शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

विनोद कांबळी क्रिकेट अकादमी सुरू करणार, नितेश राणे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 23:04 IST

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्रिकेट खेळणारे गुणवंत खेळाडू असून, त्यांना मुंबई, पुणे सारख्या शहरात असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्रिकेट खेळणारे गुणवंत खेळाडू असून, त्यांना मुंबई, पुणे सारख्या शहरात असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. 1 फेब्रुवारीपासून 'विनोद कांबळी क्रिकेट अकादमी' सुरू करण्यात येणार आहे. कणकवली तालुक्यातील कलमठ येथे सर्व सुविधांनी युक्त असे मैदान तयार करण्यात येणार असून, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी खेळाडूंना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.जानवली येथील हॉटेल नीलम कंट्रीसाईड मध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्रिकेटपटू विनोद कांबळी, प्रशिक्षक ऋषिकेश भावे, खेळपट्टी तज्ज्ञ नदीम उपस्थित होते. आमदार नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गातील तरुणांना क्रिकेट आणि चित्रपटाचे वेड आहे. क्रिकेटीयर तसेच सिने अभिनेत्यांना हे तरुण देव मानतात. त्यांच्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करतात. काही जण त्यांच्यात असलेल्या जिद्द तसेच आत्मविश्वासाच्या जोरावर परिश्रम करून संबधित क्षेत्रात नावलौकिक कमावतात. मात्र, शहरात गेलेले बरेच जण परत ग्रामीण भागातील आपल्या गावाकडे परतत नाहीत.परंतु विनोद कांबळी हा चांगले मन असलेला खेळाडू आहे. सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण भागात येऊन तेथील गुणवंत क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्याचे त्याने ठरविले आहे. त्यासाठी त्याच्याच नावाने ही क्रिकेट अकादमी सुरू करण्यात येत आहे. विनोद कांबळी प्रत्येक महिन्यात पाच वेळा कलमठ येथील मैदाणात क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करणार आहे. त्याचे इतर क्रिकेटपटू मित्रही वेळोवेळी येथील खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत.40 खेळाडूंची बॅच असणार असून, मुले तसेच मुलींचा समावेश यामध्ये असेल. आंतरराष्ट्रीय खेळपट्टी तयार करणारे नदीम मुंबई येथे शिवाजी पार्क तसेच वानखेडे स्टेडियमसारख्या सुविधा येथे निर्माण करणार आहेत. 14 ते 16 वर्षाच्या तरुणांमधून 'टॅलेंट'असलेल्या खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील तरुण ज्यावेळी रणजी क्रिकेट स्पर्धेसारख्या स्पर्धेत खेलतील तो आमच्यासाठी समाधानाचा क्षण असेल असे आमदार राणे यावेळी म्हणाले.विनोद कांबळी म्हणाला, रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा हे माझे गाव आहे. ग्रामीण भागातील मुलांना क्रिकेट सारख्या क्षेत्रात कमी संधी मिळते. कपिल देव सारखे नावाजलेले क्रिकेटपटू ग्रामीण भागातूनच पुढे आले आहेत. त्यामुळे येथील खेळाडूंना माझ्याकडील सर्व कौशल्य सहकाऱ्यांच्या मदतीने शिकविणार आहे. त्यामुळे येथील मुलांनी फक्त मैदानात उतरावे त्यांना जे शिकायचे आहे ते आम्ही शिकवू. पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यावे. कारण खेळामुळेच एक चांगला माणूस घडू शकतो. मी एखाद्या शहरात अकादमी सुरू करू शकलो असतो. मात्र मला कोकणचे प्रेम येथे खेचून घेऊन आले, असेही तो यावेळी म्हणाला. यावेळी नदीम म्हणाले,  आमदार नितेश राणे यांचे विचार महान आहेत. त्यांनी येथील खेळाडूंना घडविण्याचा चांगला निर्णय घेतला असून, त्यांना आमचे सर्वोतोपरी सहकार्य राहील. येत्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय स्तरासारखे मैदान बनविण्यात येईल.रमाकांत आचरेकर यांना भारतरत्नने गौरवावे !आमचे गुरुजी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांनी जे जे आम्हाला शिकविले ते ते परत करायची वेळ आली आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मी घेतला आहे. रमाकांत आचरेकर यांनी आपल्या देशाला सचिन तेंडुलकर, सचिन आगरकर असे दहा ते बारा नामवंत खेळाडू दिले. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय असून त्यांना भारतातील ' भारतरत्न ' हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविणे आवश्यक आहे, असे मत यावेळी विनोद कांबळी याने व्यक्त केले.राजकारणात आलो नसतो तर खेळाडू झालो असतो!माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे तसेच मला क्रिकेटची आवड आहे. निलेश व मी शिवाजी पार्क येथे क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे आम्ही सर्वजणच राजकारणात आलो नसतो तर खेळाडूच झालो असतो. तसेच इथे जी फटके बाजी करतो आहोत ती तिथे केली असती, असे आमदार नितेश राणे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. तसेच या क्रिकेट अकडमीच्या माध्यमातून तयार झालेल्या 20 ते 25 खेळाडूंचा सर्व खर्च करून त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळविणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Vinod Kambliविनोद कांबळी