शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणून पालकमंत्र्यांकडून आंबा बागायतींची पाहणी, सुशांत नाईक यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 18:45 IST

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा आणि काजू पिकाचे सुमारे ८० ते ८५ टक्के नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी ...

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा आणि काजू पिकाचे सुमारे ८० ते ८५ टक्के नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी भरपाई मिळावी म्हणून देवगडसह जिल्ह्यातील शेतकरी तथा आंबा, काजू बागायतदार आवाज उठवत आहेत. मात्र शासन कोणतीही दखल घेत नसल्याने अखेर १२ मार्च रोजी जिल्हाव्यापी मोर्चा काढण्याचे निश्चित झाले. शासनाविरोधात मोर्चा निघणार हे समजताच पालकमंत्री धावाधाव करून नुकसानग्रस्त बागायतींची पाहणी करत आहेत. एवढेच नव्हे तर मोर्चा दडपून टाकण्याची भाषा बोलत आहेत अशी टीका उद्धवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख तथा कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली आहे. कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष दालनात सोमवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक जयेश धुमाळे, तेजस राणे उपस्थित होते.ते म्हणाले, यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा आणि काजू बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. मोहोर काळा पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली नाही. परिणामी आंबा आणि काजू पिकाचे सुमारे ८० ते ८५ टक्के नुकसान झाले आहे. याबाबतचा नजरपाहणी अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाला सादर केला आहे. मात्र, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याबाबत कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.गतवर्षी जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकावर थ्रिप्स रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी बागायतदारांनी लाखो रुपये खर्च करून कीटकनाशकांची फवारणी केली. मात्र, ही कीटकनाशके बोगस ठरली आणि त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यावेळी आंदोलन झाल्यानंतर तत्कालीन आमदार व विद्यमान पालकमंत्र्यांनी बोगस कीटकनाशकांचे पैसे देऊ नका, असे आवाहन केले होते. तरीही कीटकनाशक पुरवठादार कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल केल्याचा आरोप त्यांनी केला.गेल्या महिनाभरापासून बागायतदार नुकसानभरपाईसाठी सातत्याने मागणी करत आहेत. मात्र शासनाकडून कोणताही निर्णय होत नाही. त्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांमध्ये असंतोष वाढत आहे. देवगडमधून या आंदोलनाची सुरुवात झाली असून त्याला सर्व पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. १२ मार्च रोजी मोर्चाची तारीख देखील निश्चित झाली आहे.सिंधुदुर्गातील आंबा बागायतदारांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी देखील जिल्ह्यात येऊन गेले होते. त्यांनीही शासनाने तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांच्या वक्तव्यावरून पालकमंत्री संतप्त होताना दिसत आहेत. तसेच आंबा बागायतदारांचा मोर्चा दडपण्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला. प्रत्यक्षात पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न विधिमंडळात मांडायला हवा होता, असेही ते म्हणाले.दरम्यान, राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा अध्यादेश काढला असला तरी सिंधुदुर्गात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ही केंद्रे ग्रामपंचायतीच्या जागेत उभारली जाणार असून त्या जागेचे भाडे शासनाकडून दिले जाते. मात्र जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच असल्याने या केंद्रांच्या उभारणीबाबत चालढकल केली जात असल्याचा आरोप नाईक यांनी केला. यामुळे बागायतदारांना अचूक हवामान माहिती मिळत नसल्याने त्याचा मोठा फटका बसत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Guardian Minister Inspects Mango Orchards After Criticism; Naik Slams Actions

Web Summary : Following crop damage in Sindhudurg, Guardian Minister's orchard visit draws criticism. Sushant Naik accuses the minister of suppressing protests instead of addressing farmer losses. Farmers demand compensation amid growing discontent, planning a march due to government inaction.