शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा यापुढील  खासदार भाजपाचाच असेल! केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 21:25 IST

Sindhudurg-Ratnagiri Lok Sabha: पक्षासाठी असलेली निष्ठा आणि आत्मीयतेने सुरू असलेले येथील काम पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात  भाजपचाच खासदार निवडून येणार असल्याचा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.

- सुधीर राणे 

कणकवली - गेल्या आठ वर्षात मोदी सरकारने देशभरात जेवढ्या जनकल्याणाच्या योजना राबवल्या तेवढ्या योजना गेल्या ६७ वर्षात कोणतेही सरकार राबवू शकलेले नाही.  महाराष्ट्रातही पुन्हा भाजपचे सरकार आलेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या योजना अधिक जोमाने सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटितपणे काम करा. पक्षासाठी असलेली निष्ठा आणि आत्मीयतेने सुरू असलेले येथील काम पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात  भाजपचाच खासदार निवडून येणार असल्याचा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.

कणकवली येथे भाजपा लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत गुरुवारी आयोजित कणकवली विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे , भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,लोकसभा संयोजक अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत , विधानसभा संयोजक मनोज रावराणे , विधानसभा सहाय्यक संयोजक संदीप साटम , महिला जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे , नगराध्यक्ष समीर नलावडे , वैभववाडी नगराध्यक्ष नेहा माईणकर , कणकवली विधानसभा मतदार संघातील  पदाधिकारी ,माजी जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , नगरसेवक , सरपंच , उपसरपंच , सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र सरकारच्या योजनेतील जनतेला अपेक्षित असलेले बदल आणि कारणे जाणून घेतली. लाभार्थ्यापर्यंत केंद्र शासनाच्या योजना अजून व्यापक स्वरूपात पोहोचाव्यात म्हणून काय केले जावे? याबाबतचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर ते बोलत होते.

ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील अनेक प्रश्न केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आमदार नितेश राणे व भाजपचे पदाधिकारी केंद्र सरकारकडे मांडत आहेत. आपण कार्यकर्ते म्हणून काम करत असताना पक्षाच्या योजना तळमळीने मांडता हे पाहून समाधान वाटते.  २०१४ च्या पूर्वी देशात अनेक सरकारे होती. मात्र सामान्य जनतेच्या गरजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणल्या. यशस्वी पंतप्रधानांच्या यशस्वी योजनांची चर्चा कार्यकर्ते म्हणून जनतेपर्यंत पोहचवा आणि नवनव्या योजनांचे लाभ जनतेला मिळवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाजपा आमदार नितेश राणे यांनी चर्चेदरम्यान पदाधिकारी आणि केंद्रीय गृहमंत्री मिश्रा यांच्यात समन्वय साधला.आमदार राणे यांनी केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचा भगवी शाल, सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.इतर मान्यवरानीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग