शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

Chipi Airport Inauguration: “इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे व नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 16:57 IST

Chipi Airport Inauguration: सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी, म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी, असे म्हणत रामदास आठवलेंनी चिपी विमानतळावरून कवितांची विमाने उडवली.

सिंधुदुर्ग: अनेक केंद्रीय आणि राज्यातील दिग्गज मंत्र्यांच्या उपस्थितीत चिपी विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अगदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जवळपास सर्वच नेत्यांनी तुफान फटकेबाजी केली. यामध्ये केंद्रीयमंत्री सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हेही मागे राहिले नाहीत. चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी टोलेबाजी केली. (ramdas athawale in chipi airport inauguration)

सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार आहे कमान, कारण चिपीमध्ये आले आहे मुंबईवरून विमान, अशी कविता करत चिपी विमानतळाचे श्रेय सर्वांचेच असल्याचे सांगितले. राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे येथे जमलेलो असून सगळीकडेच राजकारण आणण्याची आवश्यकता नसल्याचेही आठवले म्हणाले. 

सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याला समुद्र लाभला 

इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे व नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला. त्यामुळे या कार्यक्रमाला आलो. सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याला समुद्र लाभला आहे, सुंदर डोंगर आहेत तसेच झाडेही आहेत. विमानतळाच्या माध्यमातून येथील नागरिकांना नक्कीच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर एकत्र आले. या विमानतळासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि मीदेखील प्रयत्न केलेल आहेत, असे रामदास आठवले यांनी सांगत सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी, म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाचा शुभारंभ झाल्याचे जाहीर करत, आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नसून तो आनंद व्यक्त करण्याचा क्षण आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सौभाग्याचा आहे. आपले कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे, ते आपण जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्या सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. शिवसेना आणि कोकणाचे नाते वेगळे सांगायला नको, असे नमूद करत चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे