शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Shaktipeeth Highway: सिंधुदुर्गवासियांनो साथ द्या, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देईन; राजू शेट्टींचे भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 16:23 IST

कोणी फटके मारण्याची भाषा करत असेल तर मी फटके ही खायला तयार 

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाकडून होऊ घातलेला शक्तिपीठ महामार्ग हा स्वार्थपीठ आहे, या महामार्गामुळे सत्ताधारी राज्याला कर्जाच्या खाईत लोटणार असून हा महामार्ग रद्द होण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहीन प्रसंगी कोणी फटके मारण्याची भाषा करत असेल तर मी फटके ही खायला तयार आहे. पण हा महामार्ग रद्द व्हायला हवा त्यासाठी सिंधुदुर्गने साथ द्यावी असे भावनिक आवाहन शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते सावंतवाडीत बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रादेवी गोवा या परिसरालाही भेट दिली.यावेळी माजी आमदार वैभव नाईक, कॉम्रेड संपत देसाई, बाबुराव धुरी, संदेश पारकर, सतीश सावंत, डाॅ जयेंद्र परुळेकर, इर्शाद शेख, रुपेश राऊळ, संदिप सावंत, नागेश चौगुले, राजेंद्र गुडेनवर, संग्राम कुपेकर, जिल्हाप्रमुख सुनिल शित्रे, रूपेश राऊळ आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग विरोधात आम्ही उभा केलेला लढा हा राजकीय नाही तर हा लढा भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी आहे, पर्यावरण वाचविण्याबरोबरच सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसाधारण जनतेला महापुरा पासून वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी उभारण्यात आलेला आहे.

प्रकल्प दीड लाख कोटीपर्यंत जाणार

शासन या महामार्गावर ८६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे, मात्र सरकारच्या कार्यपद्धतींचा विचार करताना कुठलाच प्रकल्प हा सांगितलेल्या रकमेत पूर्ण झाला नाही ही वस्तुस्थिती असून शक्तिपीठ हा प्रकल्प दीड लाख कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे आणि हा खर्च शासनाला परवडणारा नसून राज्य कर्जाच्या खाईत लोटणार जाईल अशी भिती व्यक्त केली. ..तर फटके खायची माझी तयारी सिंधुदुर्गातून जाणाऱ्या या महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देऊ अशी धमकी या ठिकाणी दिली जात आहे. मात्र जर खरोखरच हा महामार्ग रद्द होत असेल तर ते फटके खायची तयारी माझी आहे, स्थानिक आमदार दीपक केसरकर हे तर हा महामार्ग सिंधुदुर्गातून पूर्वी ज्या भागातून जात होता तो भाग वगळून आता दुसऱ्या मार्गाने जाणार असल्याचे सांगत आहेत. मात्र तशा प्रकारचा कुठलाही बदल राज्य सरकारने केलेला नाही.केसरकरांनी 'त्याचे' उत्तर द्यावेआमदार केसरकर यांच्या म्हणण्यानुसार तो दुसऱ्या बाजूने नेला तरी तेथील डोंगरातून बोगदा मारून तो पलीकडे कसा नेणार त्या ठिकाणी उत्खनन हे होणार नाही का तेथील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटणार नाहीत का? याची उत्तर त्यांनी द्यावे. त्यामुळे इतर जिल्ह्याप्रमाणे सिंधुदुर्गनेही या महामार्गाच्या विरोधात लढा देणे गरजेचे आहे.