शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावल्यास एसटी टिकेल : दिलीप पांढरपट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:39 PM

खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा आधार एसटीची सेवा आहे. ही सेवा देत असताना सुरक्षितता व जागरूकताही तेवढीच महत्वाची आहे. सिंधुदुर्ग एस . टी . विभागात अपघातांचे प्रमाण कमी आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र , सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावली तरच एसटी टिकेल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावल्यास एसटी टिकेल : दिलीप पांढरपट्टे यांचे मत कणकवली येथे एसटीच्या सुरक्षितता मोहिम पंधरवड्याचे आयोजन

कणकवली : खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा आधार एसटीची सेवा आहे. ही सेवा देत असताना सुरक्षितता व जागरूकताही तेवढीच महत्वाची आहे. सिंधुदुर्ग एस . टी . विभागात अपघातांचे प्रमाण कमी आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र , सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावली तरच एसटी टिकेल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले.राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने ११ ते २५ जानेवारी २०२० या कालावधीत सुरक्षितता मोहिम पंधरवड्याचे आयोजन केले आहे . या मोहिमेच्या शुभारंभ शनिवारी कणकवली येथे झाला . यावेळी डॉ. दिलीप पांढरपट्टे बोलत होते .यावेळी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ , उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ . नितीन कटेकर , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी , तहसिलदार आर. जे. पवार, एसटीचे विभागिय यंत्र अभियंता आर. एल. कांबळे, कणकवली आगार व्यवस्थापक प्रमोद यादव, इंटकचे विभागिय अध्यक्ष अशोक राणे, कामगार संघटनेचे विभागिय सचिव विनय राणे, श्रीमती कुबडे, निलेश लाड, वाहन निरीक्षक जावेद शिकलगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, गोसावी, सरनोबत व इतर अधिकारी उपस्थित होते .डॉ. पांढरपट्टे म्हणाले, एसटीला लोकवाहिनी म्हटले जाते. एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास ही बाब ग्रामिण भागातील प्रत्येकाच्या मनावर बिंबलेली आहे. एखाद्या किरकोळ चुकीमुळेही गंभीर अपघात होऊ शकतो, यासाठी सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची आहे. मार्गावर असणाऱ्या होडींग, बॅनर यांच्यावरही नियंत्रण असायला हवे , कारण त्यापासूनही अपघात होऊ शकतात. तसेच चालकांचे आरोग्यही तेवढेच महत्वाचे आहे.त्यादृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे . जागरूकता कायम ठेवली तर अपघाताचे प्रमाण आणखीन कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असेही पांढरपट्टे म्हणाले. यावेळी नितीन कटेकर यांनी सुरक्षिततेकडे लक्ष केंद्रीत केले जात आहे, ही बाब निश्चितच चांगली असल्याचे स्पष्ट करताना जगभरातील एकून वाहन संख्येच्या १ टक्के वाहने भारतात आहेत .मात्र जगभरात होणाऱ्या रस्ते अपघाताच्या ६ टक्के अपघात भारतात होतात व एकूण मृत्यूच्या १० टक्के लोक भारतातील मरतात , असे स्पष्ट केले . अनेकदा अपघात वाहनांचा जास्त वेग , दारू पिऊन वाहन चालविणे , वाहन चालविताना बोलणे किंवा चालकाला पुरेशी विश्रांती नसणे यामुळे होत असतात.

प्रसाद दळवी म्हणाले, अपघात सांगून येत नसतात . पण आवश्यक काळजी , सुरक्षितता घेतली तर अपघात टाळता येऊ शकतात . यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना . कायदे करण्यात येत आहेत . मात्र ,केवळ कायदे करून दंड वाढवून प्रश्न सुटणार नाहीत. तर मानसिकतेत बदल व्हायला हवा , असे सांगितले .तर अवैध वाहतूक रोखण्यासाठी पथक कार्यरत असल्याचे सांगितले.प्रास्ताविक करताना प्रकाश रसाळ म्हणाले, गत वर्षभरात सिंधुदुर्ग विभागात ५३ अपघात झाले . यात ६ प्राणांतीक , ३४ गंभीर व १३ किरकोळ होते . यापोटी ८६ लाखांची भरपाई एसटीकडून देण्यात आले आहेत. एसटीकडून सुरक्षिततेबाबतच्या सूचना देण्यात येत असतात. हा पंधरवडा सुरक्षितता मोहिम म्हणून राबविण्यात येत असला तरीही आपण कायम सुरक्षिततेला प्राधान्य देत काम केले पाहिजे , असे संगितले . यावेळी आर . एल . कांबळे , अशोक राणे . विनय राणे आदींनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अभय खडपकर यांनी केले तर आभार रविंद्र भिसे यांनी मानले . 

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग