शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : महामार्गाच्या चौपदरीकरणात १०० जणांचा अपघाती मृत्यु : उपरकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:18 IST

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम होताना १६०० कोटी रुपयाचा निधी खर्च केला जात आहे. मात्र या कोटयावधी रुपयाच्या निधीत १ रुपयाचा फायदा स्थानिक बेरोजगार तरुणांना किंवा व्यापाऱ्यांना, क्रशरधारकांना झालेला नाही. आतापर्यंत महामार्गाच्या कामादरम्यान सिंधुदुर्गात १०० जणांचा अपघाती मृत्यु, ५०० जण जखमी तर अनेक गाडयांचे नुकसान झाले आहे. असा आरोप मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देमहामार्गाच्या चौपदरीकरणात १०० जणांचा अपघाती मृत्यु :उपरकर यांचा आरोपस्थानिकाना कुठलाही रोजगार नाही ; ठेकेदाराकडुन मुजोरी कायम

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम होताना १६०० कोटी रुपयाचा निधी खर्च केला जात आहे. मात्र या कोटयावधी रुपयाच्या निधीत १ रुपयाचा फायदा स्थानिक बेरोजगार तरुणांना किंवा व्यापाऱ्यांना, क्रशरधारकांना झालेला नाही. आतापर्यंत महामार्गाच्या कामादरम्यान सिंधुदुर्गात १०० जणांचा अपघाती मृत्यु, ५०० जण जखमी तर अनेक गाडयांचे नुकसान झाले आहे. असा आरोप मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात  ते बोलत होते.परशुराम उपरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्गातील एकाही तरुणाला महामार्गाचे काम घेतलेल्या संबंधीत दोन्ही ठेकेदार कंपन्यानी नोकरीला ठेवलेले नाही. आपल्या प्लान्टवर सुरक्षा रक्षक, लिपिक, शिपाई व अन्य विविध पदांवर परप्रांतीय कामगारांना ठेवण्यात आले आहे. धान्यपुरवठा करणारा ठेकेदारही परप्रांतीयच निवडण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गाच्या विकासात स्थानिकांच्या हाती काहीच लागलेले नाही.पर्यावरणाच्या मुद्यावर मंत्रालयात झालेल्या बैठकीत पर्यावरण प्रेमींनी महामार्ग चौपदरिकरण कामात बाधित होणारे वृक्ष स्थलांतरित करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव शासनाने विचारात घेतला नाही.

भविष्यात महामार्गावरील झाडे तोडण्यात आल्याने मोठया प्रमाणात कॉक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. त्याचा त्रास जिल्ह्यातील जनतेला सहन करावा लागणार आहे. ठेकेदार कंपनीने आपल्या यंत्र सामुग्री तसेच मालमत्तेचा विमा उतरविला आहे. मात्र या कामा दरम्यान अपघात झाल्यास संबधित व्यक्तिस मदत होण्याच्या दृष्टिने अद्याप विमा उतरविण्याचे सौजन्य दाखविलेले नाही.चौपदरीकरणाच्या मुद्यावर दोन्ही सत्ताधारी पक्ष बोलताना दिसत नाही. विकास होताना प्रकल्पग्रस्तांची झालेली वाताहात विचारात घेतली पाहीजे. रस्त्याचा विकास करत असताना अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत. याचा विचार व्यायला हवा. जनतेची दिशाभुल करण्यापलीकडे सत्ताधारी काहीही काम करत नाहीत.

कणकवलीतील काही नगरसेवकांनी उप अभियंत्याना निवेदन देवुन लक्ष वेधले आहे. मात्र त्यांनी सत्ताधारी म्हणुन मंत्र्याकडे मागण्याकरुन जनतेला दिलासा देण्याची गरज होती.मात्र तसे झालेले नाही. असेही उपरकर यावेळी म्हणाले.ठेकेदारच श्रीमंत होणार !केंद्र आणि राज्य शासनाचे एकच धोरण दिसुन येत आहे. ते म्हणजे श्रीमंताला अधिक श्रीमंत करणे. त्यामुळे ठेकेदारच या महामार्गाच्या चौपदरिकरण कामामुळे श्रीमंत होणार आहे. असेही उपरकर यावेळी म्हणाले.झाडाना जीवदान देणे आवश्यक !महामार्गाच्या कामादरम्यान हजारो झाडे तोडण्यात आली. त्यापैकी काही झाडे स्थलांतरीत करुन त्या झाडांना जीवदान देण्याची गरज होती. मात्र तसे न करता संबंधीत ठेकेदाराने व शासनाने पर्यावरणाचा विचार बाजुला सारुन चौपदरीकरणाचे काम केले आहे. हे योग्य नव्हे.

शहरातील वटवृक्ष वाचविण्यासाठी आपण सर्व प्राधिकरणाना पत्र दिले आहे. तसेच आवाज फाऊंडेशन सारख्या सामाजिक संस्थाशीही बोललो आहे. त्यांनी वृक्ष वाचविण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. शासनाने आता पुढाकार घ्यावा,असेही उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग