शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सिंधुदुर्ग :  वाळूअभावी शासनाची बांधकामे ठप्प : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:48 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या घरांच्या बांधकामाबरोबरच शासनाची अनेक बांधकामे वाळूअभावी पूर्णपणे ठप्प झाली असून वाळूचे दर वाढण्यामागे सर्वस्वी जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व शासन हे सर्वजण असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले.

ठळक मुद्देवाळूअभावी शासनाची बांधकामे ठप्प : परशुराम उपरकरवाळूचे दरही वाढले; पालकमंत्र्यांवर विकासकामांबाबत टीकास्त्र

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील वाळूचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या घरांच्या बांधकामाबरोबरच शासनाची अनेक बांधकामे वाळूअभावी पूर्णपणे ठप्प झाली असून वाळूचे दर वाढण्यामागे सर्वस्वी जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व शासन हे सर्वजण असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले. कोट्यावधीची कामे आणली अशा घोषणा करणाऱ्या पालकमंत्र्यांनी विकास कामांची बांधकामे कुठे सुरू आहेत ती दाखवावी, असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.

कुडाळ एमआयडीसीच्या विश्रामगृहावर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, बाळा पावसकर, कुणाल किनळेकर, निलेश नेरकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.उपरकर यांनी सांगितले की, या जिल्ह्यात सुरुवातीला वाळू अल्पदरात म्हणजेच सात हजार रुपयांपर्यंत मिळत होती. मात्र आजच्या स्थितीला या वाळूचा दर सुमारे १५ ते २० हजार रुपये झाला आहे. त्यामुळे ही वाळू घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही.

सर्वसामान्यांच्या घरांची बांधकामे ठप्प झाली आहेत. तर दुसरीकडे शासनाला या वाळूचा दर परवडत नसल्याने त्यांचीही बांधकामे ठप्प झाली आहेत. वाळूच्या या वाढत्या दरामागे पालकमंत्री दीपक केसरकर येथील लोकप्रतिनिधी व शासन हेच पूर्णपणे जबाबदार आहेत व त्यांच्या आडमुठे धोरणामुळे हे वाळूचे दर वाढत आहेत, असेही उपरकर यांनी सांगितले.

टॅग्स :sandवाळूsindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर