शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

महायुती सरकार बेरोजगारांच्या मुळावर उठले, कंत्राटी भरतीवरुन परशुराम उपरकरांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Updated: September 16, 2023 18:18 IST

सरकार बेरोजगार तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहे

कणकवली: सद्याचे महायुती सरकार हे बेरोजगारांच्या मुळावर उठले आहे. राज्यात आणि जिल्ह्यात बेरोजगारी वाढत असताना भरतीबाबत नोटीस काढत दोन ते चार वेळा भरतीप्रक्रिया पुढे ढकलली आहे. कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करून तरुणांची फसवणूक केली आहे. ही भरतीप्रक्रिया एजंटाच्या माध्यमातून राबविली जाणार आहे. सरकार बेरोजगार तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, कंत्राटी पद्धतीने विविध विभागांमध्ये आता राज्य सरकार भरती करणार आहे. त्या कंपन्यांना १५ टक्के देण्याचे धोरण निश्चित केले आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी नोकऱ्या देण्यासाठी कंपनी नेमली. एजंट बेरोजगारांना गाठून लाखो रुपये घेऊन भरती होईल असे सांगत आहेत. मात्र, या भरती झालेल्या तरुणांच्या नोकऱ्या कायमस्वरूपी राहणार का? याची शाश्वती कोणीच देत नाही. त्यामुळे काही वर्षानंतर त्या तरुणांची नोकरी जाण्याची दाट शक्यता आहे. अशी भीतीही परशुराम उपरकर यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच तरुणांनी सावध व्हावे असे आवाहनही केले. भरती झालेल्या तरुणांना ५ वर्षानंतर नोकरीची हमी राहणार नाही. या तरुणांच्या जीवाशी खेळण्याचं काम राज्य सरकारने चालवले आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेला मनसेचा विरोध असल्याचेही उपरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर Governmentसरकार