शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

Nitesh Rane: शिवरायांना नव्हे हे तर औरंगजेबला मानणारे, आमदार नितेश राणेंचे राज्य सरकार टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:01 IST

जर आम्ही रातोरात पुतळा हलवला आणि योग्य जागी बसवला तर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे नाहीत

कणकवली : पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीतील सर्व्हिस रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यासंदर्भात नागरिकांना शब्द दिला होता. पण अद्याप पुतळ्याचे स्थलांतरण झाले नसल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचा पर्याय निवडला आहे. या उपोषणाला आमदार नितेश राणे यांनी पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी राज्यसरकारवर हल्लाबोल चढवला. शिवरायांना नव्हे हे तर औरंगजेबला मानणारे राज्य सरकार असल्याची टीका आमदार राणे यांनी केली.कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर भाजपच्यावतीने सुरू असलेल्या उपोषणाला आमदार नितेश राणे यांनी पाठिंबा दिला.  उपोषणस्थळी त्यांनी भेट देऊन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची चौकशी केली. यावेळी ते म्हणाले, पालकमंत्र्यांच्या शब्दाला जर प्रशासन किंमत देत नसेल तर कायदा व सुव्यवस्था राखणे ही केवळ आमची जबाबदारी नाही. जर आम्ही रातोरात पुतळा हलवला आणि योग्य जागी बसवला तर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे नाहीत, असा इशारा देखील आमदार राणे यांनी दिला.जिल्ह्यात तांडव निर्माण झाले तर...छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा आम्हाला कोणी मोठे नाही.  पालकमंत्र्यांची राज्य सरकार मध्ये काय किंमत आहे? ते बघण्यासाठी अजून पर्यंत आम्ही थांबलो होतो. मात्र, आता थांबणार नाही. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईपर्यंत आम्ही काही हात बांधून गप्प बसत पाहत राहणार नाही. आमच्या पदाची आम्हाला चिंता नाही. पुतळा स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावरून जर जिल्ह्यात तांडव निर्माण झाले तर आमची त्याला तयारी आहे. असा इशारा देखील राणे यांनी दिला.यावेळी भाजपचे कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्राची कर्पे, प्रज्ञा ढवण, मेघा गांगण राजश्री धुमाळे, साक्षी वाळके, पप्पू पुजारे, शिवसुंदर देसाई, अभय घाडीगावकर, संदीप सावंत, राजू हिर्लेकर, राजन चिके, महेश सावंत, अभिजीत मुसळे, बंडू गांगण, संजय ठाकूर भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे आदी उपस्थित होते. यावेळी पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची देखील आमदार राणे यांनी पाहणी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUday Samantउदय सामंत