शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस; आंबा, काजू बागायतदार संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 18:32 IST

कणकवली : सर्वत्र कडाक्याच्या थंडी पडली असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह - अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आंबा, ...

कणकवली : सर्वत्र कडाक्याच्या थंडी पडली असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह - अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ, फणस, आदी झाडांच्या मोहोरावर मोठया प्रमाणात परिणाम जाणवू लागला आहे.ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने मोहोर जळून जात आहे. वारंवार पडणारा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण तसेच धुके यामुळे आंबा व काजू बागायत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी आंबा, काजू, बागायतींवर आपला उदरनिर्वाह करतो. मात्र बदलल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या  हातातोंडाशी घास हिरावून घेतला जात आहे. यामुळे बागायतदार शेतकरी मेटाकुटीला आला आहे.गेली दोन वर्षे कोरोना संसर्ग असल्यामुळे आंबा काजू शेतकरी संकटात असताना अवकाळी पावसामुळे यावर्षीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. कृषी विभागाने कोकणातील शेतकऱ्यांना, अवकाळी पावसामुळे झालेल्या बागायतदारांना, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी  केली जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गweatherहवामानRainपाऊसFarmerशेतकरी