शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

महामार्गाचे काम हस्तांतरित करण्यामागे गौडबंगाल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 2:16 PM

Kankavli, MNS, Parshuram Upkar, sindhudurg, pwd महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असतानाच सावंतवाडी विभागाच्या उपअभियंत्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नेमणूकच नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून कनिष्ठ अभियंत्यांच्या देखरेखीखाली महामार्गाचे काम रामभरोसे सुरू आहे.

ठळक मुद्देमहामार्गाचे काम हस्तांतरित करण्यामागे गौडबंगाल काय ? सत्ताधाऱ्यांना एवढी घाई का ? : परशुराम उपरकर यांचा प्रश्न

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असतानाच या कामावर नियंत्रणासाठी दोन्ही विभागात उपअभियंताच नसल्याचे दिसून येत आहे. खारेपाटण विभागातील उपअभियंत्यांची कोल्हापूरला बदली झाल्यानंतर ते इकडे फिरकतच नाहीत. तर सावंतवाडी विभागाच्या उपअभियंत्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नेमणूकच नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून कनिष्ठ अभियंत्यांच्या देखरेखीखाली महामार्गाचे काम रामभरोसे सुरू आहे.खासदार, पालकमंत्री यांनी जनतेशी चालविलेला हा खेळ असून या साऱ्याकडे दुर्लक्ष करीत केवळ काम पूर्ण करून ते हस्तांतरित करण्यात स्वारस्य असण्यामागे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने, निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर हे काम लवकरात लवकर पूर्ण करून ते हस्तांतरित करण्यावर खासदार, पालकमंत्री यांचा भर असल्याचे दिसत आहे.

मुळात दोन महिन्यांपूर्वी खारेपाटण विभागाचे उपअभियंता अमोल ओटवणेकर यांची कोल्हापूरला बदली झाली. त्यांच्याकडे सांगली, सातारा विभाग आहे. तसेच खारेपाटण ते जानवलीपर्यंतच्या भागाचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडेच आहे.मात्र, बदलीनंतर ते इकडे फिरकलेलेच नाहीत. तर सावंतवाडी विभागाचे उपअभियंता पाटील यांच्यानंतर येथे अधिकृत उपअभियंता देण्यात आलेले नाहीत. दोन्ही ठिकाणी केवळ कनिष्ठ अभियंताच काम पाहत आहेत. अशी दयनीय स्थिती असताना अधिकारी न देता काम पूर्ण करून ते हस्तांतरित करण्यासाठी घाई का ? असा प्रश्न उपरकर यांनी केला आहे.जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधारी खासदार, पालकमंत्री, आमदारांचे दुर्लक्षपालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीवेळी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांनी प्रांताधिकारी कार्यालयात आठवड्यात दोन दिवस त्यांचे अधिकारी थांबतील असे सांगितले होते. मात्र, असे अधिकारी थांबल्याचे एकदाही दिसून आलेले नाही. मात्र, त्याबाबत सत्ताधाऱ्यांना सोयरसुतक नाही. लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आग्रह धरत सागरी जलक्रीडासाठी परवानगी मिळवित ते सुरू केले. मात्र, शासनाने आता त्याला बंदी आणली. सत्ताधारी मंडळी लोकांच्या व्यवसायाशी खेळत आहेत. मात्र, जनतेच्या प्रश्नांबाबत या मंडळीना काहीच वाटत नाही. जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली केली.मात्र, जनतेच्या सोयीसाठी पर्यायी डॉक्टरही उपलब्ध केला नाही. असलेल्या डॉक्टरांची बदली करताना दुसरे डॉक्टर नसतील तर लोकांना आरोग्य सुविधा कशा मिळणार? मात्र, जनतेच्या समस्यांकडे सत्ताधारी खासदार, पालकमंत्री सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही परशुराम उपरकर यांनी केला आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गpwdसार्वजनिक बांधकाम विभागKankavliकणकवली