शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

जलयुक्त शिवारचा सिंधुदुर्गातील ५८ गावांना फायदा, ३३३0.७३ टीसीएम पाणीसाठवण क्षमतेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:26 AM

पाणी टंचाईवर मात, दुबार पिक व फळझाड लागवडीखाली क्षेत्रात भरघोस वाढ व्हावी हा उद्देश समोर ठेऊन राज्य शासनाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून राज्यात सुरू केलेले जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षांत या योजनेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५८ गावांना फायदा झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील दुबार पीक व फळझाड लागवडीखालील क्षेत्रही वाढण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्दे ३३३0.७३ टीसीएम पाणीसाठवण क्षमतेची निर्मिती फळझाड लागवडीखालील क्षेत्रही वाढण्यास मदत होणार

सिंधुदुर्गनगरी : पाणी टंचाईवर मात, दुबार पिक व फळझाड लागवडीखाली क्षेत्रात भरघोस वाढ व्हावी हा उद्देश समोर ठेऊन राज्य शासनाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून राज्यात सुरू केलेले जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षांत या योजनेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५८ गावांना फायदा झाला असून या गावांमध्ये एकूण ३३३०.७३ टीसीएम एवढ्या पाणी साठवण क्षमतेची निर्मिती झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील दुबार पीक व फळझाड लागवडीखालील क्षेत्रही वाढण्यास मदत झाली आहे.सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र - २०१९ अंतर्गत २०१५-१६ पासून महाराष्ट्र शासन ह्यजलयुक्त शिवार अभियानह्ण ही महत्त्वाकांशी योजना राबवित आहे. ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणलोट प्रकल्प पूर्ण झालेल्या तसेच पाणीटंचाई जाणवणाºया गावांची निवड या अभियानात करून ती गावे पाणी टंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यासाठी गावातील नागरिकांच्या सहकार्याने करावयाच्या उपाययोजनांचे आराखडे बनविले जातात. तर गावात शिवार फेरी काढून याबाबत जनजागृती केली जाते. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. या पाच वर्षात जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पाणी टंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा आहे.

२०१५-१६ या पहिल्या वर्षी ३५ गावांची निवड प्रकल्पाअंतर्गत करण्यात आली होती. या गावांत पाणी साठा सुरक्षित करणारी ४९४ कामे करण्यात आली होती. १७ कोटी ३९ लाख २८ हजार रुपये एवढा निधी यासाठी खर्च करण्यात आला. ही सर्व कामे पूर्ण झाली असून यामुळे २६०७.३० टीसीएम एवढी पाणी साठवण क्षमतेची निर्मिती होऊ शकली आहे. ९३५.८१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले. परिणामी दुबार पिकाखाली व फळझाड लागवडीखाली क्षेत्र या गावातील वाढले आहे.

२०१६-१७ मध्ये २३ गावांची जलयुक्तमध्ये निवड करण्यात आली. २७२ कामांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी १५ कोटी ११ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील २६९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. २३८ कामे सुरु झाली असून २०६ कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत या कामांवर पाच कोटी ९१ लाख ७३ हजार रुपये एवढा खर्च झाला आहे.

या पूर्ण झालेल्या कामामुळे ७२३.४३ टीसीएम एवढी पाण्याची साठवण क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. ११३४.७३ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येऊ शकले. परिणामी दुबार पिकाखालील क्षेत्र ६४० हेक्टरने वाढू शकले. तर फळबाग लागवडीखालील क्षेत्रातही ५०० हेक्टरने वाढ झाली आहे.

जलयुक्त शिवार योजनेची सर्व कामे पूर्ण झाल्यावर या जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात होणाºया संभाव्य पाणीटंचाईवर काही अंशी मात करणे प्रशासनाला सोपे जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३५ गावेजलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात हडपीड, वाघिवरे, शिरवली, कोटकामते, कुवळे, नाधवडे, हरकुळ खुर्द, करंजे, कोळोशी, ओझरम, नागसावंतवाडी, कुणकवळे, चुनवरे, चिंदर, कर्लाचा व्हाळ, तुळसुली तर्फ माणगाव, हिर्लोक, आंदुर्ले, शिवापूर, भडगाव, गोठोस, आवळेगाव, कोचरा, आरवली, सोनुर्ली, केसरी, भालावल बावळाट, निरवडे, तांबोळी, तळकट, फुकेरी, पालये, कुंभवडे, कोंडये.

दुसऱ्या टप्प्यात २३ गावांचा समावेशजलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात वळीवंडे, शेवरे, उंबर्डे, तिरवडे तर्फ खारेपाटण, वारगाव, कसवण-तळवडे, धारेश्वर-कासार्डे, वायंगणी, वराड, पोईप, मसुरे, किनळोस, बांबुळी, केरवडे कर्याद नारूर, साळगाव, रावदस-कुसेवाडा, पेंडुर, मळगाव, गेळे, नेमळे, माजगाव, माटणे, वझरे या जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सन ३0१६-१७ या आर्थिक वर्षात कामे करण्यात आली आहेत.

मानस पूर्णत्वास जाईल२०१७-१८ या वर्षासाठी ३७ गावांची निवड करण्यात आलेली आहे. पाणलोटची ८०० कामे प्रस्तावित करून १४ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

या आराखड्यानुसार कामे पूर्ण झाल्यास संरक्षित, फळबाग लागवड, दुबार पिकाखालील क्षेत्रात वाढ होणार असून जिल्ह्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. एकंदरीत जलयुक्त शिवार अभियानचा पाणी टंचाईमुक्त गावे हा मानस पूर्णत्वाकडे जाताना या जिल्ह्यात दिसत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारsindhudurgसिंधुदुर्ग