शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Chipi Airport Inauguration: “इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे व नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 16:57 IST

Chipi Airport Inauguration: सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी, म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी, असे म्हणत रामदास आठवलेंनी चिपी विमानतळावरून कवितांची विमाने उडवली.

सिंधुदुर्ग: अनेक केंद्रीय आणि राज्यातील दिग्गज मंत्र्यांच्या उपस्थितीत चिपी विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अगदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जवळपास सर्वच नेत्यांनी तुफान फटकेबाजी केली. यामध्ये केंद्रीयमंत्री सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हेही मागे राहिले नाहीत. चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी टोलेबाजी केली. (ramdas athawale in chipi airport inauguration)

सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार आहे कमान, कारण चिपीमध्ये आले आहे मुंबईवरून विमान, अशी कविता करत चिपी विमानतळाचे श्रेय सर्वांचेच असल्याचे सांगितले. राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे येथे जमलेलो असून सगळीकडेच राजकारण आणण्याची आवश्यकता नसल्याचेही आठवले म्हणाले. 

सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याला समुद्र लाभला 

इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे व नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला. त्यामुळे या कार्यक्रमाला आलो. सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याला समुद्र लाभला आहे, सुंदर डोंगर आहेत तसेच झाडेही आहेत. विमानतळाच्या माध्यमातून येथील नागरिकांना नक्कीच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर एकत्र आले. या विमानतळासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि मीदेखील प्रयत्न केलेल आहेत, असे रामदास आठवले यांनी सांगत सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी, म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाचा शुभारंभ झाल्याचे जाहीर करत, आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नसून तो आनंद व्यक्त करण्याचा क्षण आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सौभाग्याचा आहे. आपले कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे, ते आपण जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्या सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. शिवसेना आणि कोकणाचे नाते वेगळे सांगायला नको, असे नमूद करत चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे