शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

आडाळी लाँग मार्चला पाठींबा देण्यावरून भाजपातच दोन गट, परशुराम उपरकर यांचा आरोप 

By अनंत खं.जाधव | Published: August 28, 2023 6:36 PM

आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले

सावंतवाडी : आडाळी येथून निघालेल्या लाँग मार्च ला भाजप मधील एका गटाने पाठींबा दिला तर दुसरा गट सरकारची बदनामी करणारे कृत्य योग्य नाही म्हणतो मग खरा कोणाचे मानायचे या निमित्ताने भाजप मध्ये दोन ते तीन गट असल्याचे दिसून आले अशी टिका मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी  माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, प्रकाश साटेलकर, मंदार नाईक आदी उपस्थित होते.उपरकर म्हणाले, दीपक केसरकर यांनी अशी कोणती जादूची कांडी फिरविली की कायम विरोधात बोलणारे नारायण राणे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. या मागचे नेमके गमक काय? कोणत्या मुद्दावर ते एकत्र आले की ही सर्वसामान्य मतदारांची फसवणूक आहे? जिल्ह्याच्या भाजपात दोन ते तीन गट पडले आहेत. त्यामुळे सर्वजण एकमेकाला संपवायला निघाले आहेत. याचाच परिपाक दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत पहायला मिळाला. आपलेच लोक विरोधात गेले हे राणेंना अप्रत्यक्षरित्या कबूल करावे लागले, असेही त्यांनी सांगितले.केसरकर यांनी कायम स्वार्थी राजकारण केले आहे. दहशतवादाचा मुद्दा पुढे करुन त्यांनी नेहमी आपला स्वार्थ साधला आहे. पहिले ते शिवसेनेत गेले आणि त्यानंतर त्यांनी शिंदे गटात मंत्रीपद मिळविले. या काळात सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांबाबत त्यांना कोणतेही सोयर-सुतक राहिले नाही. त्यांनी जाहीर केलेली विकासकामे, रोजगाराभिमुख प्रकल्प आणि आश्वासने पुर्ण झालेली नाहीत.राणेंवर टिका राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोडामार्ग तालुक्याची निर्मिती केली. त्यानंतर ते उद्योगमंत्री होते. परंतु नंतरच्या दहा वर्षात त्यांना कोणताही विकास किंवा रोजगाराचा प्रकल्प आणण्यास का जमला नाही ? याचे त्यांनी उत्तर द्यावे. फक्त सिंधुदुर्गाचा जीडीपी वाढला, असे सांगुन लोकांची दिशाभूल करू नये.आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले सिंधुदुर्गभाजपात आता दोन ते तीन गट पडले आहेत. जो तो एकमेकाला संपविण्यासाठी निघाला आहे. त्याचा प्रत्यय दोडामार्गमध्ये घेण्यात आलेल्या सभेच्यावेळी आला. त्या ठिकाणी एकमेकांवर टिका करणारे केसरकर, राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले, असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर BJPभाजपाDeepak Kesarkarदीपक केसरकर