शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत एफडीआयला तीव्र विरोध

By admin | Updated: November 6, 2014 22:05 IST

रखलदास गुप्ता : भांडवलदारधार्जिण्या केंद्राने रेल्वे काढलेय विकायला...

रत्नागिरी : केंद्रात सत्तेवर आलेले मोदींचे भाजपा सरकार देशात खुलेआम एफडीआय आणण्याची भाषा करीत आहे. भारतीय रेल्वेक्षेत्रातही एफडीआय आणण्याचा घाट घातला गेलाय. त्यामुळे मोदी सरकार देश विकायला निघाले आहे, असे म्हणण्याजोगी स्थिती असून, देशातून ‘स्वदेशी’ बाजूला करीत ‘विदेशी’ आणण्याचा घाट घातला जात आहे. मोदी सरकार भांडवलदारधार्जिणे असून, रेल्वेमध्ये एफडीआय आणण्यास रेल्वे कर्मचारी संघटनांचा ठाम विरोध राहील, प्रसंगी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आॅल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे अध्यक्ष रखलदास गुप्ता यांनी दिला.नॅशनल रेल्वे मजदूर युनियच्या ६५व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला गुप्ता रत्नागिरीत आले होते. त्यांच्यासमवेत फेडरेशनचे सरचिटणीस शिवगोपाल मिश्र तसेच संघटनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. गुप्ता म्हणाले, रेल्वे हे गरीब जनतेच्या वाहतुकीचे साधन आहे. याआधी १९७४मध्ये केंद्रातील कॉँग्रेस सरकारने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची गळचेपी केली होती. शासकीय कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरले होते. मात्र, त्यावेळी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने ही गळचेपी झुगारून लावली. आता मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर भांडवलदारांच्या साथीने देशात एफडीआय आणण्याचा घाट घातला जात आहे. त्याला रेल्वे कर्मचाऱ्यांचा विरोधच राहील. योग्य धोरण घेण्यासाठी मोदी सरकारकडून अजून सहा महिने प्रतीक्षा करू. मात्र, त्यानंतरही रेल्वेवर एफडीआय लादण्याचा प्रयत्न झाला तर देशव्यापी आंदोलन केले जाईाल. हे आंदोलन करण्याची वेळ केंद्राने आमच्यावर आणू नये, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्याचा मुद्दा आपल्या संघटनेकडून मांडला जातो, त्याबाबतची नेमकी भूमिका काय, असे पत्रकारांनी विचारता सरचिटणीस मिश्र म्हणाले, कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिन करावी, ही संघटनेची भूमिका आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. कारण केंद्रीय रेल्वेत समावेश झाल्यानंतर देशस्तरावर मिळणाऱ्या अनेक सुविधा मिळतील. सध्या कोकण रेल्वेला जो तोटा होतो तो भारतीय रेल्वेला भरून द्यावा लागतो. भारतीय रेल्वेत समाविष्ट नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक लाभांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण व्हावे, यासाठी संघटना यापुढेही प्रयत्न करणार असल्याचे मिश्र यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होण्यास संघटना प्रयत्नशील. एफडीआयच्या रुपाने स्वदेशीला बाजूला करीत विदेशी आणण्याचा घाट. केंद्रातील मोदी सरकार हे भांडवलदार धार्जिणे. एफडीआयबाबत योग्य निर्णय न घेतल्यास देशव्यापी तीव्र आंदोलन छेडणार. रेल्वे कर्मचाऱ्यांची गळचेपी खपवून घेणार नाही.आंदोलन कर्मचाऱ्यांवर लादू नये.