शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सिंधुदुर्ग : चवीने खाणार त्याला संज्याभाय देणार, गरम भजी, वडापाव मिळण्याचे ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:24 IST

महिलांच्या हातची चवही ज्याच्या हातातील जादूमय चवीपुढे लोक विसरून जात आणि मस्त गरमागरम कांदा भजीवर असंख्य खवय्ये ताव मारीत असल्याचे चित्र गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठ्यावरील कोळंबा वडापाव सेंटरमध्ये दिसून येत होते.

ठळक मुद्देचवीने खाणार त्याला संज्याभाय देणारगरमागरम भजी, वडापाव मिळण्याचे ठिकाण

निकेत पावसकर 

सिंधुदुर्ग : महिलांच्या हातची चवही ज्याच्या हातातील जादूमय चवीपुढे लोक विसरून जात आणि मस्त गरमागरम कांदा भजीवर असंख्य खवय्ये ताव मारीत असल्याचे चित्र गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठ्यावरील कोळंबा वडापाव सेंटरमध्ये दिसून येत होते.

वेगळ्याच शैलीने आणि अस्सल कोकणी पद्धतीने बनविलेली कांदा भजी खाण्यासाठी नांदगावच्या चोहोबाजूंनी गर्दी व्हायची. प्रत्येक खवय्याला तेवढ्याच मनापासून कोळंबा वडापाव सेंटरचे मालक संजय मोर्ये भजी द्यायचे. परंतु, महामार्गाच्या चौपदरीकरणात आता ही जागा ते बदलणार आहेत. यामुळे सायंकाळी या टपरीवर अनेकांच्या रंगणाऱ्या गप्पांचे ठिकाण बदलणार आहे.गेली कित्येक वर्षे मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली ते खारेपाटण आणि फोंडा ते देवगड भागातील अनेकांचे विसाव्याचे ठिकाण असलेल्या कोळंबा वडापाव सेंटरची जागा आता चौपदरीकरणामुळे बदलणार आहे. मात्र, काही झालेतरी कांदाभजी चवीने खाणार त्याला संज्याभाय देणार याच्याशी ते ठाम आहेत. अनेकांचे संध्याकाळी भेटण्याचे हे ठिकाण होते.

या भागातील समस्त भजी, वडा खवय्यांच्या मनात संज्या हे नाव कोरले गेलेले आहे. भजी, वडापाव खाता खाता वरून चहाचा घोट घेत हास्यविनोद, गप्पागोष्टी, एकमेकांशी चर्चा, मिस्कीलपणे सुरू असलेली चेष्टामस्करी करतानाच अनेक राजकीय चर्चाही येथे रंगायच्या.कोळंबा वडापाव सेंटर नाव असलेली संजय मोरये यांची गाडी तिठ्यावर चार वाजल्यानंतर सुरू व्हायची. रात्री साडेनऊपर्यंत या टपरीवर अनेक ठिकाणच्या खवय्यांची लगबग सुरू असायची. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण ते कणकवलीपर्यंत महामार्गावर कांदाभजी खायची म्हटली की अनेकांच्या तोंडातून आपोआप नाव येते ते म्हणजे नांदगाव येथील संजय मोरये यांचेच.या भागातील मुंबईकर चाकरमानी गावी आल्यावर एकदातरी येऊन संजयकडील भजी, वडा खाल्ल्याशिवाय जात नाहीत आणि कांदाभजीची चव अनेक महिने जिभेवर रेंगाळत राहते. कारण संजयनेही काही पथ्य पाळली आहेत.

कितीही गर्दी झाली तरीदेखील गिºहाईक निघून जाईल म्हणून अर्धवट भाजलेली कच्ची भजी किंवा वडे कधीच कुणाला दिले नाहीत. तर भजी प्लेट चहाची ग्लास नेहमी संजयकडे स्वच्छ आणि चकाचक पहायला मिळतात.मात्र, आता चौपदरीकरण कामामुळे ही जागा बदलेल आणि अनेकवर्षे ज्या मित्रांनी व इतरांनी आपला वेळ मजेत घालवला ते ठिकाण बदलेल. संजयच्या महामार्गालगतच नवीन जागेत पुन्हा एकदा मित्रांच्या खवय्यांच्या गप्पा गोष्टी रंगतील. मात्र जुन्या जागेची आठवण विसरणे शक्य नसेल.नियम म्हणजे नियमकाहीवेळा तासन्तास थांबावे लागले तरी चालेल. मात्र, अनेकजण आपल्या जिभेचे चोचले येथेच पुरे करतात. कांदाभजी ही संजयची खासियत असल्याने अनेकदा तिथे खूप वेळ उभे रहावे लागते. अशावेळी आपल्या ओळखीचा किंवा अगदी जवळचा मित्र जरी आला तरीदेखील जो पहिला त्याला प्रथम याप्रमाणे तिथे भजी अथवा वडापाव मिळतो. त्यांच्याकडे नियम म्हणजे नियम हे सूत्र पाळले जाते.संजय मोरये आपल्या भजी, वडापाव गाडीवर काम करताना दिसत आहेत.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग