शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Shaktipeeth Highway: सिंधुदुर्गवासियांनो साथ द्या, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देईन; राजू शेट्टींचे भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 16:23 IST

कोणी फटके मारण्याची भाषा करत असेल तर मी फटके ही खायला तयार 

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाकडून होऊ घातलेला शक्तिपीठ महामार्ग हा स्वार्थपीठ आहे, या महामार्गामुळे सत्ताधारी राज्याला कर्जाच्या खाईत लोटणार असून हा महामार्ग रद्द होण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहीन प्रसंगी कोणी फटके मारण्याची भाषा करत असेल तर मी फटके ही खायला तयार आहे. पण हा महामार्ग रद्द व्हायला हवा त्यासाठी सिंधुदुर्गने साथ द्यावी असे भावनिक आवाहन शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते सावंतवाडीत बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रादेवी गोवा या परिसरालाही भेट दिली.यावेळी माजी आमदार वैभव नाईक, कॉम्रेड संपत देसाई, बाबुराव धुरी, संदेश पारकर, सतीश सावंत, डाॅ जयेंद्र परुळेकर, इर्शाद शेख, रुपेश राऊळ, संदिप सावंत, नागेश चौगुले, राजेंद्र गुडेनवर, संग्राम कुपेकर, जिल्हाप्रमुख सुनिल शित्रे, रूपेश राऊळ आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग विरोधात आम्ही उभा केलेला लढा हा राजकीय नाही तर हा लढा भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी आहे, पर्यावरण वाचविण्याबरोबरच सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसाधारण जनतेला महापुरा पासून वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी उभारण्यात आलेला आहे.

प्रकल्प दीड लाख कोटीपर्यंत जाणार

शासन या महामार्गावर ८६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे, मात्र सरकारच्या कार्यपद्धतींचा विचार करताना कुठलाच प्रकल्प हा सांगितलेल्या रकमेत पूर्ण झाला नाही ही वस्तुस्थिती असून शक्तिपीठ हा प्रकल्प दीड लाख कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे आणि हा खर्च शासनाला परवडणारा नसून राज्य कर्जाच्या खाईत लोटणार जाईल अशी भिती व्यक्त केली. ..तर फटके खायची माझी तयारी सिंधुदुर्गातून जाणाऱ्या या महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देऊ अशी धमकी या ठिकाणी दिली जात आहे. मात्र जर खरोखरच हा महामार्ग रद्द होत असेल तर ते फटके खायची तयारी माझी आहे, स्थानिक आमदार दीपक केसरकर हे तर हा महामार्ग सिंधुदुर्गातून पूर्वी ज्या भागातून जात होता तो भाग वगळून आता दुसऱ्या मार्गाने जाणार असल्याचे सांगत आहेत. मात्र तशा प्रकारचा कुठलाही बदल राज्य सरकारने केलेला नाही.केसरकरांनी 'त्याचे' उत्तर द्यावेआमदार केसरकर यांच्या म्हणण्यानुसार तो दुसऱ्या बाजूने नेला तरी तेथील डोंगरातून बोगदा मारून तो पलीकडे कसा नेणार त्या ठिकाणी उत्खनन हे होणार नाही का तेथील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटणार नाहीत का? याची उत्तर त्यांनी द्यावे. त्यामुळे इतर जिल्ह्याप्रमाणे सिंधुदुर्गनेही या महामार्गाच्या विरोधात लढा देणे गरजेचे आहे.