शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

..त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही - नितेश राणे

By सुधीर राणे | Updated: August 13, 2024 16:33 IST

..तेव्हा महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल

कणकवली : ठाकरे सरकारच्या काळ्या आठवणी अजून महाराष्ट्र विसरलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज्य अधोगतिकडे गेले होते. वसुली करण्यापलीकडे काही काम या सरकारने  केले नाही. त्यामुळे ठाकरे यांचे सरकार पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.कणकवली येथे मंगळवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, संजय राऊत यांनी पुन्हा काँगेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची पुन्हा लायकी काढली आहे. दिल्लीत जाऊन काँगेसच्या पक्षश्रेष्ठींचे पाय धरायचे, त्यांना मुजरे करायचे आणि राज्यात येऊन छाती पुढे करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटावर बोलायचे ही त्यांची वृत्ती आहे. तेव्हा महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईलमुंबई महापालिकेसह सर्व महापालिका निवडणुका उशिरा होत आहेत. याला कारण ठाकरे व त्यांचे सहकारीच आहेत. ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे निवडणुका थांबल्या हे संजय राऊत यांना माहित नाही का? ज्या दिवशी ठाकरे गट याचिका मागे घेईल तेव्हा महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल. राज्यातील बहिणी सुज्ञ रवी राणांनी भाषण करताना मिश्किल टोले लागवले होते. ते संजय राऊत यांना समजले नाहीत. ठाकरेंचे सरकार आले कि लाडकी बहीण योजना बंद करणार असे राऊत बोलले होते. राज्यातील बहिणी सुज्ञ आहेत. त्या योग्य निर्णय घेतील. ठाकरे सरकार परत येणार नाही. तसेच महायुती सरकार व लाडकी बहीण योजना सुद्धा कायम सुरू रहाणार आहे असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.महायुती सरकारने दिलेल्या आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते शरद पवार यांना भेटले. त्यांनी घेतलेली भूमिका फार महत्वाची आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि तीच भूमिका पवार यांनी मांडली आहे. आमच्या महायुती सरकारने दिलेल्या आरक्षणाला पवार यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे समाजामध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम आता बंद करा. सर्वच नेत्यांची हीच भूमिका असेल तर हिंदुमध्ये फूट पाडण्याचे काम कोण करतय ? याचा शोध जनता घेईल. सरकारी नोकऱ्या मुस्लिम समाजाला मिळू न देण्याचा छुपा कार्यक्रम कोण करत आहे. हे कालच्या विधानावरून स्पष्ट झालंय असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे