शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Chipi Airport Inauguration: “इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे व नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 16:57 IST

Chipi Airport Inauguration: सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी, म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी, असे म्हणत रामदास आठवलेंनी चिपी विमानतळावरून कवितांची विमाने उडवली.

सिंधुदुर्ग: अनेक केंद्रीय आणि राज्यातील दिग्गज मंत्र्यांच्या उपस्थितीत चिपी विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अगदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जवळपास सर्वच नेत्यांनी तुफान फटकेबाजी केली. यामध्ये केंद्रीयमंत्री सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हेही मागे राहिले नाहीत. चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी टोलेबाजी केली. (ramdas athawale in chipi airport inauguration)

सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार आहे कमान, कारण चिपीमध्ये आले आहे मुंबईवरून विमान, अशी कविता करत चिपी विमानतळाचे श्रेय सर्वांचेच असल्याचे सांगितले. राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे येथे जमलेलो असून सगळीकडेच राजकारण आणण्याची आवश्यकता नसल्याचेही आठवले म्हणाले. 

सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याला समुद्र लाभला 

इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे व नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला. त्यामुळे या कार्यक्रमाला आलो. सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याला समुद्र लाभला आहे, सुंदर डोंगर आहेत तसेच झाडेही आहेत. विमानतळाच्या माध्यमातून येथील नागरिकांना नक्कीच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर एकत्र आले. या विमानतळासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि मीदेखील प्रयत्न केलेल आहेत, असे रामदास आठवले यांनी सांगत सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी, म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाचा शुभारंभ झाल्याचे जाहीर करत, आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नसून तो आनंद व्यक्त करण्याचा क्षण आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सौभाग्याचा आहे. आपले कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे, ते आपण जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्या सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. शिवसेना आणि कोकणाचे नाते वेगळे सांगायला नको, असे नमूद करत चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे