शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाचे पाणी नदीत; संताप व्यक्त

By admin | Updated: November 14, 2014 23:18 IST

अजमल पटेल : गोवळकोटमधील प्रकार

चिपळूण : शहरातील गोवळकोट भागातील सार्वजनिक शौचालयाचे पाणी नदीत सोडले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अजमल पटेल यांनी केली आहे. सर्वत्र स्वच्छता मोहिमेचा नारा दिला जात आहे. विविध खात्यांचे अधिकारीही हातामध्ये झाडू घेऊ लागले आहेत. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज आहे. गोवळकोट व अन्य भागात सध्या मोठमोठ्या इमारतींची बांधकामे सुरु आहेत. यासाठी ठेकेदार परप्रांतीय मजूर घेऊन ही कामे करीत आहेत. ठेकेदाराने संबंधित कामगारांचा शौचालयाचा प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. मात्र, बांधकामावर काम करणारे काही कामगार सकाळच्या वेळी गोवळकोट जॅकवेल परिसरात शौचास बसतात. तसेच काही मटण, मच्छी विक्रेते नदीपात्रातच कोंबड्यांचे अवशेष टाकत असल्याचे चित्र आहे. या भागात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाचे पाणी नदीपात्रातच सोडण्यात आले असल्याने संभाव्य आरोग्यास या पाण्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पटेल यांनी व्यक्त केली. घर तेथे शौचालय अशी शासनाची भूमिका असून, बांधकाम करणारे व्यावसायिक कामगारांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करीत नसल्याची स्थिती दिसून येत आहे. या प्रकारामुळे अस्वच्छता वाढली आहे. सार्वजनिक शौचालयांबाबत नगर परिषद प्रशासनाने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. याबाबत प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांना लवकरच निवेदन देणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. नगर परिषद प्रशासन व विविध खात्याचे अधिकारी सध्या स्वच्छता मोहिमेतून पुढे येत आहेत. मात्र, नागरिकांनीही या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे, असे पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)नागरिक संतापले...चिपळूण शहरातील गोवळकोट या गजबजलेल्या भागात सार्वजनिक शौचालयाचे पाणी नदीत सोडल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकाराने नागरिक संतप्त झाले असून, प्रशासनाला जाब विचारणार आहेत.सार्वजनिक शौचालयाचे पाणी नदीत. माजी नगराध्यक्ष अजमल पटेल झाले आक्रमक.पालिका प्रशासनावर हल्लाबोल. स्वच्छता मोहीम सुरू असताना या प्रकाराने नागरिक संतप्त. आरोग्यास धोका निर्माण झाल्यास पालिका जबाबदार. स्वच्छतेसाठी प्रयत्न आवश्यक, प्रशासनावर जबाबदारी मोठी.