शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सिंधुदुर्ग : चवीने खाणार त्याला संज्याभाय देणार, गरम भजी, वडापाव मिळण्याचे ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:24 IST

महिलांच्या हातची चवही ज्याच्या हातातील जादूमय चवीपुढे लोक विसरून जात आणि मस्त गरमागरम कांदा भजीवर असंख्य खवय्ये ताव मारीत असल्याचे चित्र गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठ्यावरील कोळंबा वडापाव सेंटरमध्ये दिसून येत होते.

ठळक मुद्देचवीने खाणार त्याला संज्याभाय देणारगरमागरम भजी, वडापाव मिळण्याचे ठिकाण

निकेत पावसकर 

सिंधुदुर्ग : महिलांच्या हातची चवही ज्याच्या हातातील जादूमय चवीपुढे लोक विसरून जात आणि मस्त गरमागरम कांदा भजीवर असंख्य खवय्ये ताव मारीत असल्याचे चित्र गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठ्यावरील कोळंबा वडापाव सेंटरमध्ये दिसून येत होते.

वेगळ्याच शैलीने आणि अस्सल कोकणी पद्धतीने बनविलेली कांदा भजी खाण्यासाठी नांदगावच्या चोहोबाजूंनी गर्दी व्हायची. प्रत्येक खवय्याला तेवढ्याच मनापासून कोळंबा वडापाव सेंटरचे मालक संजय मोर्ये भजी द्यायचे. परंतु, महामार्गाच्या चौपदरीकरणात आता ही जागा ते बदलणार आहेत. यामुळे सायंकाळी या टपरीवर अनेकांच्या रंगणाऱ्या गप्पांचे ठिकाण बदलणार आहे.गेली कित्येक वर्षे मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली ते खारेपाटण आणि फोंडा ते देवगड भागातील अनेकांचे विसाव्याचे ठिकाण असलेल्या कोळंबा वडापाव सेंटरची जागा आता चौपदरीकरणामुळे बदलणार आहे. मात्र, काही झालेतरी कांदाभजी चवीने खाणार त्याला संज्याभाय देणार याच्याशी ते ठाम आहेत. अनेकांचे संध्याकाळी भेटण्याचे हे ठिकाण होते.

या भागातील समस्त भजी, वडा खवय्यांच्या मनात संज्या हे नाव कोरले गेलेले आहे. भजी, वडापाव खाता खाता वरून चहाचा घोट घेत हास्यविनोद, गप्पागोष्टी, एकमेकांशी चर्चा, मिस्कीलपणे सुरू असलेली चेष्टामस्करी करतानाच अनेक राजकीय चर्चाही येथे रंगायच्या.कोळंबा वडापाव सेंटर नाव असलेली संजय मोरये यांची गाडी तिठ्यावर चार वाजल्यानंतर सुरू व्हायची. रात्री साडेनऊपर्यंत या टपरीवर अनेक ठिकाणच्या खवय्यांची लगबग सुरू असायची. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण ते कणकवलीपर्यंत महामार्गावर कांदाभजी खायची म्हटली की अनेकांच्या तोंडातून आपोआप नाव येते ते म्हणजे नांदगाव येथील संजय मोरये यांचेच.या भागातील मुंबईकर चाकरमानी गावी आल्यावर एकदातरी येऊन संजयकडील भजी, वडा खाल्ल्याशिवाय जात नाहीत आणि कांदाभजीची चव अनेक महिने जिभेवर रेंगाळत राहते. कारण संजयनेही काही पथ्य पाळली आहेत.

कितीही गर्दी झाली तरीदेखील गिºहाईक निघून जाईल म्हणून अर्धवट भाजलेली कच्ची भजी किंवा वडे कधीच कुणाला दिले नाहीत. तर भजी प्लेट चहाची ग्लास नेहमी संजयकडे स्वच्छ आणि चकाचक पहायला मिळतात.मात्र, आता चौपदरीकरण कामामुळे ही जागा बदलेल आणि अनेकवर्षे ज्या मित्रांनी व इतरांनी आपला वेळ मजेत घालवला ते ठिकाण बदलेल. संजयच्या महामार्गालगतच नवीन जागेत पुन्हा एकदा मित्रांच्या खवय्यांच्या गप्पा गोष्टी रंगतील. मात्र जुन्या जागेची आठवण विसरणे शक्य नसेल.नियम म्हणजे नियमकाहीवेळा तासन्तास थांबावे लागले तरी चालेल. मात्र, अनेकजण आपल्या जिभेचे चोचले येथेच पुरे करतात. कांदाभजी ही संजयची खासियत असल्याने अनेकदा तिथे खूप वेळ उभे रहावे लागते. अशावेळी आपल्या ओळखीचा किंवा अगदी जवळचा मित्र जरी आला तरीदेखील जो पहिला त्याला प्रथम याप्रमाणे तिथे भजी अथवा वडापाव मिळतो. त्यांच्याकडे नियम म्हणजे नियम हे सूत्र पाळले जाते.संजय मोरये आपल्या भजी, वडापाव गाडीवर काम करताना दिसत आहेत.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग