शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

वृक्ष लागवडीपेक्षा कत्तल थांबवा

By admin | Updated: June 17, 2016 00:48 IST

महेंद्र नाटेकर : दररोज १०० ट्रक लाकूड; पश्चिम महाराष्ट्र, गोवा, मुंबई येथे वाहतूक

कणकवली : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, या कोकणातील पाच जिल्ह्यांत प्रचंड वन वृक्षतोड होत आहे. यातील प्रत्येक जिल्ह्यातून दररोज १०० ट्रक लाकूड पश्चिम महराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मुंबई या भागात जाते. कोट्यवधी वृक्षांची कत्तल होत असताना ती थांबविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न न करता १ जुलैला जे दोन कोटी वृक्ष लावले जाणार आहेत, म्हणून वन व महसूल खाते आपली पाठ थोपटून घेत आहे, हे हास्यास्पद आहे.अशी घणाघाती टीका सिंधुदुर्ग जिल्हा वृक्षमित्र सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केली.सिंधुदुर्ग जिल्हा वृक्षमित्र सेवा संघाची सभा येथील वृक्षमित्र हॉलमध्ये झाली. यावेळी शांताराम नारकर, विश्वनाथ केरकर, प्रा. सुभाष गोवेकर, बाबूराव आरेकर, सुभाष कांबळी, संदेश पाताडे, आदी उपस्थित होते. प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, दोन कोटी वृक्ष लावतात ही आनंदाची गोष्ट आहे; परंतु ते जगविण्याचे नियोजन करून त्यांची समर्थ कार्यवाही होणार का? आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेतला तर २५ टक्केही वृक्ष जगविले जात नाहीत. लावलेले वृक्ष जगवायचे असतात, याचेही कोणाला फारसे भान दिसत नाही. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या परिसरात स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी अवलोकन करावे, म्हणजे आम्ही काय म्हणतो, याची त्यांना प्रचिती येईल. (वार्ताहर)रक्षकच झाले वृक्षभक्षकवन व महसूल खात्याच्या आशीर्वादाने प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असते. वृक्षांचे रक्षण व्हावे म्हणून त्यांच्या नेमणुका झाल्या असतात. पण, आपले कर्तव्य विसरून बहुसंख्य रक्षक वृक्षभक्षक झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक ब्रॅकेटच बनले आहे. हे बॅ्रकेट फोडून त्यांना कठोर शासन केले असते, तर दोन कोटी वृक्ष लावण्याची पाळी आली नसती. जंगलातील जुुनाट वृक्ष तोडून ते नेण्यासाठी वाहतूक पास दिले जातात; परंतु अशा परवानगीच्या निमित्ताने वनअधिकाऱ्यांशी संगनमताने लहान, थोर सारेच वृक्ष तोडले जातात. काही वृक्ष तोडून पाच सहा महिन्यांनी सुकल्यांनतर जुनाट झाल्याचे भासवून वाहून नेले जातात. तेच तेच पास पुन्हा वापरले जातात. जेवढे वृक्ष तोडण्याची परवानगी दिलेली असते, त्याच्या अनेकपटींनी वृक्षतोड केली जाते. वृक्षतोडीमुळे कोकण झाले भकासअवैध वृक्षतोडीला आळा बसावा यासाठी रस्त्यावर चेक नाके ठेवले आहेत. हेी चेक नाके भ्रष्टाचार नाके झाले आहेत. शेकडो वाहने या नाक्यावर बराच वेळ थांबतात. साटेलोटे झाल्यावर काही वेळाने निघून जातात. या नाक्यावर लाकूड जप्त करून ठेवल्याचे दिसत नाही. लोकांच्या दबावामुळे ठिकठिकाणी लाकडे जप्त केली जातात; पण लोकक्षोभ शांत झाल्यावर ते लाकूड गायब होते. असलेले कोकण भकास झाले असून, तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे. कायद्याचे कठोर पालन हाच यावरील सर्वांत चांगला उपाय आहे.