मुख्यमंत्रिपदाबाबत जोपर्यंत निर्णय घेत आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून अभिनेता अनिल कपूरची नियुक्ती करा असं नेटिझन्सनी म्हटलं आहे. 'महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी कोणता मार्ग निघत नाही तोपर्यंत अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करा. पडद्यावर त्यांचा एक दिवसाचा कार्यकाळ पूर्ण देशाने पाहिला आणि कौतुकही केलं. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काय विचार आहे तुमचा?' असं ट्वीट एका युजरने केलं आहे. तसेच युजर्सने आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील ते टॅग केलं आहे. 

युजर्सचं हे मुख्यमंत्रिपदाबाबतचं ट्विट अनेकांनी रिट्विट केलं आहे. तर काहींनी हा पर्याय आवडल्याचं देखील सांगितलं आहे. नेटिझन्सच्या या मागणीला अभिनेते अनिल कपूर यांनी देखील भन्नाट उत्तर दिलं आहे. 'मैं nayak ही ठिक हूँ' असं अनिल कपूर यांनी म्हटलं आहे. अनिल कपूर यांनी दिलेल्या या उत्तराचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नायक या चित्रपटात अनिल कपूर यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. समाजात बदल घडवणारी अनेक कामं ते एका दिवसात करतात. आजही हा चित्रपट अनेकांना पाहायला आवडतो. 

सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण असल्याने अनिल कपूर यांना काही दिवसांपूर्वी बॉलिवूडसोबतच राजकारणाविषयी देखील विचारण्यात आले. अनिल कपूर यांनी नायक या चित्रपटात एका मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती. एक दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळल्यानंतर केवळ एका दिवसात राज्यात किती बदल घडतात हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळाले होते. याच चित्रपटाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा नायक कोण असे अनिल कपूर यांना विचारण्यात आले होते. अनिल यांनी क्षणाचाही विलंब न करता आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे नायक असल्याचे कबूल केले. 'बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनच माझे ठाकरे कुटुंबियांसोबत खूप चांगले संबंध आहेत. तसेच माझे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील खूपच चांगले नाते आहे. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे दोघेही तडफदार आणि अभ्यासू असून ते दोघे महाराष्ट्रासाठी खूप चांगले काम करतील याचा मला विश्वास आहे' असं अनिल कपूर यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Anil Kapoorअनिल कपूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडियाShiv Senaशिवसेना