शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

वृक्ष लागवडीपेक्षा कत्तल थांबवा

By admin | Updated: June 17, 2016 00:48 IST

महेंद्र नाटेकर : दररोज १०० ट्रक लाकूड; पश्चिम महाराष्ट्र, गोवा, मुंबई येथे वाहतूक

कणकवली : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, या कोकणातील पाच जिल्ह्यांत प्रचंड वन वृक्षतोड होत आहे. यातील प्रत्येक जिल्ह्यातून दररोज १०० ट्रक लाकूड पश्चिम महराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मुंबई या भागात जाते. कोट्यवधी वृक्षांची कत्तल होत असताना ती थांबविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न न करता १ जुलैला जे दोन कोटी वृक्ष लावले जाणार आहेत, म्हणून वन व महसूल खाते आपली पाठ थोपटून घेत आहे, हे हास्यास्पद आहे.अशी घणाघाती टीका सिंधुदुर्ग जिल्हा वृक्षमित्र सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केली.सिंधुदुर्ग जिल्हा वृक्षमित्र सेवा संघाची सभा येथील वृक्षमित्र हॉलमध्ये झाली. यावेळी शांताराम नारकर, विश्वनाथ केरकर, प्रा. सुभाष गोवेकर, बाबूराव आरेकर, सुभाष कांबळी, संदेश पाताडे, आदी उपस्थित होते. प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, दोन कोटी वृक्ष लावतात ही आनंदाची गोष्ट आहे; परंतु ते जगविण्याचे नियोजन करून त्यांची समर्थ कार्यवाही होणार का? आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेतला तर २५ टक्केही वृक्ष जगविले जात नाहीत. लावलेले वृक्ष जगवायचे असतात, याचेही कोणाला फारसे भान दिसत नाही. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या परिसरात स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी अवलोकन करावे, म्हणजे आम्ही काय म्हणतो, याची त्यांना प्रचिती येईल. (वार्ताहर)रक्षकच झाले वृक्षभक्षकवन व महसूल खात्याच्या आशीर्वादाने प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असते. वृक्षांचे रक्षण व्हावे म्हणून त्यांच्या नेमणुका झाल्या असतात. पण, आपले कर्तव्य विसरून बहुसंख्य रक्षक वृक्षभक्षक झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक ब्रॅकेटच बनले आहे. हे बॅ्रकेट फोडून त्यांना कठोर शासन केले असते, तर दोन कोटी वृक्ष लावण्याची पाळी आली नसती. जंगलातील जुुनाट वृक्ष तोडून ते नेण्यासाठी वाहतूक पास दिले जातात; परंतु अशा परवानगीच्या निमित्ताने वनअधिकाऱ्यांशी संगनमताने लहान, थोर सारेच वृक्ष तोडले जातात. काही वृक्ष तोडून पाच सहा महिन्यांनी सुकल्यांनतर जुनाट झाल्याचे भासवून वाहून नेले जातात. तेच तेच पास पुन्हा वापरले जातात. जेवढे वृक्ष तोडण्याची परवानगी दिलेली असते, त्याच्या अनेकपटींनी वृक्षतोड केली जाते. वृक्षतोडीमुळे कोकण झाले भकासअवैध वृक्षतोडीला आळा बसावा यासाठी रस्त्यावर चेक नाके ठेवले आहेत. हेी चेक नाके भ्रष्टाचार नाके झाले आहेत. शेकडो वाहने या नाक्यावर बराच वेळ थांबतात. साटेलोटे झाल्यावर काही वेळाने निघून जातात. या नाक्यावर लाकूड जप्त करून ठेवल्याचे दिसत नाही. लोकांच्या दबावामुळे ठिकठिकाणी लाकडे जप्त केली जातात; पण लोकक्षोभ शांत झाल्यावर ते लाकूड गायब होते. असलेले कोकण भकास झाले असून, तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे. कायद्याचे कठोर पालन हाच यावरील सर्वांत चांगला उपाय आहे.