शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

..त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही - नितेश राणे

By सुधीर राणे | Updated: August 13, 2024 16:33 IST

..तेव्हा महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल

कणकवली : ठाकरे सरकारच्या काळ्या आठवणी अजून महाराष्ट्र विसरलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज्य अधोगतिकडे गेले होते. वसुली करण्यापलीकडे काही काम या सरकारने  केले नाही. त्यामुळे ठाकरे यांचे सरकार पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.कणकवली येथे मंगळवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, संजय राऊत यांनी पुन्हा काँगेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची पुन्हा लायकी काढली आहे. दिल्लीत जाऊन काँगेसच्या पक्षश्रेष्ठींचे पाय धरायचे, त्यांना मुजरे करायचे आणि राज्यात येऊन छाती पुढे करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटावर बोलायचे ही त्यांची वृत्ती आहे. तेव्हा महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईलमुंबई महापालिकेसह सर्व महापालिका निवडणुका उशिरा होत आहेत. याला कारण ठाकरे व त्यांचे सहकारीच आहेत. ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे निवडणुका थांबल्या हे संजय राऊत यांना माहित नाही का? ज्या दिवशी ठाकरे गट याचिका मागे घेईल तेव्हा महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल. राज्यातील बहिणी सुज्ञ रवी राणांनी भाषण करताना मिश्किल टोले लागवले होते. ते संजय राऊत यांना समजले नाहीत. ठाकरेंचे सरकार आले कि लाडकी बहीण योजना बंद करणार असे राऊत बोलले होते. राज्यातील बहिणी सुज्ञ आहेत. त्या योग्य निर्णय घेतील. ठाकरे सरकार परत येणार नाही. तसेच महायुती सरकार व लाडकी बहीण योजना सुद्धा कायम सुरू रहाणार आहे असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.महायुती सरकारने दिलेल्या आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते शरद पवार यांना भेटले. त्यांनी घेतलेली भूमिका फार महत्वाची आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि तीच भूमिका पवार यांनी मांडली आहे. आमच्या महायुती सरकारने दिलेल्या आरक्षणाला पवार यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे समाजामध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम आता बंद करा. सर्वच नेत्यांची हीच भूमिका असेल तर हिंदुमध्ये फूट पाडण्याचे काम कोण करतय ? याचा शोध जनता घेईल. सरकारी नोकऱ्या मुस्लिम समाजाला मिळू न देण्याचा छुपा कार्यक्रम कोण करत आहे. हे कालच्या विधानावरून स्पष्ट झालंय असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे