शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जामदा प्रकल्पातील संघर्षाचे रणशिंग

By admin | Updated: January 29, 2015 00:07 IST

बी. जी. कोळसेपाटील : काजिर्डातील शेतकरी परिषदेत दिला इशारा

राजापूर : शासनाच्या नियमांना पायदळी तुडवत अर्धवट अवस्थेत राहिलेल्या जामदा प्रकल्पाला कोणतेच भवितव्य नाही. त्यामुळे, येथील जनतेला कधीच न्याय मिळणार नाही. परिणामी, हा प्रकल्प तत्काळ रद्द करावा व त्याऐवजी गावातील तीन ठिकाणी छोटे प्रकल्प उभारावेत, असे एकमुखी आवाजात ठणकावून सांगत, समस्त काजिर्डावासीयांनी जामदा प्रकल्पाविरुद्ध संघर्षाचे रणशिंग फुंकले. प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेत ही भूमिका घेण्यात आली. त्यामुळे, अणुउर्जा पाठोपाठ तालुक्याच्या पूर्व परिसंवादातील धरण प्रकल्पातील संघर्ष नव्याने सुरु झाला आहे.सुमारे २० वर्ष जामदा प्रकल्पाचे घोडे अडले आहे व समस्त काजिर्डावासीयांनी आपापल्या मोलाच्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या. पण, त्यांना अद्याप कुठल्याच प्रकारची भरपाई मिळालेली नाही. उलट, इथल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, गाव पुढाऱ्यांनी छुप्या पद्धतीने शासनाशी अंतर्गत संधान बांधून समस्त प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल केली. त्यामुळे जामदा प्रकल्पवासीयांना अद्यापही न्यायासाठी झगडावे लागते आहे. त्या पार्श्वभूमीवर धर्मराज्य शेतकरी पक्षाने पुढाकार घेऊन काजिर्डा गावातील दत्तमंदिरात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेतकरी परिषद आयोजित केली होती. त्यावेळी धर्मराज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजन राजे, माजी निवृत्त न्यायमूर्ती बी. जे. कोळसेपाटील, महासचिव अनिल ठाणेकर, काजिर्डाचे उपसरपंच अशोक आर्डे, गावचे पाटील रामजी अप्पा पाटील उपस्थित होते.सन १९९५ साली प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सन २००६ साली सुरु झाले. तथापि, शासनाने येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी बळकावत सुमारे ३० ते ३५ टक्के काम मार्गी लावले मात्र दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडले. अद्याप कुठल्याच प्रकारची नुकसानभरपाई मिळालेली नाही. ‘४ अ’ची नोटीस बजावण्यात आली नाही. संपूर्ण गावच धरणातील बुडीत क्षेत्रात जाणार असूनही, नियमित पुनर्वसनाबाबत कोणतीच हालचाल करण्यात आली नाही. त्यासाठी लागणाऱ्या भूखंडाची ना निर्मिती करण्यात आली ना नियोजित भातशेतीच्या जमिनी ठरवण्यात आल्या. त्यामुळे संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी मागील चार ते पाच वर्षे पुनर्वसन न झाल्याने संपूर्ण धरणाचे कामच बंद पाडले आहे. या सर्व गोष्टींचा जोरदार उहापोह करण्यात आला. या सर्व प्रकल्पग्रस्तांना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना जनतेचे अधिकार काय आहेत, त्याची जाणीव करुन दिली. शासन जनतेला फसवत आहे. मूठभर लोकांच्या भल्यासाठी ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या लाखमोलाच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न सर्वांनी हाणून पाडा, त्यासाठी एकजूट दाखवा, असे आवाहन सर्वस्वी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील, धर्मराज्य शेतकरी पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, महासचिव अनिल ठाणेकर, मोहन नारकर, संतोष काजरे, फुलाजी पाटील, शिवाजी कांबळे यांनी केले. आता माघार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. (प्रतिनिधी)कोल्हापुरातील ग्रामस्थ उपस्थितशासनाने ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ लागू केल्याने अनेक गावांना त्याचा फटका बसत आहे. काजिर्डा गावदेखील त्यामध्ये आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळे तालुक्यातील सुमारे १४ ते २० गावातील तेथील बाधित प्रकल्पग्रस्त देखील मोठ्या संख्येने काजिर्डावासीयांना पाठबळ देण्यासाठी उपस्थित होते.