शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा यापुढील  खासदार भाजपाचाच असेल! केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 21:25 IST

Sindhudurg-Ratnagiri Lok Sabha: पक्षासाठी असलेली निष्ठा आणि आत्मीयतेने सुरू असलेले येथील काम पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात  भाजपचाच खासदार निवडून येणार असल्याचा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.

- सुधीर राणे 

कणकवली - गेल्या आठ वर्षात मोदी सरकारने देशभरात जेवढ्या जनकल्याणाच्या योजना राबवल्या तेवढ्या योजना गेल्या ६७ वर्षात कोणतेही सरकार राबवू शकलेले नाही.  महाराष्ट्रातही पुन्हा भाजपचे सरकार आलेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या योजना अधिक जोमाने सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटितपणे काम करा. पक्षासाठी असलेली निष्ठा आणि आत्मीयतेने सुरू असलेले येथील काम पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात  भाजपचाच खासदार निवडून येणार असल्याचा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.

कणकवली येथे भाजपा लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत गुरुवारी आयोजित कणकवली विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे , भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,लोकसभा संयोजक अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत , विधानसभा संयोजक मनोज रावराणे , विधानसभा सहाय्यक संयोजक संदीप साटम , महिला जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे , नगराध्यक्ष समीर नलावडे , वैभववाडी नगराध्यक्ष नेहा माईणकर , कणकवली विधानसभा मतदार संघातील  पदाधिकारी ,माजी जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , नगरसेवक , सरपंच , उपसरपंच , सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र सरकारच्या योजनेतील जनतेला अपेक्षित असलेले बदल आणि कारणे जाणून घेतली. लाभार्थ्यापर्यंत केंद्र शासनाच्या योजना अजून व्यापक स्वरूपात पोहोचाव्यात म्हणून काय केले जावे? याबाबतचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर ते बोलत होते.

ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील अनेक प्रश्न केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आमदार नितेश राणे व भाजपचे पदाधिकारी केंद्र सरकारकडे मांडत आहेत. आपण कार्यकर्ते म्हणून काम करत असताना पक्षाच्या योजना तळमळीने मांडता हे पाहून समाधान वाटते.  २०१४ च्या पूर्वी देशात अनेक सरकारे होती. मात्र सामान्य जनतेच्या गरजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणल्या. यशस्वी पंतप्रधानांच्या यशस्वी योजनांची चर्चा कार्यकर्ते म्हणून जनतेपर्यंत पोहचवा आणि नवनव्या योजनांचे लाभ जनतेला मिळवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाजपा आमदार नितेश राणे यांनी चर्चेदरम्यान पदाधिकारी आणि केंद्रीय गृहमंत्री मिश्रा यांच्यात समन्वय साधला.आमदार राणे यांनी केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचा भगवी शाल, सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.इतर मान्यवरानीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग